शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
3
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
6
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
7
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
8
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
9
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
10
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
11
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
12
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
13
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
14
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
15
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
16
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
17
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
18
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
19
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
20
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!

औरंगाबादेत भूखंडाचे परस्पर आरक्षण बदलले; मनपाला थांगपत्ताही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 11:35 IST

शहर विकास आराखड्यात फेरबदल करण्याचा अधिकार सर्वसाधारण सभा आणि राज्य शासनाला असतानाही शहरातील काही भूखंडांचे आरक्षण बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

औरंगाबाद : शहर विकास आराखड्यात फेरबदल करण्याचा अधिकार सर्वसाधारण सभा आणि राज्य शासनाला असतानाही शहरातील काही भूखंडांचे आरक्षण बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण या शासकीय जागांवरील आरक्षणे परस्पर बदलण्यात आली आहेत. भूखंडाचे श्रीखंड खाणारे कोण? याचा सविस्तर अहवाल द्यावा, असे आदेश शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी नगररचना विभागाला दिले.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी नगररचना विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीला गजानन बारवाल, नगररचनाचे उपअभियंता एस.एस. कुलकर्णी यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. १९९१ च्या मंजूर विकास आराखड्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, महावितरण, तसेच इतर शासकीय कार्यालयांनी सुचविल्यानुसार आरक्षणे टाकण्यात आली. ज्या हेतूसाठी आरक्षण टाकण्यात आले तो हेतू नियोजित वेळेत पूर्ण झाला नाही तर आरक्षण बदलता येते. त्यासाठी महापालिका सर्वसाधारण सभेत ठराव घ्यावा लागतो. या ठरावाची प्रत शासनाकडे दाखल करावी लागते. शासनाला उचित वाटल्यास आरक्षण उठविण्याची कारवाई होते. मागील काही वर्षांमध्ये शासकीय जागांवरील आरक्षणे परस्पर बदलण्यात आली आहेत. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपयोगासाठी आरक्षित असलेल्या जागांची आरक्षणे सर्वात जास्त बदलण्यात आल्याचेही समोर आले आहे. जागामालकांनी बांधकाम विभागाकडून पालिकेच्या नगररचना विभागाला देऊन जागांवरील आरक्षणे बदलून घेतली आहेत. नेमकी अशी किती प्रकरणे आहेत, किती आरक्षित जागांचा ताबा अद्याप घेण्यात आलेला नाही, किती आरक्षित जागांचा आरक्षणाप्रमाणे वापर होत नसून ते बदलून देण्यासाठी किती जणांचे प्रस्ताव आलेले आहेत, याचा संपूर्ण अहवाल येणाऱ्या सभेत सादर करण्याचे महापौरांनी आदेशित केले. 

बिल्डरांनी लढवली शक्कलमोठ्या ग्रुप हाऊसिंग प्रकल्पात बिल्डरांना मध्यमवर्गीय, सर्वसामान्यांसाठी २० टक्के सदनिकांचे आरक्षण ठेवावे असा दंडक करण्यात आला आहे. शासनाच्या या नवीन नियमातही बिल्डरांनी शक्कल लढविली आहे. म्हाडा कार्यालयाकडून एक पत्र आणायचे आणि त्यात मध्यमवर्गीय, सर्वसामान्यांसाठी घरांची गरज नाही. त्यानंतर योजनेतील सर्व घरे व्यावसायिक दराने विकून टाकायची. या प्रकरणाचाही सविस्तर तपशील सर्वसाधारण सभेने द्यावा, असे महापौरांनी नमूद केले आहे. 

नगररचना विभागच केंद्रबिंदूजमिनीचे आरक्षण बदलणे, हाऊसिंग योजनेतील घरे याचा संबंध मनपाच्या नगररचना विभागाशी येतो. या विभागाची परवानगी घेतल्याशिवाय काहीच निर्णय होत नाही. नगररचना विभागानेच आरक्षणे, बांधकाम परवानग्या तपासून या महाघोटाळ्याचा अहवाल द्यावा, अशी अपेक्षाही महापौरांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfraudधोकेबाजी