शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

गुटखा पुडी न दिल्याने तरूणाचा खून; दोन जणांना गुन्हेशाखेकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 18:27 IST

आरोपींनी मृतदेह गोगाबाबा टेकडी परिसरात फेकून दिला होता.

ठळक मुद्देया प्रकरणातील अन्य एकाचा शोध सुरु आहे

औरंगाबाद: नवविवाहित तरूणाच्या खूनाचा उलगडा करण्यात गुन्हेशाखेला गुरूवारी यश आले. गुटखा पुडी न दिल्याने तडीपार गुंडाने साथीदारांच्या मदतीने निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण करीत गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. नंतर आरोपींनी मृतदेह गोगाबाबा टेकडी परिसरात फेकून दिला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून अन्य एकाचा शोध सुरू आहे.

तडीपार गुंड प्रवीण उर्फ बाली  भास्कर भालेराव (२६,) आणि प्रशांत सुरेश साळवे (२३, दोघे रा. रा. जयभीमनगर, टाऊन हॉल परिसर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरिापीचा तिसरा साथीदार सोमेश अहिरे हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. गोगाबाबा टेकडी परिसरात१८ सप्टेंबर रोजी सकाळी शफीकखान रफिक खान (रा. अरब खिडकी, बेगमपुरा)याचा गळा आवळून खून करून मृतदेह फेकल्याचे आढळले होते. 

याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनास्थळीही कोणताही पुरावा गुन्हेगारांनी सोडला नव्हता. गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस कर्मचारी दीपक ढोणे, शिवा बोर्डे, रमेश भालेराव, सुरेश काळवणे, संदीप बिडकर आणि नितीन धुळे यांच्या पथकाला या खूनात जयभीमनगर येथील तडीपार गुंड बाली उर्फ प्रवीण असल्याची माहिती खबऱ्याने  दिली. बाली हा शहरातून तडीपार  असताना तो  १८ रोजी शहरात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता, बुधवारी रात्री त्याला पोलिसांनी एका ठिकाणाहून उचलले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

असा केला खून

टाऊन हॉल येथील पानटपरीवर गुटखा खाण्यासाठी शफीक आला होता. गुटखा घेऊन तो एका प्रार्थनास्थळाजवळ उभा असताना आरोपी बाली, त्याचे साथीदार प्रशांत आणि सोमेश यांनी त्याला गाठले आणि गुटखा मागितला. शफिकने त्यांना गुटखा देण्यास नकार दिला. याचा प्रचंड राग बाली आणि त्याच्या साथीदारांना आला. त्यांनी शफीकला शिवीगाळ करीत बळजबरीने दुचाकीवर बसविले. एकाच दुचाकीवर चार जण बसून ते घाटी रुग्णालय कॅम्पसमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ घेऊन गेले.  तेथे त्यांनी शफिकला मारहाण केली. यावेळी शफिकने आरडाओरड केल्याने रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी येथे भांडण करू नका,असे म्हणाल्याने आरोपींनी त्याला पुन्हा दुचाकीवर बसविले आणि ते त्याला विद्यापीठाकडे नेऊ लागले. दुचाकीवर बसल्यानंतर शफिक ओरडू लागल्याने आरोपींनी चालत्या दुचाकीवर त्याचा गळा आवळून त्याचा खून केला.नंतर मृतदेह गोगाबाबा टेकडीजवळ फेकून आरोपी पसार झाले होते.