शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

बायको-मुलांना सोडले, चार एकर जमीन विकली, तिनेच धोका दिल्याने काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 11:48 IST

अत्याचार केल्यानंतर मक्याच्या शेतातील चिखलात तोंड दाबून मारून टाकले.

ठळक मुद्देगुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंदमारिया आल्हट हिची आत्महत्या नव्हे, हत्याच

औरंगाबाद : जिच्यासाठी बायको, मुलांना सोडले, चार एकर जमीन विकली, तिने दहा वर्षे सोबत राहिल्यानंतर म्हातारा झाल्याचे सांगून दुसरा प्रियकर पकडला. त्यामुळे संतापलेल्या माजी प्रियकराने तिला गोड बोलून शिवारात नेऊन मारून टाकले. त्यानंतर प्रेत विहिरीत टाकून दिले. ही घटना २३ सप्टेंबर रोजी घडली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाला वाळूज एमआयडीसी परिसरात एका दुसऱ्या प्रकरणाच्या तपासासाठी ५ ऑक्टोबर रोजी पाठविले होते. त्यावेळी तेथे मारिया सुरेश आल्हट या महिलेची आत्महत्या नसून खून झाल्याचे समजले. गुन्हे शाखेने त्या दिशेने तपास सुरू केला. मारियासोबत शेवटच्या वेळी कोण संपर्कात होते, याची पडताळणी करण्यात आली. यात सुनील खरात याचे नाव समोर आले. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र खाक्या दाखवताच गुन्हा कबूल केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, मारियाच्या पतीचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिला पतीपासून एक मुलगी होती. सुनीलच्या संपर्कात आल्यानंतर दोघे दहा वर्षांपासून पती-पत्नीसारखे राहत. तिच्यासाठी सुनीलने पत्नी, मुलांना सोडून दिले. चार एकर जमीन विकली.

मारियाला सुनीलपासून दोन मुले झाली. तरीही ती काही दिवसांपासून त्याच्यापासून दूर राहू लागली. आपण आता बहीण-भावासारखे राहू, तू म्हातारा झाला आहेस, असा तिने टोमणा मारला. दुखावलेल्या सुनीलने तिला संपविण्याचे ठरविले. याच कालावधीत त्याला मारियाचे सूत एका ठेकेदारासोबत जुळल्याचे समजले. यामुळे संतापलेल्या सुनीलने २३ सप्टेंबर रोजी तुला एकदाच भेटायचे आहे. यानंतर पुन्हा येणार नाही, असे सांगून तिला एकलहरा शिवारात नेले. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर मक्याच्या शेतातील चिखलात तोंड दाबून मारून टाकले. त्यानंतर प्रेत विहिरीत टाकून दिले. हा गुन्हा पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल मस्के, सहायक फाैजदार सतीश जाधव, हवालदार सुधाकर मिसाळ, जितेंद्र ठाकूर, रवींद्र चरात, सुनील बेलकर, विजय पिंपळे आणि नितीन देशमुख यांच्या पथकाने उघडकीस आणला.

दोन मुले उघड्यावरमारियाची सहा आणि अडीच वर्षांची दोन मुले उघड्यावर आली आहेत. मारियाच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी व सुनीलच्या पहिल्या पत्नीचा मुलगा हे दोघेही संगनमताने पळून गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अधिक तपास निरीक्षक संदीप गुरमे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद