शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बायको-मुलांना सोडले, चार एकर जमीन विकली, तिनेच धोका दिल्याने काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 11:48 IST

अत्याचार केल्यानंतर मक्याच्या शेतातील चिखलात तोंड दाबून मारून टाकले.

ठळक मुद्देगुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंदमारिया आल्हट हिची आत्महत्या नव्हे, हत्याच

औरंगाबाद : जिच्यासाठी बायको, मुलांना सोडले, चार एकर जमीन विकली, तिने दहा वर्षे सोबत राहिल्यानंतर म्हातारा झाल्याचे सांगून दुसरा प्रियकर पकडला. त्यामुळे संतापलेल्या माजी प्रियकराने तिला गोड बोलून शिवारात नेऊन मारून टाकले. त्यानंतर प्रेत विहिरीत टाकून दिले. ही घटना २३ सप्टेंबर रोजी घडली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाला वाळूज एमआयडीसी परिसरात एका दुसऱ्या प्रकरणाच्या तपासासाठी ५ ऑक्टोबर रोजी पाठविले होते. त्यावेळी तेथे मारिया सुरेश आल्हट या महिलेची आत्महत्या नसून खून झाल्याचे समजले. गुन्हे शाखेने त्या दिशेने तपास सुरू केला. मारियासोबत शेवटच्या वेळी कोण संपर्कात होते, याची पडताळणी करण्यात आली. यात सुनील खरात याचे नाव समोर आले. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र खाक्या दाखवताच गुन्हा कबूल केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, मारियाच्या पतीचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिला पतीपासून एक मुलगी होती. सुनीलच्या संपर्कात आल्यानंतर दोघे दहा वर्षांपासून पती-पत्नीसारखे राहत. तिच्यासाठी सुनीलने पत्नी, मुलांना सोडून दिले. चार एकर जमीन विकली.

मारियाला सुनीलपासून दोन मुले झाली. तरीही ती काही दिवसांपासून त्याच्यापासून दूर राहू लागली. आपण आता बहीण-भावासारखे राहू, तू म्हातारा झाला आहेस, असा तिने टोमणा मारला. दुखावलेल्या सुनीलने तिला संपविण्याचे ठरविले. याच कालावधीत त्याला मारियाचे सूत एका ठेकेदारासोबत जुळल्याचे समजले. यामुळे संतापलेल्या सुनीलने २३ सप्टेंबर रोजी तुला एकदाच भेटायचे आहे. यानंतर पुन्हा येणार नाही, असे सांगून तिला एकलहरा शिवारात नेले. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर मक्याच्या शेतातील चिखलात तोंड दाबून मारून टाकले. त्यानंतर प्रेत विहिरीत टाकून दिले. हा गुन्हा पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल मस्के, सहायक फाैजदार सतीश जाधव, हवालदार सुधाकर मिसाळ, जितेंद्र ठाकूर, रवींद्र चरात, सुनील बेलकर, विजय पिंपळे आणि नितीन देशमुख यांच्या पथकाने उघडकीस आणला.

दोन मुले उघड्यावरमारियाची सहा आणि अडीच वर्षांची दोन मुले उघड्यावर आली आहेत. मारियाच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी व सुनीलच्या पहिल्या पत्नीचा मुलगा हे दोघेही संगनमताने पळून गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अधिक तपास निरीक्षक संदीप गुरमे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद