शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये ? सर्वोच्च न्यायालयाकडे लक्ष; प्रशासनही अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 15:19 IST

आता निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे पाहून वॉर्डात दिसणाऱ्या इच्छुकांची  संख्या पुन्हा घटतेय.

ठळक मुद्देइच्छुकांची वॉर्डातील भाऊगर्दी घटली प्रशासन म्हणतेय आम्हाला कल्पना नाही

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयात दाखल वॉर्ड आरक्षण याचिकेवरील निकालाची प्रतीक्षा व कोरोनाचा संसर्ग पाहता किमान सहा महिने म्हणजे एप्रिल २०२१ पर्यंत निवडणूक होणार नाही, असे दिसतेय. निवडणूक तारखांचा अंदाज बांधणे महापालिका अधिकाऱ्यांनाही कठीण जात आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२० मध्ये महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत घेतली होती. या आरक्षणावर शेकडो नागरिकांनी आक्षेप दाखल केले होते. राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, आरक्षणात  दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या प्रक्रियेला खंडपीठात आव्हान देण्यात आले. खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाने केलेली प्रक्रिया योग्य ठरविली. त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रक्रियेला आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र शासन मंगळवारी (दि.२०) आपले मत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याची शक्यता आहे. एप्रिल २०२० मध्ये महापालिका निवडणूक घेण्यात येणार होती. कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. सध्या महापालिकेचे कामकाज प्रशासक म्हणून आस्तिककुमार पाण्डेय पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयात वाॅर्ड आरक्षणावर अंतिम सुनावणी होऊन लगेच निकाल हाती येण्याची तूर्त शक्यता नाही. डिसेंबरमध्ये महापालिका निवडणूक होईल यादृष्टीने राजकीय पक्षांनी जोरबैठका सुरू केल्या होत्या. कोरानाची संधी साधत इच्छुक उमेदवारांनी मदतीआडून नागरिकांशी संपर्क साधणे सुरू केले. आता निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे पाहून वॉर्डात दिसणाऱ्या इच्छुकांची  संख्या पुन्हा घटतेय. तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी आणखी चार ते पाच महिने लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्यासाठी हिरवी झेंडी दिली तरी कोरोनामुळे ते शक्य होणार नाही. त्यामुळे निवडणुकांसाठी एप्रिल २०२१ उजाडण्याचीच शक्यता अधिक आहे.  

प्रशासन म्हणतेय आम्हाला कल्पना नाहीसर्वोच्च न्यायालयात महापालिका निवडणुकीसंदर्भात आव्हान याचिका दाखल केलेली असली तरी अद्याप प्रशासनाला अधिकृतपणे कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. निवडणूक कधी होईल हेसुद्धा सांगता येणार नसल्याचे उपायुक्त सुमंत मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद