शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये ? सर्वोच्च न्यायालयाकडे लक्ष; प्रशासनही अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 15:19 IST

आता निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे पाहून वॉर्डात दिसणाऱ्या इच्छुकांची  संख्या पुन्हा घटतेय.

ठळक मुद्देइच्छुकांची वॉर्डातील भाऊगर्दी घटली प्रशासन म्हणतेय आम्हाला कल्पना नाही

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयात दाखल वॉर्ड आरक्षण याचिकेवरील निकालाची प्रतीक्षा व कोरोनाचा संसर्ग पाहता किमान सहा महिने म्हणजे एप्रिल २०२१ पर्यंत निवडणूक होणार नाही, असे दिसतेय. निवडणूक तारखांचा अंदाज बांधणे महापालिका अधिकाऱ्यांनाही कठीण जात आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२० मध्ये महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत घेतली होती. या आरक्षणावर शेकडो नागरिकांनी आक्षेप दाखल केले होते. राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, आरक्षणात  दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या प्रक्रियेला खंडपीठात आव्हान देण्यात आले. खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाने केलेली प्रक्रिया योग्य ठरविली. त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रक्रियेला आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र शासन मंगळवारी (दि.२०) आपले मत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याची शक्यता आहे. एप्रिल २०२० मध्ये महापालिका निवडणूक घेण्यात येणार होती. कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. सध्या महापालिकेचे कामकाज प्रशासक म्हणून आस्तिककुमार पाण्डेय पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयात वाॅर्ड आरक्षणावर अंतिम सुनावणी होऊन लगेच निकाल हाती येण्याची तूर्त शक्यता नाही. डिसेंबरमध्ये महापालिका निवडणूक होईल यादृष्टीने राजकीय पक्षांनी जोरबैठका सुरू केल्या होत्या. कोरानाची संधी साधत इच्छुक उमेदवारांनी मदतीआडून नागरिकांशी संपर्क साधणे सुरू केले. आता निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे पाहून वॉर्डात दिसणाऱ्या इच्छुकांची  संख्या पुन्हा घटतेय. तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी आणखी चार ते पाच महिने लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्यासाठी हिरवी झेंडी दिली तरी कोरोनामुळे ते शक्य होणार नाही. त्यामुळे निवडणुकांसाठी एप्रिल २०२१ उजाडण्याचीच शक्यता अधिक आहे.  

प्रशासन म्हणतेय आम्हाला कल्पना नाहीसर्वोच्च न्यायालयात महापालिका निवडणुकीसंदर्भात आव्हान याचिका दाखल केलेली असली तरी अद्याप प्रशासनाला अधिकृतपणे कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. निवडणूक कधी होईल हेसुद्धा सांगता येणार नसल्याचे उपायुक्त सुमंत मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद