शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

महिन्याचे खर्च भागविताना महापालिकेची तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 16:48 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचा फटका औरंगाबाद महापालिकेलाही बसला असून मागील पाच महिन्यांमध्ये अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे तब्बल २५० कोटींची तूट निर्माण झाली आहे.

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचा फटका औरंगाबाद महापालिकेलाही बसला असून मागील पाच महिन्यांमध्ये अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे तब्बल २५० कोटींची तूट निर्माण झाली आहे. महापालिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या  मालमत्ता कर आणि पाणीपट्टीतून  अत्यंत कमी उत्पन्न  मिळाल्याने मनपाचे आर्थिक नियोजन कोलमडले असून महिन्याचे खर्च भागविताना महापालिकेची  तारेवरची कसरत होत आहे.

मागील काही वर्षांपासूनच औरंगाबाद महापालिकेची अर्थस्थिती अत्यंत डळमळीत आहे. उत्पन्नापेक्षा  चारपट अधिक विकास कामे करण्यात आल्याने २४० कोटी रूपयांच्या विकास कामांची देयके प्रलंबित आहेत. दोन वर्षांपासून कंत्राटदारांना बिल न दिल्यामुळे नविन विकास कामे घेण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळे  सध्या महापालिकेच्या निधीतून होणारी विकासकामेही ठप्प आहेत.

महापालिकेला मार्च महिन्यात मालमत्ता करातून कोट्यावधी रूपये मिळतात. विविध कार्यालयांकडून कर उपलब्ध होतो. कोरोनामुळे मात्र हा निधी अजूनपर्यंतही मिळालेला नाही. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात मालमत्ता करातून फक्त ३२ कोटी रूपये मिळाले असून १०० कोटी रूपये येणे मनपाला अपेक्षित होते. महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या नगर रचना विभागाकडूनही पाच महिन्यात फक्त १३ कोटी रूपये प्राप्त झाले. मालमत्ता विभागाने १ कोटी रूपयांची कमाई करून दिली असून मालमत्ता करातून उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात आल्याचे मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी सांगितले. यातच भर म्हणून मागील ७ महिन्यांपासून पालिकेची ८० टक्के यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त आहे. कोरोनासाठी जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत फक्त १४ कोटी रूपये महापालिकेला मिळाले. आणखी ३८ कोटी द्यावेत, अशी  मागणी महापालिकेने केली आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था