शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिका शहागंजमधील ४० टपऱ्या काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 18:27 IST

सेनेने कायद्याच्या चौकटीत एमआयएमची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे नगर परिषदेच्या काळातील करारही संपला शहागंज चमन येथे वल्लभभाई पटेल यांचा नवीन पुतळा उभारण्यात आला आहे.

औरंगाबाद : शहागंज चमन येथे वल्लभभाई पटेल यांचा नवीन पुतळा उभारण्यात आला आहे. या भागात सुशोभीकरणाचे काम मनपाने हाती घेतले आहे. चमनच्या तिन्ही बाजूंनी व्यापाऱ्यांनी टपऱ्या थाटल्या आहेत. त्यामुळे पुतळा अजिबात दिसत नाही.

नगर परिषदेच्या काळात परवानगी दिलेल्या सर्व ४० टपरीधारकांची लीज संपली आहे. पुन्हा नव्याने लीज वाढवून देण्याचा विचार नाही. सर्व टपऱ्या काढून पटेल यांचा पुतळा नागरिकांना दिसेल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आज महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.मागील वर्षी शहागंज चमन येथील टपऱ्यांच्या मुद्यावरून दंगल भडकली होती. दंगलीत १३ पेक्षा अधिक टपऱ्यांना टार्गेट करण्यात आले होते. महापालिकेने मागील वर्षीही सर्व टपऱ्या काढून घेण्याची भूमिका घेतली होती. टपऱ्या रिकाम्या करून त्या काढण्यासाठी अतिक्रमण हटाव पथकही तैनात करण्यात आले होते. ऐनवेळी एमआयएम नगरसेवकांनी गोंधळ घालत मनपाच्या पथकाला पिटाळून लावले होते. मागील चार दिवसांपासून महापालिकेत शिवेसना विरुद्ध एमआयएम असा सामना रंगला आहे. 

सोमवारी एमआयएम नगरसेवकांनी महापौरांच्या विरोधात धरणे आंदोलन केले. त्यामुळे आज महापौरांनी शहागंज चमन येथे पटेल यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. सोबत चंद्रकांत खैरेही उपस्थित होते. पाहणी दौऱ्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना महापौरांनी चमनमधील ४० अनधिकृत टपऱ्या लवकरच पोलीस बंदोबस्तात काढण्यात येतील. वल्लभभाई पटेल हे राष्ट्रपुरुष होते. त्यांची प्रतिमा औरंगाबादकरांना ठळकपणे दिसावी हा त्यामागचा हेतू आहे. कोणाला बेरोजगार करणे हा आमचा हेतू नाही. चमन परिसर सुशोभीत दिसावा, शहराच्या वैभवात थोडीशी भर पडावी यादृष्टीने लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येत आहे.

एमआयएमची कोंडीशहागंज चमन येथील व्यापाऱ्यांना पाठिंबा दर्शवून एमआयएमने मागील वर्षी राजकारण केल्याचे सर्वश्रुत होते. हाच धागा पकडत आता सेनेने कायद्याच्या चौकटीत एमआयएमची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी चमनमधील व्यापारी न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांच्याकडून भाडे घ्यावे, असे मनपाला आदेशित केले होते. मनपानेही एकाच वर्षाचे भाडे भरून घेतले होते. आता व्यापाऱ्यांकडे कोणतीच लीज, भाडेकरार नाही. त्यामुळे जागा रिकामी करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमणAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv Senaशिवसेना