शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

महानगरपालिका शहागंजमधील ४० टपऱ्या काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 18:27 IST

सेनेने कायद्याच्या चौकटीत एमआयएमची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे नगर परिषदेच्या काळातील करारही संपला शहागंज चमन येथे वल्लभभाई पटेल यांचा नवीन पुतळा उभारण्यात आला आहे.

औरंगाबाद : शहागंज चमन येथे वल्लभभाई पटेल यांचा नवीन पुतळा उभारण्यात आला आहे. या भागात सुशोभीकरणाचे काम मनपाने हाती घेतले आहे. चमनच्या तिन्ही बाजूंनी व्यापाऱ्यांनी टपऱ्या थाटल्या आहेत. त्यामुळे पुतळा अजिबात दिसत नाही.

नगर परिषदेच्या काळात परवानगी दिलेल्या सर्व ४० टपरीधारकांची लीज संपली आहे. पुन्हा नव्याने लीज वाढवून देण्याचा विचार नाही. सर्व टपऱ्या काढून पटेल यांचा पुतळा नागरिकांना दिसेल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आज महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.मागील वर्षी शहागंज चमन येथील टपऱ्यांच्या मुद्यावरून दंगल भडकली होती. दंगलीत १३ पेक्षा अधिक टपऱ्यांना टार्गेट करण्यात आले होते. महापालिकेने मागील वर्षीही सर्व टपऱ्या काढून घेण्याची भूमिका घेतली होती. टपऱ्या रिकाम्या करून त्या काढण्यासाठी अतिक्रमण हटाव पथकही तैनात करण्यात आले होते. ऐनवेळी एमआयएम नगरसेवकांनी गोंधळ घालत मनपाच्या पथकाला पिटाळून लावले होते. मागील चार दिवसांपासून महापालिकेत शिवेसना विरुद्ध एमआयएम असा सामना रंगला आहे. 

सोमवारी एमआयएम नगरसेवकांनी महापौरांच्या विरोधात धरणे आंदोलन केले. त्यामुळे आज महापौरांनी शहागंज चमन येथे पटेल यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. सोबत चंद्रकांत खैरेही उपस्थित होते. पाहणी दौऱ्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना महापौरांनी चमनमधील ४० अनधिकृत टपऱ्या लवकरच पोलीस बंदोबस्तात काढण्यात येतील. वल्लभभाई पटेल हे राष्ट्रपुरुष होते. त्यांची प्रतिमा औरंगाबादकरांना ठळकपणे दिसावी हा त्यामागचा हेतू आहे. कोणाला बेरोजगार करणे हा आमचा हेतू नाही. चमन परिसर सुशोभीत दिसावा, शहराच्या वैभवात थोडीशी भर पडावी यादृष्टीने लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येत आहे.

एमआयएमची कोंडीशहागंज चमन येथील व्यापाऱ्यांना पाठिंबा दर्शवून एमआयएमने मागील वर्षी राजकारण केल्याचे सर्वश्रुत होते. हाच धागा पकडत आता सेनेने कायद्याच्या चौकटीत एमआयएमची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी चमनमधील व्यापारी न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांच्याकडून भाडे घ्यावे, असे मनपाला आदेशित केले होते. मनपानेही एकाच वर्षाचे भाडे भरून घेतले होते. आता व्यापाऱ्यांकडे कोणतीच लीज, भाडेकरार नाही. त्यामुळे जागा रिकामी करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमणAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv Senaशिवसेना