शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून तयारी सुरू

By | Updated: November 28, 2020 04:16 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने मागील पाच वर्षांपासून देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान हाती घेतले आहे. या उपक्रमात मागील वर्षी औरंगाबाद ...

औरंगाबाद : केंद्र शासनाने मागील पाच वर्षांपासून देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान हाती घेतले आहे. या उपक्रमात मागील वर्षी औरंगाबाद शहराने ४५ वा क्रमांक मिळविला होता. क्रमवारीत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, डिसेंबर महिन्यात प्रशासन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यावर सर्वाधिक भर देणार आहे. डिसेंबर अखेर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाचे पथक शहरात सर्वेक्षणासाठी येईल.

शहरात कचरा कोंडी निर्माण झाल्यानंतर राज्य शासनाने १४८ कोटी रुपये घनकचऱ्यासाठी मंजूर केले. आतापर्यंत ८० ते ९० कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या निधीतून महापालिकेने चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया केंद्र यशस्वीरित्या उभे केले. मागील दीड वर्षांपासून या केंद्रात तब्बल दीडशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. पडेगाव येथेही दीडशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली आहे. हरसुल येथील प्रकल्प उभारणी सुरू आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील नियमावलीनुसार महापालिका डिसेंबर महिन्यात कचरा प्रक्रियेवर सर्वाधिक भर देणार आहे. महिनाभरात शहरात सौंदर्यकरणावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

मोठ्या वसाहतींना तेथेच प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण

शहरातील मोठ्या वसाहतींमधील नागरिकांना कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण महापालिकेकडून देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्याच कचऱ्यापासून तयार केलेल्या खताचा वापर करावा या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. काही वसाहतींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली.

कचरावेचकांना प्रक्रियेत सामावून घेणार

शहरातील घनकचरा व्यवस्थापनात कचरावेचकांची खूप मोठी भूमिका आहे. महापालिकेने दिवाळीत माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविला. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात टाकाऊ वस्तू महापालिकेला दिल्या. वर्षभर या वस्तू कचऱ्यात न जाता कचरावेचकांना कशा पद्धतीने मिळू शकतील या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.