शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून तयारी सुरू

By | Updated: November 28, 2020 04:16 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने मागील पाच वर्षांपासून देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान हाती घेतले आहे. या उपक्रमात मागील वर्षी औरंगाबाद ...

औरंगाबाद : केंद्र शासनाने मागील पाच वर्षांपासून देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान हाती घेतले आहे. या उपक्रमात मागील वर्षी औरंगाबाद शहराने ४५ वा क्रमांक मिळविला होता. क्रमवारीत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, डिसेंबर महिन्यात प्रशासन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यावर सर्वाधिक भर देणार आहे. डिसेंबर अखेर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाचे पथक शहरात सर्वेक्षणासाठी येईल.

शहरात कचरा कोंडी निर्माण झाल्यानंतर राज्य शासनाने १४८ कोटी रुपये घनकचऱ्यासाठी मंजूर केले. आतापर्यंत ८० ते ९० कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या निधीतून महापालिकेने चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया केंद्र यशस्वीरित्या उभे केले. मागील दीड वर्षांपासून या केंद्रात तब्बल दीडशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. पडेगाव येथेही दीडशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली आहे. हरसुल येथील प्रकल्प उभारणी सुरू आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील नियमावलीनुसार महापालिका डिसेंबर महिन्यात कचरा प्रक्रियेवर सर्वाधिक भर देणार आहे. महिनाभरात शहरात सौंदर्यकरणावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

मोठ्या वसाहतींना तेथेच प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण

शहरातील मोठ्या वसाहतींमधील नागरिकांना कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण महापालिकेकडून देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्याच कचऱ्यापासून तयार केलेल्या खताचा वापर करावा या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. काही वसाहतींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली.

कचरावेचकांना प्रक्रियेत सामावून घेणार

शहरातील घनकचरा व्यवस्थापनात कचरावेचकांची खूप मोठी भूमिका आहे. महापालिकेने दिवाळीत माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविला. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात टाकाऊ वस्तू महापालिकेला दिल्या. वर्षभर या वस्तू कचऱ्यात न जाता कचरावेचकांना कशा पद्धतीने मिळू शकतील या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.