शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
4
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
5
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
6
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
7
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
8
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
9
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
10
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
11
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
12
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
13
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
14
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
15
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
16
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
17
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
18
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
19
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
20
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल

स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून तयारी सुरू

By | Updated: November 28, 2020 04:16 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने मागील पाच वर्षांपासून देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान हाती घेतले आहे. या उपक्रमात मागील वर्षी औरंगाबाद ...

औरंगाबाद : केंद्र शासनाने मागील पाच वर्षांपासून देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान हाती घेतले आहे. या उपक्रमात मागील वर्षी औरंगाबाद शहराने ४५ वा क्रमांक मिळविला होता. क्रमवारीत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, डिसेंबर महिन्यात प्रशासन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यावर सर्वाधिक भर देणार आहे. डिसेंबर अखेर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाचे पथक शहरात सर्वेक्षणासाठी येईल.

शहरात कचरा कोंडी निर्माण झाल्यानंतर राज्य शासनाने १४८ कोटी रुपये घनकचऱ्यासाठी मंजूर केले. आतापर्यंत ८० ते ९० कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या निधीतून महापालिकेने चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया केंद्र यशस्वीरित्या उभे केले. मागील दीड वर्षांपासून या केंद्रात तब्बल दीडशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. पडेगाव येथेही दीडशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली आहे. हरसुल येथील प्रकल्प उभारणी सुरू आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील नियमावलीनुसार महापालिका डिसेंबर महिन्यात कचरा प्रक्रियेवर सर्वाधिक भर देणार आहे. महिनाभरात शहरात सौंदर्यकरणावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

मोठ्या वसाहतींना तेथेच प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण

शहरातील मोठ्या वसाहतींमधील नागरिकांना कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण महापालिकेकडून देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्याच कचऱ्यापासून तयार केलेल्या खताचा वापर करावा या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. काही वसाहतींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली.

कचरावेचकांना प्रक्रियेत सामावून घेणार

शहरातील घनकचरा व्यवस्थापनात कचरावेचकांची खूप मोठी भूमिका आहे. महापालिकेने दिवाळीत माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविला. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात टाकाऊ वस्तू महापालिकेला दिल्या. वर्षभर या वस्तू कचऱ्यात न जाता कचरावेचकांना कशा पद्धतीने मिळू शकतील या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.