शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

ऐतिहासिक नहरींच्या संवर्धनासाठी महापालिकेने ठोस कारवाई करणे जरुरी; खंडपीठाची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:21 IST

सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या शहरातील ऐतिहासिक नहरींच्या संवर्धनासाठी महापालिकेने ठोस कारवाई करणे जरुरी आहे. महापालिकेने याबाबत निर्णय घेतला नाही, तर महापालिका आयुक्तांना व्यक्तिश: बोलवावे लागेल, असे औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी सूचित केले.

ठळक मुद्देअन्यथा महापालिका आयुक्तांना व्यक्तिश: बोलवावे लागेल

औरंगाबाद : सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या शहरातील ऐतिहासिक नहरींच्या संवर्धनासाठी महापालिकेने ठोस कारवाई करणे जरुरी आहे. महापालिकेने याबाबत निर्णय घेतला नाही, तर महापालिका आयुक्तांना व्यक्तिश: बोलवावे लागेल, असे औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी सूचित केले.अ‍ॅड. अंजली दुबे-बाजपेयी यांनी महापालिकेतर्फे सविस्तर माहितीसह शपथपत्र सादर करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. खंडपीठाने या सुमोटो याचिकेची पुढील सुनावणी २२ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही उत्तरासह त्यांचा प्रतिनिधी पुढील सुनावणीस उपस्थित राहील, याची काळजी घ्यावी, असेही खंडपीठाने सोमवारी (दि.४) सुनावणीच्या वेळी सूचित केले.सोमवारी सुनावणीवेळी न्यायालयाचे मित्र (अमिकस क्यूरी) अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, २००३ पासून याचिका प्रलंबित आहे. मात्र, महापालिका काहीही कारवाई करीत नाही. ऐतिहासिक नहरींच्या सर्वेक्षणासाठी २० लाख रुपये देण्यासही महापालिका तयार नाही. सर्वेक्षणासाठी आर्किटेक्टने असमर्थता दर्शविल्याचे महापालिकेने सांगितले, ते खोटे आहे. आर्किटेक्ट देशपांडे यांनी नहर-ए-पाणचक्कीच्या दोन नहरींचा अहवाल तयार केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही.खंडपीठाने आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी खंडपीठास सांगितले की, नहर-ए-पाणचक्कीचा अहवाल तयार असून २०१४ सालीच तो खंडपीठात सादर केला होता. तसेच सहा महिन्यांपूर्वीच सुधारित ‘इस्टिमेट’ही सादर केले आहे. नहर-ए-पाणचक्कीच्या डागडुजीचा प्राथमिक अंदाजे खर्च १७ कोटी ३४ लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.सहायक सरकारी वकील स्वप्नील जोशी यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, राज्य पुरातत्व खात्याची परवानगी न घेता अनेक वर्षांपासून महाराष्टÑ वक्फ बोर्डाचे कार्यालय पाणचक्की परिसरात कार्यरत आहे. जुन्या ऐतिहासिक बांधकामाला बाधा पोहोचेल अशाप्रकारे वक्फ बोर्डाने बांधकामात बदल केले आहेत. शिवाय कुठलीही परवानगी न घेता पर्यटकांकडून प्रवेश फी वसूल केली जाते. यासंदर्भात राज्य पुरातत्व खात्याने २०१७ पासून वक्फ बोर्डाला वारंवार नोटिसा बजावल्या आहेत. केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडेही सुनावणीस हजर होते.चौकटऐतिहासिक नहरींच्या पाण्यावर नागरिक दरोडा टाकत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वी प्रकाशित केले होते. त्याची दखल स्वत:हून खंडपीठाने घेतली होती. खंडपीठाच्या निर्देशानुसार २०१३ पासून नहरींच्या सर्वेक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwindmillपानचक्की