शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

मनपा आयुक्त मिळाले, पोलीस आयुक्त कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:00 IST

औरंगाबाद शहरात जानेवारीपासून चार दंगली झाल्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा या शहराला दोन महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाही. विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत.

ठळक मुद्दे ११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीमुळे आजही शहरात तणावपूर्ण शांतता आहे अशा परिस्थितीत कायमस्वरूपी पोलीस आयुक्त कधी देणार, असा सवाल औरंगाबादकर उपस्थित करू लागले आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात जानेवारीपासून चार दंगली झाल्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा या शहराला दोन महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाही. विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. ११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीमुळे आजही शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अशा परिस्थितीत कायमस्वरूपी पोलीस आयुक्त कधी देणार, असा सवाल औरंगाबादकर उपस्थित करू लागले आहेत.

मिटमिटा येथे कचऱ्याच्या प्रश्नावरून झालेली दंगल व्यवस्थित हाताळली नाही, असा आरोप विविध लोकप्रतिनिधींनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यावर केला. लोकप्रतिनिधींच्या आरोपांची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना १६ मार्च रोजी एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले. मिटमिट्याच्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली.

आयुक्तांच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी संपला. मात्र त्यांना रुजू होण्यास शासनाने अनुकूलता दर्शविली नाही. परिणामी रजेवर पाठविण्यात आलेले यशस्वी यादव हे पुन्हा आयुक्तालयात रुजू होणार नाही, हे स्पष्ट झाले. १६ मार्चपासून शहर पोलीस आयुक्तालयाचा अतिरिक्त पदभार विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे सांभाळत आहेत. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे हे नियोजित रजेवर बाहेरगावी होते तर ११ मे रोजी रात्री मुंबईला एका पोलीस अधिकाऱ्यांच्या अंत्यविधीसाठी भारंबे गेले अन् त्याच रात्री शहरात दंगल उसळली. 

पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दंगलीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र संपूर्ण दंगल आटोक्यात आणण्यात त्यांना ८ ते ९ तासांचा कालावधी लागला. अन् दंगलीत दोन जणांना प्राणास मुकावे लागले.  कोट्यवधींची हानी झाली. जानेवारीपासून आजपर्यंत औरंगाबादेत लहान मोठ्या पाच दंगली झाल्या.  दंगलीनंतरही  या घटनांची गंभीर दखल घेऊन शासन तातडीने कायमस्वरुपी पोलीस आयुक्त देतील, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाने शहरवासीयांच्या अपेक्षांवर पाणी फे रले. बदल्या करणारे वरिष्ठ अधिकारीच रजेवर असल्याने शहराला पोलीस आयुक्त मिळू शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद