शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

मनपा आयुक्त मिळाले, पोलीस आयुक्त कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:00 IST

औरंगाबाद शहरात जानेवारीपासून चार दंगली झाल्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा या शहराला दोन महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाही. विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत.

ठळक मुद्दे ११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीमुळे आजही शहरात तणावपूर्ण शांतता आहे अशा परिस्थितीत कायमस्वरूपी पोलीस आयुक्त कधी देणार, असा सवाल औरंगाबादकर उपस्थित करू लागले आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात जानेवारीपासून चार दंगली झाल्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा या शहराला दोन महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाही. विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. ११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीमुळे आजही शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अशा परिस्थितीत कायमस्वरूपी पोलीस आयुक्त कधी देणार, असा सवाल औरंगाबादकर उपस्थित करू लागले आहेत.

मिटमिटा येथे कचऱ्याच्या प्रश्नावरून झालेली दंगल व्यवस्थित हाताळली नाही, असा आरोप विविध लोकप्रतिनिधींनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यावर केला. लोकप्रतिनिधींच्या आरोपांची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना १६ मार्च रोजी एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले. मिटमिट्याच्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली.

आयुक्तांच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी संपला. मात्र त्यांना रुजू होण्यास शासनाने अनुकूलता दर्शविली नाही. परिणामी रजेवर पाठविण्यात आलेले यशस्वी यादव हे पुन्हा आयुक्तालयात रुजू होणार नाही, हे स्पष्ट झाले. १६ मार्चपासून शहर पोलीस आयुक्तालयाचा अतिरिक्त पदभार विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे सांभाळत आहेत. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे हे नियोजित रजेवर बाहेरगावी होते तर ११ मे रोजी रात्री मुंबईला एका पोलीस अधिकाऱ्यांच्या अंत्यविधीसाठी भारंबे गेले अन् त्याच रात्री शहरात दंगल उसळली. 

पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दंगलीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र संपूर्ण दंगल आटोक्यात आणण्यात त्यांना ८ ते ९ तासांचा कालावधी लागला. अन् दंगलीत दोन जणांना प्राणास मुकावे लागले.  कोट्यवधींची हानी झाली. जानेवारीपासून आजपर्यंत औरंगाबादेत लहान मोठ्या पाच दंगली झाल्या.  दंगलीनंतरही  या घटनांची गंभीर दखल घेऊन शासन तातडीने कायमस्वरुपी पोलीस आयुक्त देतील, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाने शहरवासीयांच्या अपेक्षांवर पाणी फे रले. बदल्या करणारे वरिष्ठ अधिकारीच रजेवर असल्याने शहराला पोलीस आयुक्त मिळू शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद