शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्त मिळाले, पोलीस आयुक्त कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:00 IST

औरंगाबाद शहरात जानेवारीपासून चार दंगली झाल्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा या शहराला दोन महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाही. विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत.

ठळक मुद्दे ११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीमुळे आजही शहरात तणावपूर्ण शांतता आहे अशा परिस्थितीत कायमस्वरूपी पोलीस आयुक्त कधी देणार, असा सवाल औरंगाबादकर उपस्थित करू लागले आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात जानेवारीपासून चार दंगली झाल्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा या शहराला दोन महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाही. विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. ११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीमुळे आजही शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अशा परिस्थितीत कायमस्वरूपी पोलीस आयुक्त कधी देणार, असा सवाल औरंगाबादकर उपस्थित करू लागले आहेत.

मिटमिटा येथे कचऱ्याच्या प्रश्नावरून झालेली दंगल व्यवस्थित हाताळली नाही, असा आरोप विविध लोकप्रतिनिधींनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यावर केला. लोकप्रतिनिधींच्या आरोपांची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना १६ मार्च रोजी एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले. मिटमिट्याच्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली.

आयुक्तांच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी संपला. मात्र त्यांना रुजू होण्यास शासनाने अनुकूलता दर्शविली नाही. परिणामी रजेवर पाठविण्यात आलेले यशस्वी यादव हे पुन्हा आयुक्तालयात रुजू होणार नाही, हे स्पष्ट झाले. १६ मार्चपासून शहर पोलीस आयुक्तालयाचा अतिरिक्त पदभार विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे सांभाळत आहेत. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे हे नियोजित रजेवर बाहेरगावी होते तर ११ मे रोजी रात्री मुंबईला एका पोलीस अधिकाऱ्यांच्या अंत्यविधीसाठी भारंबे गेले अन् त्याच रात्री शहरात दंगल उसळली. 

पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दंगलीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र संपूर्ण दंगल आटोक्यात आणण्यात त्यांना ८ ते ९ तासांचा कालावधी लागला. अन् दंगलीत दोन जणांना प्राणास मुकावे लागले.  कोट्यवधींची हानी झाली. जानेवारीपासून आजपर्यंत औरंगाबादेत लहान मोठ्या पाच दंगली झाल्या.  दंगलीनंतरही  या घटनांची गंभीर दखल घेऊन शासन तातडीने कायमस्वरुपी पोलीस आयुक्त देतील, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाने शहरवासीयांच्या अपेक्षांवर पाणी फे रले. बदल्या करणारे वरिष्ठ अधिकारीच रजेवर असल्याने शहराला पोलीस आयुक्त मिळू शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद