शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

भाड्याच्या गर्भाशयासाठी मुंबईकर औरंगाबादमध्ये

By संतोष हिरेमठ | Updated: August 5, 2022 10:23 IST

आठ महिन्यांपासून भाडोत्री गर्भाशय मिळणे थांबल्याचा दावा

- संतोष हिरेमठ लोकमत न्यूज नेटवर्क   औरंगाबाद : दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून ‘गर्भाशय भाड्याने मिळेल का’ अशी विचारणा करीत अनेक जण औरंगाबाद गाठत आहेत. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून गर्भाशय भाड्याने देण्याचा ‘उद्योग’ बंद असल्याचा दावा केला जात आहे. कारण  नव्या सरोगसी ॲक्टनुसार अंमलबजावणी करण्यासाठी डिसेंबर २०२१ पासून सरोगसी मदर्स होणे थांबले आहे. सध्या सरोगसी मदरसंदर्भात उपचार करणाऱ्या केंद्रांची नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. यावर  आता महापालिकेच्या आरोग्य विभागाची देखरेख राहणार आहे. यामुळे सरोगसी मदर्स उपलब्ध करून देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.  

बाॅलिवूडमधील काही अभिनेत्रींनी ‘सरोगसी’च्या माध्यमातून आई होण्याचे सुख प्राप्त केले. ‘सरोगसी’ म्हणजे दुसऱ्या महिलेचे गर्भाशय भाड्याने घेऊन तिच्या मदतीने अपत्य जन्माला घालणे होय. ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही, त्यांना या माध्यमातून मूल  प्राप्त होऊ शकते; परंतु ‘सरोगसी’ काहींसाठी ‘धंदा’ बनला आहे. सरोगेट मदर्स उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सी उदयास आल्या होत्या; परंतु  नवीन ॲक्टच्या माध्यमातून त्यावर अंकुश लागला आहे.   

गर्भपिशवी काढलेली असेल, गर्भाशय आतून खराब असेल, गर्भ राहत नसेल तर, अस्तर खराब असेल तर अशावेळी सरोगसी मदरची मदत घेतली जाते.  दिल्ली, मुंबईच्या तुलनेत औरंगाबादला उपचार परवडणारे आहेत. - डाॅ. मनीषा काकडे, वंध्यत्व निवारणतज्ज्ञ  

औरंगाबादेत २० सेंटर्स    सरोगसी मदर्ससंदर्भात उपचार करणारे औरंगाबादेत जवळपास २० सेंटर आहेत.     या सेंटरमध्ये केवळ उपचाराची जबाबदारी पार पाडली जाते. मात्र, दाम्पत्य आणि सरोगेट मदर्स तसेच एजन्सी यांच्यात होणारे आर्थिक व्यवहार या सेंटरबाहेरच होत असे, असे सांगण्यात आले.     प्रत्येकी एक सरोगसी मदर म्हटले तरी महिन्याकाठी, वर्षाकाठी हा आकडा, त्यातून होणारी आर्थिक देवाण-घेवाण ही जानेवारीपूर्वी किती होती, याचा अंदाज येतो. 

शासनच देईल मंजुरी ज्याप्रमाणे किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया होते, त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीत यापुढे ही सगळी प्रक्रिया होईल. सरोगसी मदर्स होण्यासाठी आता नातेवाईक, मैत्रीण असे लोक लागतील.  - डाॅ. अनुराधा शेवाळे, आयव्हीएफ कन्सल्टंट

अनेक दाम्पत्य प्रतीक्षेतअनेक दाम्पत्य सरोगसी मदर्सच्या माध्यमातून आई-बाबा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु जानेवारीपासून सरोगसी मदर्स होणे थांबले आहे. देशभर हीच परिस्थिती आहे.   - डाॅ. अपर्णा राऊळ, आयव्हीएफ स्पेशालिस्ट