शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

२७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:55 IST

औरंगाबाद शहराहून तब्बल एकवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुन्हा एकदा उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद शहराहून तब्बल एकवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुन्हा एकदा उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडियाकडून २७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर अशी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा चालविण्यात येणार आहे. त्यामुळे उदयपूरसाठी विमानसेवेची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर दिवाळीपूर्वी संपणार आहे आणि औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ होणार आहे.

औरंगाबाद शहर हे दोन दशकांपूर्वी राजस्थानशी विमानसेवेने जोडलेले होते. त्यामुळे शहरात जयपूर-उदयपूरहून येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या होती. देशांतर्गत पर्यटनाला मोठी चालना मिळत होती. औरंगाबादला आल्यानंतर जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणीला पर्यटक भेट देत. त्यातून पर्यटन व्यवसायदेखील वाढत असे; परंतु ही विमानसेवा बंद झाली आणि पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला. वीस वर्षांपासून ही विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

१२ जून रोजी दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळाची एअर इंडियाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी आणि कार्यकारी संचालक मीनाक्षी मलिक यांच्यासोबत बैठक झाली होती. यावेळी सर्वांनी एकत्रित मागणी केल्याने एअर इंडियाकडून ही विमानसेवा दिवाळीपूर्वी सुरू करण्यासाठी आश्वासन मिळाले होते. आश्वासनानुसार अखेर एअर इंडियाने दिवाळीपूर्वी ही विमानसेवा सुरु करण्याचे जाहीर केले आहे.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेल्या शिष्टमंडळात हॉटेल उद्योजक सुनीत कोठारी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले, सचिव नितीन गुप्ता, इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरचे अध्यक्ष प्रणब सरकार आणि इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरचे उपाध्यक्ष राजीव मेहरा यांचा समावेश होता. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAir Indiaएअर इंडिया