शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिखलमय गणेशनगर झाले गुळगुळीत ; न्यू गणेशनगर, मोतीनगरचे काय ?

By साहेबराव हिवराळे | Updated: November 23, 2023 20:32 IST

जलवाहिनी, ड्रेनेजलाईन टाकली, परंतु टँकरच्या पाण्यावर १२ महिने विसंबून

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगरचा जवळील भाग म्हणून गणेशनगर, न्यू गणेशनगर, मोतीनगर आदी परिसर ओळखला जातो. या परिसरातील वसाहतींत जाताना रस्ते गुळगुळीत झाले आहेत. पण, सुनियोजित विस्तारच रखडला आहे.

प्रश्न काय आहेत?सिडको एन-४च्या पाठीमागे शिवाजीनगर मागील या वसाहती आहेत. येथे खालील समस्यांनी डोके वर काढले आहे. ड्रेनेजलाईन नाही. नवीन जलवाहिनी टाकून १२ महिने झाले असले तरी टँकरवर विसंबून राहावे लागत आहे. ठिकठिकाणचे बोअर आटले आहेत. नवीन विकास कामांना मंजुरी मिळूनही कामे तडीस नेली गेली नाहीत. भागातील काही रस्ते अजूनही कच्चे असल्याने पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागते.

सुशिक्षित तसेच स्वयंरोजगाराचे वास्तव्य...गणेशनगर, न्यू गणेशनगर, मोतीनगर अशा वसाहतींत राहणाऱ्यांमध्ये डॉक्टर, वकील, बँकिंग सेक्टर तसेच काॅर्पोरेट सेक्टरमध्ये असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांचे येथे वास्तव्य आहे. गरीब आणि हातावर काम करणाऱ्यांच्या मुलांनी शिक्षणातून प्रगती केली आहे. सिडको परिसरासारखे आपणही जीवन जगावे असाच प्रत्येकाचा संकल्प आहे. त्यातुलनेत परिसराचा विकास होताना दिसत आहे.- ॲड. नागोराव डोंगरे 

पावसाळ्यात टँकरला होते अडचण...पिण्याच्या पाण्याचे १२ महिने संकट कायम असून, बोअरवेलच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. टँकरच्या फेऱ्या ड्रमवर अवलंबून असतात, मनपाकडे ड्रमनुसार पैसे भरल्यानंतरच टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात टँकर येण्यास अडचणी येतात. त्यामुळे जनतेला गैरसोयीला सामोरे जावे लागते. अजून किती दिवस हा त्रास सुरू राहणार ?- रुक्मिणीबाई आदमाने

रस्त्याचा प्रश्न सोडवावा...इतर भागातील रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला असून, उर्वरित गल्ल्यातील रस्ते चिखलात रुतलेले असतात. एरवी शाळकरी मुलांची नेआण करणाऱ्या वाहनांना देखील घरापर्यंत येताना अडसर निर्माण होतो. तो दूर होणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्याचा प्रश्न सुटला तसाच विविध गल्लीतही रस्ते व्हावेत, अशी अपेक्षा नागरिकांतून आहे.- श्याम कदम

आवश्यक ठिकाणी पथदिवे टाकावसाहतीत विविध गल्ल्यात विजेचे खांब नसल्याने वीज पुरवठा दुरवरून घरापर्यंत घ्यावा लागतो. पथदिवेही नसल्याने कामगार व नोकरदरांना अंधारातून घर गाठावे लागते. गल्लीतील अंधार हटविण्यासाठी पथदिवे बसविण्याची नितांत गरज आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.- सुरेखा मांजरे

उर्वरित कामे पूर्ण होणार...शिवाजीनगर ते गोकुळ स्वीटपर्यंत विकास आराखड्याखाली महत्त्वपूर्ण रस्त्याचे रखडलेले काम करण्यास यश आले. गणेशनगर, न्यू गणेशनगर, मोतीनगर, भागातील नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय होता, ड्रेनेज लाइनचा तो पूर्ण केला असून, नवीन जलवाहिनी टाकलेली आहे, मनपाकडून पाणी पुरवठा होईल त्यावेळी सर्वांना मुबलक पाणी येणार आहे. टँकरच्या पाण्याशिवाय सध्या नागरिकांना पर्याय नाही. विकास कामे मंजूर असून तेही पूर्ण होणार आहेत.- माजी नगरसेवक कैलास गायकवाड 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका