शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

चिखलमय गणेशनगर झाले गुळगुळीत ; न्यू गणेशनगर, मोतीनगरचे काय ?

By साहेबराव हिवराळे | Updated: November 23, 2023 20:32 IST

जलवाहिनी, ड्रेनेजलाईन टाकली, परंतु टँकरच्या पाण्यावर १२ महिने विसंबून

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगरचा जवळील भाग म्हणून गणेशनगर, न्यू गणेशनगर, मोतीनगर आदी परिसर ओळखला जातो. या परिसरातील वसाहतींत जाताना रस्ते गुळगुळीत झाले आहेत. पण, सुनियोजित विस्तारच रखडला आहे.

प्रश्न काय आहेत?सिडको एन-४च्या पाठीमागे शिवाजीनगर मागील या वसाहती आहेत. येथे खालील समस्यांनी डोके वर काढले आहे. ड्रेनेजलाईन नाही. नवीन जलवाहिनी टाकून १२ महिने झाले असले तरी टँकरवर विसंबून राहावे लागत आहे. ठिकठिकाणचे बोअर आटले आहेत. नवीन विकास कामांना मंजुरी मिळूनही कामे तडीस नेली गेली नाहीत. भागातील काही रस्ते अजूनही कच्चे असल्याने पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागते.

सुशिक्षित तसेच स्वयंरोजगाराचे वास्तव्य...गणेशनगर, न्यू गणेशनगर, मोतीनगर अशा वसाहतींत राहणाऱ्यांमध्ये डॉक्टर, वकील, बँकिंग सेक्टर तसेच काॅर्पोरेट सेक्टरमध्ये असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांचे येथे वास्तव्य आहे. गरीब आणि हातावर काम करणाऱ्यांच्या मुलांनी शिक्षणातून प्रगती केली आहे. सिडको परिसरासारखे आपणही जीवन जगावे असाच प्रत्येकाचा संकल्प आहे. त्यातुलनेत परिसराचा विकास होताना दिसत आहे.- ॲड. नागोराव डोंगरे 

पावसाळ्यात टँकरला होते अडचण...पिण्याच्या पाण्याचे १२ महिने संकट कायम असून, बोअरवेलच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. टँकरच्या फेऱ्या ड्रमवर अवलंबून असतात, मनपाकडे ड्रमनुसार पैसे भरल्यानंतरच टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात टँकर येण्यास अडचणी येतात. त्यामुळे जनतेला गैरसोयीला सामोरे जावे लागते. अजून किती दिवस हा त्रास सुरू राहणार ?- रुक्मिणीबाई आदमाने

रस्त्याचा प्रश्न सोडवावा...इतर भागातील रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला असून, उर्वरित गल्ल्यातील रस्ते चिखलात रुतलेले असतात. एरवी शाळकरी मुलांची नेआण करणाऱ्या वाहनांना देखील घरापर्यंत येताना अडसर निर्माण होतो. तो दूर होणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्याचा प्रश्न सुटला तसाच विविध गल्लीतही रस्ते व्हावेत, अशी अपेक्षा नागरिकांतून आहे.- श्याम कदम

आवश्यक ठिकाणी पथदिवे टाकावसाहतीत विविध गल्ल्यात विजेचे खांब नसल्याने वीज पुरवठा दुरवरून घरापर्यंत घ्यावा लागतो. पथदिवेही नसल्याने कामगार व नोकरदरांना अंधारातून घर गाठावे लागते. गल्लीतील अंधार हटविण्यासाठी पथदिवे बसविण्याची नितांत गरज आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.- सुरेखा मांजरे

उर्वरित कामे पूर्ण होणार...शिवाजीनगर ते गोकुळ स्वीटपर्यंत विकास आराखड्याखाली महत्त्वपूर्ण रस्त्याचे रखडलेले काम करण्यास यश आले. गणेशनगर, न्यू गणेशनगर, मोतीनगर, भागातील नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय होता, ड्रेनेज लाइनचा तो पूर्ण केला असून, नवीन जलवाहिनी टाकलेली आहे, मनपाकडून पाणी पुरवठा होईल त्यावेळी सर्वांना मुबलक पाणी येणार आहे. टँकरच्या पाण्याशिवाय सध्या नागरिकांना पर्याय नाही. विकास कामे मंजूर असून तेही पूर्ण होणार आहेत.- माजी नगरसेवक कैलास गायकवाड 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका