शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

Mucormycosis : अपुऱ्या इंजेक्शनमुळेच राज्यात म्युकरमायकोसिसचे अधिक मृत्यू; औरंगाबाद खंडपीठाची तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 16:04 IST

Death due to Mucormycosis १० ते १५ जूनदरम्यान केंद्र शासन वाढीव इंजेक्शनचा पुरवठा करेल, अशी अपेक्षाही खंडपीठाने व्यक्त केली.

ठळक मुद्देकिती इंजेक्शनचा दररोज पुरवठा झाला ? माहिती देण्याचे केंद्र शासनाला निर्देश

औरंगाबाद : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला अँफोटेरेसीन बी इंजेक्शनचा कमी पुरवठा होत असल्यामुळे येथे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी गुरुवारच्या सुनावणीत केंद्र शासनाच्या धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

१० ते १५ जूनदरम्यान केंद्र शासन वाढीव इंजेक्शनचा पुरवठा करेल, अशी अपेक्षाही खंडपीठाने व्यक्त केली. १० ते १५ जून २०२१ दरम्यान म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, त्यांच्यापैकी किती रुग्ण बरे झाले, किती रुग्णांचा मृत्यू झाला, याची माहिती मुख्य सरकारी वकिलांनी द्यावी. तसेच या रुग्णांच्या उपचारासाठी वरील कालावधीत किती इंजेक्शनचा पुरवठा झाला, याची माहिती पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे निर्देश दिले. पुढील तारखेस सादर करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी १६ जून रोजी ठेवली आहे.

९ जूनपर्यंत मराठवाड्यात म्युकरमायकोसिसच्या १४८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी सुनावणीवेळी सादर केली. केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात अशाच एका जनहित याचिकेत पश्चिम विभागाच्या औषध उपनियंत्रक डॉ. रुबिना बोस यांनी शपथपत्राद्वारे माहिती सादर केली की, एप्रिल महिन्यात अँफोटेरेसीन बीचे उत्पादन ६२,००० वायल्स, मे मध्ये १,४०,००० वायल्स वाढले होते. जूनमध्ये ३,५७,६०० वायल्स उत्पादन अपेक्षित आहे. महाराष्ट्राला १ ते ९ जूनदरम्यान ५३,४५० वायल्स, ४ जूनला २३,११० वायल्स आणि ९ जूनला ३०,३४० वायल्सचा पुरवठा करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात ६२८७ रुग्ण, ९ जूनपर्यंत १४८ रुग्णांचा मृत्यूम्युकरमायोसिसच्या प्रत्येक रुग्णाला दररोज ५ इंजेक्शन ४ ते ६ आठवडे द्यावे लागते. अपूर्ण पुरवठ्यामुळे त्याऐवजी प्रत्येक रुग्णाला केवळ १ अथवा २ इंजेक्शन दिले जातात, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे केंद्रशासनाने तातडीची पावले उचलून महाराष्ट्रासह इतर राज्यांना इंजेक्शनचा पुरवठा वाढविल्याशिवाय मृत्युदर कमी होणार नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. महाराष्ट्रात मृत्यूदर वाढण्याचे प्राथमिक कारण अपूर्ण इंजेक्शनचा पुरवठा असल्याकडे न्यायालयाचे मित्र ॲड. सत्यजित बोरा यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ