शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

राज्यशासनाच्या MSSC कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या भरतीला ५० टक्के उमेदवार गैरहजर

By योगेश पायघन | Updated: August 20, 2022 16:58 IST

राज्य राखीव पोलीस बल गटाकडून मुल्यांकन, ७ हजार पदांसाठी भरती प्रक्रीयेला सुरूवात

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ७ हजार कंत्राटी सुरक्षारक्षक पदासाठी भरती प्रक्रिया शनिवारी सकाळी सहा वाजता सुरू झाली. पहिल्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील बोलावलेल्या दीड हजारपैकी केवळ साडेसातशे उमेदवारांची मैदानी चाचणीसाठी उपस्थिती होती. ५० टक्के उमेदवारांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध नियोजनामुळे अवघ्या सात तासांत मैदानी चाचणीची प्रक्रीया पुर्ण झाली.

मार्च-एप्रिल २०२० मध्ये नियोजित भरती कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ७ हजार पदांसाठी राज्यभरातून १ लाख ३३ हजार ६९३ युवकांनी अर्ज आलेले होते. भरतीसाठी मैदानी चाचणीची जबाबदारी राज्यातील ९ राज्य राखीव पोलीस बल गटाकडे देण्यात आली आहे. नियमीत भरतीचा अनुभव असल्याने एसआरपीएफचे शिस्तबद्ध नियोजनाची चुनुक दिसून आली. दीड हजार उमेदवार अग्नीवीर भरतीसाठीही बोलावण्यात येत आहेत. मात्र, ती प्रक्रीया बारा ते १८ तासांपेक्षा अधिक वेळखाऊ असल्याचे दिसून येत असतांना सुरक्षा रक्षक भरतीची प्रक्रीया सुलभतेने व जलदगतीने पार पडल्याचे उमेदवार म्हणाले.

औरंगाबाद येथील गट क्रमांक १४ येथे अनुक्रमे औरंगाबाद, लातूर, बुलडाणा व नांदेड येथील १९ हजार ३२२ तरुणांची मैदानी चाचणी व गुणांकन होणार आहे. दररोज १५०० उमेदवारांना बोलवण्यात आले असून ५ सप्टेंबरला शेवटची चाचणी होणार आहे. सकाळी सहा वाजता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याने सकाळी चार वाजेपासून उमेदवार सातारा परिसरात जमा होत आहेत. राज्य राखीव पोलीस बलाच्या गटाच्या प्रवेशद्वाराजवळ उमेदवारांसाठी टेन्टची, पाणी, माफक दरात नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. समादेशक निमीत्त गोयल यांच्या मार्गदर्शनात पहिल्या दिवशीची प्रक्रीया सुटसुटीत व सुरळीत पार पडली.

सात तासांचे शिस्तबद्ध नियोजनबोलावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी व हजेरी घेण्यासाठी पाच पथक होते. तर शाररीक मोजणी करण्यासाठी उंची, वजन, छाती असे प्रत्येकी चार पथके होती. त्यानंतर कागदपत्र पडताळणी करून पन्नासच्या गटाने कवायत मैदान परिसरात १६०० मीटर धावण्याची चाचणी झाली. सुरूवात व शेवटच्या पाॅईंटला दोन रुग्णवाहीका, आरोग्य पथकांची उपस्थिती होती. तर शेवटच्या पाॅईंटवर वेळेनुसार गुणांकन करण्यासाठी गट करण्यात आले होते. बारावीतील टक्क्यांनुसार ५० गुण तर मैदानी चाचणीचे ५० गुण अशा १०० गुणांच्या मुल्यांकन राज्य राखीव पोलीस दलाकडून एकत्रिक गेल्यावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार