शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यशासनाच्या MSSC कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या भरतीला ५० टक्के उमेदवार गैरहजर

By योगेश पायघन | Updated: August 20, 2022 16:58 IST

राज्य राखीव पोलीस बल गटाकडून मुल्यांकन, ७ हजार पदांसाठी भरती प्रक्रीयेला सुरूवात

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ७ हजार कंत्राटी सुरक्षारक्षक पदासाठी भरती प्रक्रिया शनिवारी सकाळी सहा वाजता सुरू झाली. पहिल्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील बोलावलेल्या दीड हजारपैकी केवळ साडेसातशे उमेदवारांची मैदानी चाचणीसाठी उपस्थिती होती. ५० टक्के उमेदवारांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध नियोजनामुळे अवघ्या सात तासांत मैदानी चाचणीची प्रक्रीया पुर्ण झाली.

मार्च-एप्रिल २०२० मध्ये नियोजित भरती कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ७ हजार पदांसाठी राज्यभरातून १ लाख ३३ हजार ६९३ युवकांनी अर्ज आलेले होते. भरतीसाठी मैदानी चाचणीची जबाबदारी राज्यातील ९ राज्य राखीव पोलीस बल गटाकडे देण्यात आली आहे. नियमीत भरतीचा अनुभव असल्याने एसआरपीएफचे शिस्तबद्ध नियोजनाची चुनुक दिसून आली. दीड हजार उमेदवार अग्नीवीर भरतीसाठीही बोलावण्यात येत आहेत. मात्र, ती प्रक्रीया बारा ते १८ तासांपेक्षा अधिक वेळखाऊ असल्याचे दिसून येत असतांना सुरक्षा रक्षक भरतीची प्रक्रीया सुलभतेने व जलदगतीने पार पडल्याचे उमेदवार म्हणाले.

औरंगाबाद येथील गट क्रमांक १४ येथे अनुक्रमे औरंगाबाद, लातूर, बुलडाणा व नांदेड येथील १९ हजार ३२२ तरुणांची मैदानी चाचणी व गुणांकन होणार आहे. दररोज १५०० उमेदवारांना बोलवण्यात आले असून ५ सप्टेंबरला शेवटची चाचणी होणार आहे. सकाळी सहा वाजता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याने सकाळी चार वाजेपासून उमेदवार सातारा परिसरात जमा होत आहेत. राज्य राखीव पोलीस बलाच्या गटाच्या प्रवेशद्वाराजवळ उमेदवारांसाठी टेन्टची, पाणी, माफक दरात नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. समादेशक निमीत्त गोयल यांच्या मार्गदर्शनात पहिल्या दिवशीची प्रक्रीया सुटसुटीत व सुरळीत पार पडली.

सात तासांचे शिस्तबद्ध नियोजनबोलावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी व हजेरी घेण्यासाठी पाच पथक होते. तर शाररीक मोजणी करण्यासाठी उंची, वजन, छाती असे प्रत्येकी चार पथके होती. त्यानंतर कागदपत्र पडताळणी करून पन्नासच्या गटाने कवायत मैदान परिसरात १६०० मीटर धावण्याची चाचणी झाली. सुरूवात व शेवटच्या पाॅईंटला दोन रुग्णवाहीका, आरोग्य पथकांची उपस्थिती होती. तर शेवटच्या पाॅईंटवर वेळेनुसार गुणांकन करण्यासाठी गट करण्यात आले होते. बारावीतील टक्क्यांनुसार ५० गुण तर मैदानी चाचणीचे ५० गुण अशा १०० गुणांच्या मुल्यांकन राज्य राखीव पोलीस दलाकडून एकत्रिक गेल्यावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार