शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

राज्यशासनाच्या MSSC कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या भरतीला ५० टक्के उमेदवार गैरहजर

By योगेश पायघन | Updated: August 20, 2022 16:58 IST

राज्य राखीव पोलीस बल गटाकडून मुल्यांकन, ७ हजार पदांसाठी भरती प्रक्रीयेला सुरूवात

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ७ हजार कंत्राटी सुरक्षारक्षक पदासाठी भरती प्रक्रिया शनिवारी सकाळी सहा वाजता सुरू झाली. पहिल्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील बोलावलेल्या दीड हजारपैकी केवळ साडेसातशे उमेदवारांची मैदानी चाचणीसाठी उपस्थिती होती. ५० टक्के उमेदवारांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध नियोजनामुळे अवघ्या सात तासांत मैदानी चाचणीची प्रक्रीया पुर्ण झाली.

मार्च-एप्रिल २०२० मध्ये नियोजित भरती कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ७ हजार पदांसाठी राज्यभरातून १ लाख ३३ हजार ६९३ युवकांनी अर्ज आलेले होते. भरतीसाठी मैदानी चाचणीची जबाबदारी राज्यातील ९ राज्य राखीव पोलीस बल गटाकडे देण्यात आली आहे. नियमीत भरतीचा अनुभव असल्याने एसआरपीएफचे शिस्तबद्ध नियोजनाची चुनुक दिसून आली. दीड हजार उमेदवार अग्नीवीर भरतीसाठीही बोलावण्यात येत आहेत. मात्र, ती प्रक्रीया बारा ते १८ तासांपेक्षा अधिक वेळखाऊ असल्याचे दिसून येत असतांना सुरक्षा रक्षक भरतीची प्रक्रीया सुलभतेने व जलदगतीने पार पडल्याचे उमेदवार म्हणाले.

औरंगाबाद येथील गट क्रमांक १४ येथे अनुक्रमे औरंगाबाद, लातूर, बुलडाणा व नांदेड येथील १९ हजार ३२२ तरुणांची मैदानी चाचणी व गुणांकन होणार आहे. दररोज १५०० उमेदवारांना बोलवण्यात आले असून ५ सप्टेंबरला शेवटची चाचणी होणार आहे. सकाळी सहा वाजता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याने सकाळी चार वाजेपासून उमेदवार सातारा परिसरात जमा होत आहेत. राज्य राखीव पोलीस बलाच्या गटाच्या प्रवेशद्वाराजवळ उमेदवारांसाठी टेन्टची, पाणी, माफक दरात नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. समादेशक निमीत्त गोयल यांच्या मार्गदर्शनात पहिल्या दिवशीची प्रक्रीया सुटसुटीत व सुरळीत पार पडली.

सात तासांचे शिस्तबद्ध नियोजनबोलावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी व हजेरी घेण्यासाठी पाच पथक होते. तर शाररीक मोजणी करण्यासाठी उंची, वजन, छाती असे प्रत्येकी चार पथके होती. त्यानंतर कागदपत्र पडताळणी करून पन्नासच्या गटाने कवायत मैदान परिसरात १६०० मीटर धावण्याची चाचणी झाली. सुरूवात व शेवटच्या पाॅईंटला दोन रुग्णवाहीका, आरोग्य पथकांची उपस्थिती होती. तर शेवटच्या पाॅईंटवर वेळेनुसार गुणांकन करण्यासाठी गट करण्यात आले होते. बारावीतील टक्क्यांनुसार ५० गुण तर मैदानी चाचणीचे ५० गुण अशा १०० गुणांच्या मुल्यांकन राज्य राखीव पोलीस दलाकडून एकत्रिक गेल्यावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार