शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

महावितरणच्या चुकीने शेतकऱ्याचा मृत्यू; मृतदेह ताब्यात न घेता नातेवाइकांचे घाटी रुग्णालयात आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 19:37 IST

महावितरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखेर चार तासांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

ठळक मुद्देलाईनमन, अधिकाऱ्यांवर कारवाई; आर्थिक मदतीची मागणीमृतदेह ताब्यात घेण्यास नकार नातेवाईकांनी दिला नकार

औरंगाबाद : खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने भाजलेल्या शेतकऱ्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीने मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने शनिवारी घाटीत ठिय्या मांडला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. महावितरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखेर चार तासांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

रुस्तुम माणिकराव पठाडे (वय ५२, रा. आडगाव सरक) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. २७ डिसेंबर रोजी शेतात बकऱ्या चारत असताना चिनीमातीची चिमणी नसल्याने ११ केव्हीच्या विद्युत खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. त्या खांबामुळे ते गंभीर भाजले गेले. त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारासाठी तीन लाख रुपये खर्च आला. त्यानंतर आर्थिक परिस्थिती नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना उपचारांसाठी घाटीत दाखल केले. या ठिकाणी उपचार सुरू असताना ८ जानेवारीला सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह महावितरणच्या कार्यालयात घेऊन जाण्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. त्यामुळे घाटी रुग्णालयासह महावितरणच्या मिल कार्नर येथील कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही घाटीत धाव घेत मृताच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.

विद्युत निरीक्षकाच्या अहवालाची प्रतीक्षाया खांबाच्या चिमणीच्या दुरुस्तीसंदर्भात संबंधित लाईनमनला माहिती देण्यात आली होती. परंतु, त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे लाईनमन आणि जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची, कुटुंबातील दोन व्यक्तींना महावितरणने कायमस्वरुपी नोकरीत घेणे, कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. अखेर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, याप्रकरणी विद्युत निरीक्षकांचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी