शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

महावितरणच्या चुकीने शेतकऱ्याचा मृत्यू; मृतदेह ताब्यात न घेता नातेवाइकांचे घाटी रुग्णालयात आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 19:37 IST

महावितरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखेर चार तासांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

ठळक मुद्देलाईनमन, अधिकाऱ्यांवर कारवाई; आर्थिक मदतीची मागणीमृतदेह ताब्यात घेण्यास नकार नातेवाईकांनी दिला नकार

औरंगाबाद : खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने भाजलेल्या शेतकऱ्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीने मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने शनिवारी घाटीत ठिय्या मांडला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. महावितरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखेर चार तासांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

रुस्तुम माणिकराव पठाडे (वय ५२, रा. आडगाव सरक) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. २७ डिसेंबर रोजी शेतात बकऱ्या चारत असताना चिनीमातीची चिमणी नसल्याने ११ केव्हीच्या विद्युत खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. त्या खांबामुळे ते गंभीर भाजले गेले. त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारासाठी तीन लाख रुपये खर्च आला. त्यानंतर आर्थिक परिस्थिती नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना उपचारांसाठी घाटीत दाखल केले. या ठिकाणी उपचार सुरू असताना ८ जानेवारीला सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह महावितरणच्या कार्यालयात घेऊन जाण्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. त्यामुळे घाटी रुग्णालयासह महावितरणच्या मिल कार्नर येथील कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही घाटीत धाव घेत मृताच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.

विद्युत निरीक्षकाच्या अहवालाची प्रतीक्षाया खांबाच्या चिमणीच्या दुरुस्तीसंदर्भात संबंधित लाईनमनला माहिती देण्यात आली होती. परंतु, त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे लाईनमन आणि जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची, कुटुंबातील दोन व्यक्तींना महावितरणने कायमस्वरुपी नोकरीत घेणे, कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. अखेर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, याप्रकरणी विद्युत निरीक्षकांचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी