शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

घाटी रुग्णालयातील ९०० रुपयांत एमआरआय योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:23 IST

सवलत मिळणे बंद झाल्याने ‘एमआरआय’साठी दोन हजार रुपयांचा भुर्दंड बसत आहे. 

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गोरगरीब रुग्णांना नऊशे रुपयांत एमआरआय मिळणे बंद झाले आहे. जिल्हा नियोजन समितीतून नावीन्यपूर्ण योजनेत मिळालेल्या निधीचा ३१ मार्चपूर्वी हिशोब देण्यासाठी ही योजना सहा दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना सवलत मिळणे बंद झाले असून, ‘एमआरआय’साठी दोन हजार रुपयांचा भुर्दंड बसत आहे. 

वर्ष २०१५-१६ मध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी डीपीसीमधून सातशे रुपयांत एमआरआय मिळण्यासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. १० सप्टेंबर २०१५ रोजी मिळालेल्या निधीला जानेवारी २०१६ मध्ये खर्चाची मान्यता मिळाली. त्यामुळे पहिल्या वर्षी केवळ ८५ रुग्णांंच्या तपासण्या या योजनेतून होऊ शकल्या. ९३ हजार ५०० रुपये खर्च झाला आणि ४९ लाखांचा निधी त्यावर्षी परत गेला. त्यानंतरच्या वर्षात निधीअभावी ही योजना बंद होती.

२०१७-१८ मध्ये २० लाखांचा निधी डीपीसीतून मंजूर झाला. आॅगस्ट २०१७ मध्ये ही योजना परत सुरू झाली. मार्च २०१८ पर्यंत ९४९ रुग्णांना लाभ मिळाला. यासाठी ११ लाख रुपयांचा निधी खर्च झाला. ९ लाखांचा निधी परत गेला. त्यानंतर २०१८-१९ साठी २ एप्रिलला घाटी प्रशासनाने २५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली. निधीचा मार्ग मोकळा झाला. ‘एमआरआय’साठी १,८०० ते २,५०० रुपये मोजण्याची वेळ गोरगरीब रुग्णांवर येत होती. नावीन्यपूर्ण योजनेमुळे सातशे रुपयांत गोरगरिबांना एमआरआय मिळण्यास सुरुवात झाली. पुढे शुल्क वाढीमुळे सातशेवरून नऊशे रुपये झाले. या योजनेमुळे रुग्णांचे अकराशे रुपये वाचत होते. 

या योजनेत मंजूर झालेल्या यंदाच्या आर्थिक वर्षातील निधी ३१ मार्चनंतर परत जाऊ नये, उरलेला निधी पुढे वापरता यावा, यासाठी किती निधी उरला आहे, त्याचा हिशोब करून निधी पुढे वापरण्यास परवानगी मिळविण्यासाठी २५ मार्च रोजीच योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना एमआरआयसाठी दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. 

...तर पुन्हा योजनायोजनेतील निधी पुढे वापरू द्यावा, यासाठी ट्रेझरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर पत्र्यव्यवहार केला जात आहे. ही मंजुरी मिळाली, तर पुन्हा या योजनेतून ‘एमआरआय’साठी सवलत दिली जाईल. ३१ मार्च रोजी किती निधी उरला हे सांगता येत नाही. त्यामुळे २५ मार्चपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली.-डॉ. कैलास झिने,वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीfundsनिधीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद