शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

बीडीओंच्या दालनात आंदोलन

By admin | Updated: December 16, 2015 23:31 IST

सेलू : मनरेगा योजनेच्या सिंचन विहिरीच्या प्रस्तावांना कार्यारंभ आदेश देण्यासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप रवळगाव ग्रामस्थांनी केला.

सेलू : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कार्यालयात सतत गैरहजर राहत असून, मनरेगा योजनेच्या सिंचन विहिरीच्या प्रस्तावांना कार्यारंभ आदेश देण्यासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप रवळगाव ग्रामस्थांनी केला. याबद्दल १५ डिसेंबर रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात रवळगाव ग्रामस्थांनी आंदोलन केले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी. एल. मोडक हे कार्यालयात सतत गैरहजर राहतात, अशी तक्रार रवळगाव ग्रामस्थांनी केली आहे. दुष्काळी परिस्थितीत रवळगाव ग्रामस्थांनी मनरेगा योजनेंतर्गत सिंचन विहीर घेण्यासाठी पं. स. कार्यालयात प्रस्ताव सादर केले. परंतु, मोडक यांनी कार्यारंभ आदेश देण्यासाठी अडवणूक केली. मनरेगा योजनेच्या लाभार्थ्यांना कार्यालयात नेहमीच खेटे मारावे लागतात. काही कामानिमित्त मंगळवारी रवळगावचे ग्रामस्थ पं.स. कार्यालयात मोडक यांची वाट पाहत थांबले होते. परंतु, मोडक कार्यालयात हजर नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या कक्षात आंदोलन केले. त्यांच्या कारभाराची चौकशी व्हावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी महिवाल यांच्याकडे ग्रामस्थांनी दिले आहे. सदरील निवेदनावर महादेव भाबट, सुरेश बोराडे, राजेश काळे, हरिभाऊ रोडगे, विलास रोडगे, सर्जेराव सपाटे, आकाश तौर, रामकिशन रोडगे, शिवाजी रोडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच पं. स. चे उपसभापती संतोष डख यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)