शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

बीडीओंच्या दालनात आंदोलन

By admin | Updated: December 16, 2015 23:31 IST

सेलू : मनरेगा योजनेच्या सिंचन विहिरीच्या प्रस्तावांना कार्यारंभ आदेश देण्यासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप रवळगाव ग्रामस्थांनी केला.

सेलू : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कार्यालयात सतत गैरहजर राहत असून, मनरेगा योजनेच्या सिंचन विहिरीच्या प्रस्तावांना कार्यारंभ आदेश देण्यासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप रवळगाव ग्रामस्थांनी केला. याबद्दल १५ डिसेंबर रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात रवळगाव ग्रामस्थांनी आंदोलन केले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी. एल. मोडक हे कार्यालयात सतत गैरहजर राहतात, अशी तक्रार रवळगाव ग्रामस्थांनी केली आहे. दुष्काळी परिस्थितीत रवळगाव ग्रामस्थांनी मनरेगा योजनेंतर्गत सिंचन विहीर घेण्यासाठी पं. स. कार्यालयात प्रस्ताव सादर केले. परंतु, मोडक यांनी कार्यारंभ आदेश देण्यासाठी अडवणूक केली. मनरेगा योजनेच्या लाभार्थ्यांना कार्यालयात नेहमीच खेटे मारावे लागतात. काही कामानिमित्त मंगळवारी रवळगावचे ग्रामस्थ पं.स. कार्यालयात मोडक यांची वाट पाहत थांबले होते. परंतु, मोडक कार्यालयात हजर नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या कक्षात आंदोलन केले. त्यांच्या कारभाराची चौकशी व्हावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी महिवाल यांच्याकडे ग्रामस्थांनी दिले आहे. सदरील निवेदनावर महादेव भाबट, सुरेश बोराडे, राजेश काळे, हरिभाऊ रोडगे, विलास रोडगे, सर्जेराव सपाटे, आकाश तौर, रामकिशन रोडगे, शिवाजी रोडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच पं. स. चे उपसभापती संतोष डख यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)