शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अडचणींचा डोंगर : कारखान्यांच्या चाकांची गती अद्याप मंदावलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 20:00 IST

पूर्ण ताकदीने उत्पादन सुरू करण्यासाठी आॅर्डर, वाहतूक, कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा आणि कामगारांची कमतरता ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत. 

ठळक मुद्देमनुष्यबळाच्या कमतरतेमुळे पूर्वपदावर येण्यासाठी लागणार दोन महिन्यांचा कालावधी सध्या देशभरातील मार्केट  काही प्रमाणात मार्केट सुरू झाले असले, तरी अजून मालाला पाहिजे तसा उठाव नाही

औरंगाबाद : प्रशासनाने घालून दिलेले नियम, अटींचे पालन करून शहर आणि परिसरतील पाच औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरू झाले असले, तरी कच्चा माल, दळणवळण, पुरेशा प्रमाणात आॅर्डर व मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महिनाभरापासून उद्योगांची गती मंदावलेलीच आहे. 

लॉकडाऊनमुळे ४० दिवस देशभरातील उद्योगांची चाके थांबली होती. अलीकडे काही नियम व अटींवर शासनाने उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जवळपास महिनाभरापासून शहर आणि परिसरतील शेंद्रा, वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, पैठण रोड व पैठण या पाच औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली. या पाचही औद्योगिक वसाहतींमधील सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठे, असे मिळून एकूण ५ हजार उद्योग आहेत. यापैकी सध्या ४ हजार ३०० उद्योग सुरू झाले आहेत. मात्र, पूर्ण ताकदीने उत्पादन सुरू करण्यासाठी आॅर्डर, वाहतूक, कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा आणि कामगारांची कमतरता ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत. 

सध्या देशभरातील मार्केट  काही प्रमाणात मार्केट सुरू झाले असले, तरी अजून मालाला पाहिजे तसा उठाव नाही. त्यामुळे उत्पादन वाढविण्यावर उद्योगांना मर्यादा आलेल्या आहेत. सध्या अवघ्या ४० टक्के क्षमतेने उत्पादन काढले जात आहे. पुरेशा आॅर्डर नसल्यामुळे उद्योजक चिंतेत आहेत. कच्चा माल आता उपलब्ध आहे; पण वाहतूक व्यवस्था (ट्रान्स्पोर्टिंग) पूर्ण क्षमतेने नसल्याने उत्पादित माल बाहेर पाठविण्यावर आणि कच्चा माल आणण्यावर मर्यादा आहेत. कोरोनाला घाबरून क्लीनर, ड्रायव्हर, माल चढवणारे- उतरवणारे लोक कामावर येण्यास अजूनही तयार नाहीत. 

सध्या ८० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. उत्पादित मालाला पाहिजे तसा उठाव नाही. ट्रान्स्पोर्टिंगची समस्या अजून सुटलेली नाही. देशभरातील विविध मोठ्या शहरांमध्ये कच्चा माल उपलब्ध आहे; पण पुणे आणि मुंबईमध्येच ट्रेडर असून, ही दोन्ही शहरे रेड झोनमध्ये असल्यामुळे पाहिजे तशी ट्रान्स्पोर्टिंग सुरू झालेली नाही. जर आगामी काळात कोरोनामुळे परिस्थिती बिघडली नाही, तर पूर्ण ताकदीने उद्योग सुरू होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. -मुकुंद कुलकर्णी, मराठवाडा अध्यक्ष, सीआयआय 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकbusinessव्यवसाय