शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
3
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
4
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
5
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
6
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
7
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
8
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
9
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
10
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
11
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
12
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
13
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
14
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
16
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
17
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
18
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
19
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
20
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

अडचणींचा डोंगर : कारखान्यांच्या चाकांची गती अद्याप मंदावलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 20:00 IST

पूर्ण ताकदीने उत्पादन सुरू करण्यासाठी आॅर्डर, वाहतूक, कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा आणि कामगारांची कमतरता ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत. 

ठळक मुद्देमनुष्यबळाच्या कमतरतेमुळे पूर्वपदावर येण्यासाठी लागणार दोन महिन्यांचा कालावधी सध्या देशभरातील मार्केट  काही प्रमाणात मार्केट सुरू झाले असले, तरी अजून मालाला पाहिजे तसा उठाव नाही

औरंगाबाद : प्रशासनाने घालून दिलेले नियम, अटींचे पालन करून शहर आणि परिसरतील पाच औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरू झाले असले, तरी कच्चा माल, दळणवळण, पुरेशा प्रमाणात आॅर्डर व मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महिनाभरापासून उद्योगांची गती मंदावलेलीच आहे. 

लॉकडाऊनमुळे ४० दिवस देशभरातील उद्योगांची चाके थांबली होती. अलीकडे काही नियम व अटींवर शासनाने उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जवळपास महिनाभरापासून शहर आणि परिसरतील शेंद्रा, वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, पैठण रोड व पैठण या पाच औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली. या पाचही औद्योगिक वसाहतींमधील सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठे, असे मिळून एकूण ५ हजार उद्योग आहेत. यापैकी सध्या ४ हजार ३०० उद्योग सुरू झाले आहेत. मात्र, पूर्ण ताकदीने उत्पादन सुरू करण्यासाठी आॅर्डर, वाहतूक, कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा आणि कामगारांची कमतरता ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत. 

सध्या देशभरातील मार्केट  काही प्रमाणात मार्केट सुरू झाले असले, तरी अजून मालाला पाहिजे तसा उठाव नाही. त्यामुळे उत्पादन वाढविण्यावर उद्योगांना मर्यादा आलेल्या आहेत. सध्या अवघ्या ४० टक्के क्षमतेने उत्पादन काढले जात आहे. पुरेशा आॅर्डर नसल्यामुळे उद्योजक चिंतेत आहेत. कच्चा माल आता उपलब्ध आहे; पण वाहतूक व्यवस्था (ट्रान्स्पोर्टिंग) पूर्ण क्षमतेने नसल्याने उत्पादित माल बाहेर पाठविण्यावर आणि कच्चा माल आणण्यावर मर्यादा आहेत. कोरोनाला घाबरून क्लीनर, ड्रायव्हर, माल चढवणारे- उतरवणारे लोक कामावर येण्यास अजूनही तयार नाहीत. 

सध्या ८० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. उत्पादित मालाला पाहिजे तसा उठाव नाही. ट्रान्स्पोर्टिंगची समस्या अजून सुटलेली नाही. देशभरातील विविध मोठ्या शहरांमध्ये कच्चा माल उपलब्ध आहे; पण पुणे आणि मुंबईमध्येच ट्रेडर असून, ही दोन्ही शहरे रेड झोनमध्ये असल्यामुळे पाहिजे तशी ट्रान्स्पोर्टिंग सुरू झालेली नाही. जर आगामी काळात कोरोनामुळे परिस्थिती बिघडली नाही, तर पूर्ण ताकदीने उद्योग सुरू होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. -मुकुंद कुलकर्णी, मराठवाडा अध्यक्ष, सीआयआय 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकbusinessव्यवसाय