शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

शरीरात सर्वाधिक ताण डोळ्यांवर; ३० टक्के लोकांना ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’चा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 14:59 IST

१८ वर्षांनंतर चष्मा लागत असे. आता ५ व्या, ६ व्या वर्षीही चष्मा लागत आहे.

ठळक मुद्देसंगणक, मोबाईलचा अतिवापर३० टक्के लोकांना ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : आधुनिक काळात संगणक, लॅपटॉप, मोबाईल, टॅब या आधुनिक इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. अनेक कामे तर त्याशिवाय अशक्य आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करावाच लागतो. मात्र, ही साधने सध्या गरजेबरोबरच मनोरंजनाचीही झाली आहेत. म्हणजे त्यांचा अतिवापर वाढला आहे. त्यामुळे शरीरातील इतर अवयवांच्या तुलनेत डोळ्यांवर सर्वाधिक ताण येत आहे. या सगळ्यातून ३० टक्के लोकांना ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’ला सामोरे जावे लागत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

नेत्रतज्ज्ञांकडे डोळ्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’ आढळून येण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. आयटी क्षेत्रासह संगणकाशी संबंधित कामे करणाऱ्यांना किमान ८ तास काम करावे लागते. तेव्हा संगणक, लॅपटॉपचा वापर करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी काम करताना सतत स्क्रीनकडे पाहावे लागते. त्याबरोबरच संवादसाठी मोबाईल हे महत्त्वाचे साधन बनले आहे. संवादाबरोबर अनेक कामे मोबाईलमुळे अगदी काही मिनिटांत होतात. परंतु याच मोबाईलचा वापर मनोरंजनासाठीही वाढला आहे.  मोबाईलच्या स्क्रीनकडे सतत पाहण्याचा वेळ वाढला आहे. यालाच स्क्रीन टाईम म्हटले जात आहे. हा स्क्रीन टाईम कमीत कमी ३ ते ४ तासांवर गेला आहे. अनेकांचा वेळ यापेक्षा अधिक जातो. त्यातूनच डोळ्यांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यालाच ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’ म्हटले जात आहे.

वयाच्या ५ व्या वर्षी चष्मा‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’मध्ये डोळे लाल होणे, डोळ्यांवर ताण येणे, डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे वाटणे असा त्रास होतो. नेत्रतज्ज्ञांकडे येणाऱ्या १०० पैकी ३० जणांमध्ये हा त्रास दिसून येतो. यात ५० टक्के लहान मुलांचा समावेश असतो. पूर्वी १८ वर्षांनंतर चष्मा लागत असे. आता ५ व्या, ६ व्या वर्षीही चष्मा लागत आहे. कारण पालक मुलांना खेळण्यासाठी सर्रास मोबाईल, लॅपटॉप देतात. मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होते. त्यातून डोळ्यांचे विकार वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

स्क्रीन टाईम वाढलाजवळपास ३० टक्के लोकांमध्ये डिजिटल व्हिजन सिंड्रोम आढळून येत आहे. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण ५० टक्के आहे. कमीत कमी ३ ते ४ तास  मोबाईल, संगणकाच्या स्क्रीनकडे (स्क्रीन टाईम) पाहिले जाते. संगणकाशी संबंधित काम करणाऱ्यांची वेळ यापेक्षा कितीतरी अधिक आहे.- डॉ. मनोज सासवडे, नेत्ररोगतज्ज्ञ

काळजी घेतल्यास बचावसंगणक, मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यातून डिजिटल व्हिजन सिंड्रोमला सामोरे जावे लागत आहे. यामुळे डोळ्यांवर अनेक परिणाम होत आहे. परंतु योग्य ती काळजी घेतल्यास त्यापासून बचाव करणे शक्य आहे. स्क्रीनचा उजेड योग्य ठेवला पाहिजे. अंधारात संगणक, मोबाईलचा वापर टाळावा. संगणकावर काम करताना थोड्या थोड्या वेळेने इतरत्र पाहिले पाहिजे.- डॉ. सुनील कसबेकर, अध्यक्ष, औरंगाबाद नेत्ररोगतज्ज्ञ संघटना

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर