शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

सुविधांपेक्षा अडचणीच अधिक

By admin | Updated: August 5, 2015 00:36 IST

बीड : प्रशासनाकडून कृषि विभागांतर्गत अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना मात्र प्रस्ताव दाखल करण्यापासून योजना पदरात पाडून घेण्यापर्यंत

बीड : प्रशासनाकडून कृषि विभागांतर्गत अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना मात्र प्रस्ताव दाखल करण्यापासून योजना पदरात पाडून घेण्यापर्यंत एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत. किचकड पद्धतीमुळे व अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या लुटीमुळे शेतकरी योजनांपासून वंचित राहत आहे. योजनांनुसार शेतकऱ्यांना कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये सात बारा उतारा व आठ अ ही कागदपत्रे आवश्यक आहेत. याकरिताही तलाठी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. योजना शेतकऱ्यांच्या असल्या तरी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अर्थार्जनाच्या उद्देशामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे परिणाम प्रस्ताव पुर्ण न झाल्याने अनेक योजना बारगळल्या आहेत. शेतकऱ्यांकडून पिकविमा, फळबागांचे नुकसान तसेच ठिबकसिंचनाच्या योजना मिळवण्यासाठी अधिक प्रस्ताव कृषि विभागाकडे दाखल होत आहेत. या मुख्य योजनांकरिता शेतकऱ्यांना तलाठी, ग्रामपंचायत कार्यालय त्याचप्रमाणे राष्टीयीकृत बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. बँकेतही अडवणूक होत असल्याने प्रस्तावात घट होत असल्याचे येथील कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रस्ताव नाकारल्यास त्याचे कारणही शेतकऱ्यांना सांगितले जात नाही. कृषी योजनांची माहिती व प्रस्ताव दाखल करण्यास अडचण निर्माण झाल्यास कृषी सहायकांची बँकेत नेमणूक करणे आवश्यक आहे. मात्र त्याची अंमलबजावनी होत नाही. यातच ठिबक सिंचनासंबधीत योजनांची अंमलबजावनी आॅनलाईनद्वारेच करणे बंधनकारक आहे. याविषयी शेतकरी अ त असल्यामुळे योजनांच्या माध्यमातून लाभ तर लांबच मात्र शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. यामुळे शेतकरी तर वंचित राहत आहे योजनांवरील कोट्यावधीचा निधी शासनाकडे परत जात आहे. त्यामुळे कृषिच्या योजना केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)