शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

छत्रपती संभाजीनगरात नो पार्किंगमधून दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक वाहने उचलली

By मुजीब देवणीकर | Updated: June 26, 2024 19:28 IST

वाहतूक पोलिस आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने शहरात दुचाकी वाहने अशा पद्धतीने उचलण्यात येतात.

छत्रपती संभाजीनगर : शहरात रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरीत्या वाहने उचलण्याची माेहीम सुरू केली. मागील दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक दुचाकी वाहने उचलण्यात आली. त्यातून मनपाला किमान १२ लाख रुपयांची रॉयल्टी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काही वर्षांपूर्वी वाहतूक पोलिस आपल्या वाहनांच्या माध्यमातून वाहने उचलत असत. या प्रक्रियेला विरोध झाल्याने मोहीम बंद पडली. शहरातील मुख्य रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाहने परत लावणे सुरू झाले. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी महापालिकेला वाहने जप्त करण्यासाठी चारचाकी वाहनांची व्यवस्था, त्यावर कर्मचारी द्यावेत, अशी विनंती केली. महापालिकेने स्वतंत्र निविदा काढली. ॲक्टिव्ह मोटर्सला काम देण्यात आले. खासगी एजन्सीने कर्मचारी, वाहन दहा महिन्यांपूर्वी दिले. सध्या शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील दुचाकी वाहने उचलण्यात येतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० हजार वाहने आजपर्यंत उचलण्यात आली. प्रत्येक वाहनधारकाकडून पोलिस ५०० रुपये दंड वसूल करतात. त्यानंतर मनपा २०० रुपये वसूल करते. १५० रुपये कंत्राटदाराला आणि मनपाला ५० रुपये रॉयल्टी देण्यात येते. रॉयल्टीतून मनपाला १२ लाखांहून अधिकची रक्कम दहा महिन्यांत मिळाल्याचे सूत्रांनी नमूद केले.

महापालिका आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई सुरू असली तरी अद्याप नागरिकांमध्ये शिस्त आलेली नाही. अनेक रस्त्यांवर आजही अस्तवेस्त वाहने उभी केली जातात. याचवेळी वाहतूक पोलिसांचे वाहन आले तर दुचाकी उचलून नेली जाते. अनेक रस्त्यांवर पट्टेही मारले आहेत. या पट्ट्यांच्या बाहेर वाहन असेल तरच उचलण्यात येते.

चारचाकी वाहनांचा प्रश्नचारचाकी वाहने जप्त करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे दोनच टोईंग वाहने आहेत. आणखी पाच ते सहा टोईंग वाहनांची गरज आहे. मनपाने आणखी काही टोईंग वाहने खरेदी करून पोलिसांना देण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचेही सूत्रांनी सांगितले. शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वाधिक चारचाकी वाहने उभी राहतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTrafficवाहतूक कोंडी