शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

छत्रपती संभाजीनगरात नो पार्किंगमधून दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक वाहने उचलली

By मुजीब देवणीकर | Updated: June 26, 2024 19:28 IST

वाहतूक पोलिस आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने शहरात दुचाकी वाहने अशा पद्धतीने उचलण्यात येतात.

छत्रपती संभाजीनगर : शहरात रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरीत्या वाहने उचलण्याची माेहीम सुरू केली. मागील दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक दुचाकी वाहने उचलण्यात आली. त्यातून मनपाला किमान १२ लाख रुपयांची रॉयल्टी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काही वर्षांपूर्वी वाहतूक पोलिस आपल्या वाहनांच्या माध्यमातून वाहने उचलत असत. या प्रक्रियेला विरोध झाल्याने मोहीम बंद पडली. शहरातील मुख्य रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाहने परत लावणे सुरू झाले. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी महापालिकेला वाहने जप्त करण्यासाठी चारचाकी वाहनांची व्यवस्था, त्यावर कर्मचारी द्यावेत, अशी विनंती केली. महापालिकेने स्वतंत्र निविदा काढली. ॲक्टिव्ह मोटर्सला काम देण्यात आले. खासगी एजन्सीने कर्मचारी, वाहन दहा महिन्यांपूर्वी दिले. सध्या शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील दुचाकी वाहने उचलण्यात येतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० हजार वाहने आजपर्यंत उचलण्यात आली. प्रत्येक वाहनधारकाकडून पोलिस ५०० रुपये दंड वसूल करतात. त्यानंतर मनपा २०० रुपये वसूल करते. १५० रुपये कंत्राटदाराला आणि मनपाला ५० रुपये रॉयल्टी देण्यात येते. रॉयल्टीतून मनपाला १२ लाखांहून अधिकची रक्कम दहा महिन्यांत मिळाल्याचे सूत्रांनी नमूद केले.

महापालिका आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई सुरू असली तरी अद्याप नागरिकांमध्ये शिस्त आलेली नाही. अनेक रस्त्यांवर आजही अस्तवेस्त वाहने उभी केली जातात. याचवेळी वाहतूक पोलिसांचे वाहन आले तर दुचाकी उचलून नेली जाते. अनेक रस्त्यांवर पट्टेही मारले आहेत. या पट्ट्यांच्या बाहेर वाहन असेल तरच उचलण्यात येते.

चारचाकी वाहनांचा प्रश्नचारचाकी वाहने जप्त करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे दोनच टोईंग वाहने आहेत. आणखी पाच ते सहा टोईंग वाहनांची गरज आहे. मनपाने आणखी काही टोईंग वाहने खरेदी करून पोलिसांना देण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचेही सूत्रांनी सांगितले. शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वाधिक चारचाकी वाहने उभी राहतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTrafficवाहतूक कोंडी