शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

पाच हजारांपेक्षा अधिक इमारती धोकादायक

By admin | Updated: November 18, 2016 00:50 IST

ल्ाातूर : जीर्ण इमारतीने गंजगोलाई परिसरात दोघा मायलेकराचा बळी घेतला

ल्ाातूर : जीर्ण इमारतीने गंजगोलाई परिसरात दोघा मायलेकराचा बळी घेतला असून, या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन बोध घेत नाही़ शहरात अनेक इमारती धोकादायक असताना केवळ नोटिसा पाठवून कर्तव्य बजावल्याचा कागदोपत्रांचा सोपस्कार केला जात आहे़ मनपाच्या म्हणण्यानुसार लातूर शहरात केवळ ११३ इमारती धोकादायक आहेत़ प्रत्यक्षात मात्र पाच हजारपेक्षा अधिक धोकादायक इमारती आहेत़ मनपाच्या नोंदीनुसार ५८ इमारती गाव भागातील म्हणजे ‘डी’ झोनमधील आहेत़ तर २७ इमारती ‘सी’ झोनमधील आहेत़ ‘ए’ झोनमध्ये १५ तर ‘बी’ झोनमध्ये १३ इमारती धोकादायक आहेत़ या सर्व इमारतींच्या मालकांना इमारत पाडण्यासंदर्भात मनपाने सूचित केले करून सोपस्कार पार पाडला आहे़ लातूर शहरात अनेक इमारतींचे बांधकाम नगर रचनेच्या नियमानुसार नाही़ शहरात मनपाचे चार झोन असले तरी झोन अधिकाऱ्यांचे या विस्तारीकरणावर लक्ष नाही़ त्यामुळे बांधकामाचा आकार-उकार नियमानुसार होत नाही़ शिवाय, काही बांधकामांना तर परवानेही नाहीत़ त्यामुळे धोकादायक इमारतींचे प्रमाण शहरात वाढत आहे़ गाव भागातील वर्दळीच्या ठिकाणी ‘डी’झोनमध्ये ५८ इमारती धोकादायक आहेत़ एक वर्षापुर्वी मनपाने धोकादायक इमारती मालकांना इमारत पाडण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या़ त्यानंतर इमारत पाडली की नाही, हे पाहण्याचे साधा सोपस्कार मनपाने केला नाही़ त्यामुळे अनेक वर्षांपासून धोकादायक इमारती उभ्या आहेत़ ‘सी’ झोन मध्येही २७ इमारती धोकादायक आहेत़ मनपाच्या सर्व्हेक्षणानुसारच या धोकादायक इमारतींचा आकडा आहे़ नोटीस पाठविण्यापुरतेच मनपाने काम केले आहे़ नोटीस दिल्यानंतर संबंधित मालकांना जावून मनपाचा कोणताही कर्मचारी भेटलेला नाही़ त्यामुळे या इमारती तशाच उभ्याच आहेत़‘ए’ झोनमध्ये १५ तर ‘बी’झोनमध्ये १३ इमारती धोकादायक स्थितीत आहेत़ या झोनमधील अधिकाऱ्यांनीही फक्त नोटिसाच पाठविल्या आहेत़ त्यामुळे संबंधित मालकांनी इमारती पाडण्याचे सौजन्य दाखविले नाही़ जवळपास ११३ इमारती धोकादायक स्थितीत असताना त्याची पाहणी नोटिसीनंतर मनपाने केली नाही़ दरम्यान, बुधवारी सायंकाळी गंजगोलाई परिसरात जुनी जीर्ण इमारत अंगावर पडल्याने एका महिलेचा व तिच्या मुलाचा मृत्यू झाला़ त्यानंतरही मनपाने बोध घेतलेला दिसत नाही़ पहिला केलेल्या सर्व्हे पुन्हा रिवाईज केला जाणार आहे़ त्यानंतर इमारत पाढण्यासंदर्भात संबंधितांना कळविले आहे़ (प्रतिनिधी)