शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

औरंगाबाद महापालिकेत पैशांचा; शहरात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 10:48 PM

शहरात दिवाळी सणाच्या तोंडावर पाण्याचा, तर पालिकेत पैशांचा ठणठणाट असल्याचे गुरुवारी सर्वसाधारण सभेत समोर आले.

ठळक मुद्देअसतील तर मिळतील : १८ कोटींचे बिल वाटप चौकशीच्या भोवऱ्यात

औरंगाबाद : शहरात दिवाळी सणाच्या तोंडावर पाण्याचा, तर पालिकेत पैशांचा ठणठणाट असल्याचे गुरुवारी सर्वसाधारण सभेत समोर आले. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात १८ कोटी ५० लाखांहून अधिक बिलांची रक्कम मुख्य लेखा विभागाने अदा केल्यामुळे संबंधित यंत्रणा संशयाच्या भोवºयात आली आहे, तर जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत येणाºया १५० एमएलडीपैकी ४५ एमएलडी पाण्याची गळती होत असल्यामुळे शहराला कमी मिळत असल्याचे एका पाहणीअंती समोर आले आहे.जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडीपर्यंत तब्बल तीस टक्के पाणी वाया जात असल्याचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र होलाणी यांनी एका पाहणीतून समोर आणले आहे. पालिकेच्या विद्यमान जलवाहिन्यांचे आयुष्य चाळीस वर्षांचे झाले असून, त्या योजनांची कार्यक्षमता संपली आहे. त्यांची दुरुस्ती करून पाणी वाढविता येईल, याचे सादरीकरण होलाणी यांनी गुरुवारी सभेत केले. सध्या ७०० व १,४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीने पाणीपुरवठा करण्यात येतो. या दोन्ही जलवाहिन्यांची निर्वहन क्षमता संपली आहे. त्यामुळे शहरात कमी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची वणवण सुरू आहे. जलवाहिन्यांची क्षमता नसल्याने गळत्या वाढल्या आहेत. ७०० मि.मी.च्या जलवाहिनीतून १३ टक्के, तर १,४०० च्या जलवाहिनीतून १७ टक्क्यांपर्यंत पाणीगळती होत आहे. ही स्थिती फक्त नक्षत्रवाडीपर्यंतची आहे. शहरातील गळत्यांचा अद्याप अभ्यास झालेला नाही. शहराच्या लोकसंख्येला दररोज २७८ एमएलडी पाणी हवे आहे. मात्र, प्रत्यक्षात १०५ ते १२० एमएलडीच पाणी येते. दोन दिवसाआड पाणी का देऊ शकत नाही? असा प्रश्न सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. अभ्यासाअंती त्यावर बोलता येईल, असे होलाणी यांनी सांगितले.बिल वाटपाचा कारभार चौकशीच्या फेºयातमनपा तिजोरीत पैशांअभावी ठणठणाट असताना गेल्या पंधरा दिवसांत मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांनी ठेकेदारांची तब्बल साडेअठरा कोटी रुपयांची बिले काढल्याची माहिती सर्वसाधारण सभेत समोर आली. अधिकाºयांनी पाच-पाच टक्के घेऊन बिले काढल्याचा आरोप यावेळी भाजप नगरसेवकांनी केला. नगरसेवकांच्या मागणीवरून बिल वाटपाची चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. अधिकाºयांनी ज्येष्ठता यादी डावलून कोणत्या पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकाºयांच्या सांगण्यावरून बिले काढली हे समोर यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर महापौर घोडेले यांनी कार्यकारी अभियंता डी.पी. कुलकर्णी यांच्यामार्फत बिल वाटप प्रकरणाची चौकशी करून १५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल देण्याचा आदेश दिला.टक्केवारीचा कारभार चव्हाट्यावरबिले काढण्यासाठी संबंधित यंत्रणा दोन टक्के रक्कम घेत असल्याचे मनपा वर्तुळात नेहमीच बोलले जाते. मात्र, गुरुवारी नगरसेवकांनी सभेत लेखा विभागातील अधिकाºयांच्या टक्केवारीचे बिंग फोडणारे आरोप केले. आता दोन नव्हे, तर पाच-पाच टक्के रक्कम घेऊन बिले काढले जात असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारण