शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

निराधार योजनांतील बोगस लाभार्थी शोधमोहिमेला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 19:13 IST

जिल्ह्यातील बहुतांश गरजूऐवजी सधन नागरिकच योजनेचे लाभार्थी असल्याचे आरोप सुरू होताच, तहसील पातळीवर सर्व लाभार्थ्यांची पाहणी केली

ठळक मुद्देबायोमेट्रिक, आधारलिंक सक्तीचे  हायटेक सिस्टिममुळे पारदर्शकता येत असल्याचा दावा

- विकास राऊत

औरंगाबाद : बायोमेट्रिक आणि ऑनलाईन आधारलिंक करण्याच्या प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांना चाप बसल्याचा दावा करण्यात येत असला तरी लाभार्थी खरे की खोटे याचा आढावा तहसील पातळीवर तलाठ्यांमार्फत घेण्यास अद्याप मुहूर्त लागला नसल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश गरजूऐवजी सधन नागरिकच योजनेचे लाभार्थी असल्याचे आरोप सुरू होताच, तहसील पातळीवर सर्व लाभार्थ्यांची पाहणी केली जाते, परंतु मागील काही दिवसांपासून पाहणीच केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष विकास कुलकर्णी यांनी सांगितले, बायोमेट्रिक अनुदान वाटप, आधारलिंक सक्तीचे केलेले असले तरी बोगस लाभार्थी असल्याचे माझ्या काळात समोर आले होते. गरजूंपर्यंत या योजनांना लाभ पोहोचत नाही. जे नागरिक सधन आहेत, त्यांना योजनेचा लाभ मिळतो आहे. ज्यांच्या हातांचे ठसे बायोमेट्रिकवर उमटत नाहीत, त्यांचे आधारकार्ड बँकेत जमा आहेत. हयात प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया नियमित असते. बाकी लाभार्थ्यांची पाहणी नियमित होत नाही, असा आरोप त्यांनी केला.

बोगसचा मुद्दा सध्या तरी नाही, परंतु मयत असतील तर ते लाभार्थी कमी केले जातात. काही योजना टाईमबॉण्ड असतात. ज्या लाभार्थ्यांचे उत्पन्न वाढलेले असेल किंवा त्यांचे पाल्य २५ वर्षांचे झालेले असतील, त्यांचे अनुदान कमी केले जाते. संजय गांधी निराधार योजनेमध्ये तीन प्रकार आहेत. एस.सी, एस.टी आणि सर्वसाधारण, इंदिरा गांधी योजनेच्या तीन उपाययोजना झाल्या आहेत. जिल्ह्यात आधारलिंक केलेले आहे. सुरुवातीला बोगस लाभार्थी असायचे. परंतु ऑनलाईन लिंक असून बायोमेट्रिकद्वारे अनुदान वाटप केले जाते. त्यामुळे बोगस लाभार्थ्यांचे प्रमाण नसल्यात जमा आहे. हायटेक सिस्टिममुळे पारदर्शकता येत असल्याचा दावा तहसीलदार अनिता भालेराव यांनी केला.

कोणत्या योजनेचे किती आहेत लाभार्थीसंजय गांधी योजना- ३३६४२श्रावणबाळ योजना- ५९०३०इंदिरा गांधी योजना- ३८८७९एकूण - १ लाख ३१ हजार ५५१

इतर योजनेचे लाभार्थीइंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना - ७१४इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना - ३९२राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना - १६२एकूण- १२६८

याबाबत घेतली जाते माहितीसंजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनाथ, दिव्यांग, परितक्त्या, घटस्फोटित, विधवांसाठी अनुदान दिले जाते. यातील लाभार्थी योग्य आहेत की नाही. त्यांचे हयात प्रमाणपत्र, लाभार्थी मयत झाले आहेत काय, आधार लिंक असताना काही लाभार्थ्यांच्या हातांचे ठसे बायोमेट्रिक यंत्रणेवर उमटत नाहीत. त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी तालुकानिहाय तहसील पातळीवर तपासणी केली जाते. यात जर काही माहिती चुकीची आढळली तर सदरील लाभार्थ्याचे अनुदान बंद केले जाते.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशीनिवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले, बोगस किंवा मयत झालेल्या लाभार्थ्यांचा शोध ही नियमित मोहीम असते. जवळपास सर्व काही ऑनलाईन आणि बायोमेट्रिक झाल्यामुळे या सर्व योजनांमध्ये पारदर्शकता आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादfraudधोकेबाजी