शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

बेरोजगार अभियंत्यांच्या आरक्षणात फेरफार

By admin | Updated: January 17, 2016 23:54 IST

विजय सरवदे, औरंगाबाद शासन निर्णय धाब्यावर बसवत जिल्हा परिषदेत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित असलेली कामे ‘आयटीआय’धारक गुत्तेदारांना दिली जात आहेत.

विजय सरवदे, औरंगाबादशासन निर्णय धाब्यावर बसवत जिल्हा परिषदेत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित असलेली कामे ‘आयटीआय’धारक गुत्तेदारांना दिली जात आहेत. कामवाटप संनियंत्रण समितीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी कामे वाटपाच्या आरक्षणात फेरफार करीत लाखो रुपयांची ‘माया’ कमाविण्याचा गोरखधंदाच सुरू केला आहे.यासंदर्भात ‘लोकमत’च्या हाती अनेक दस्तावेज आले आहेत. शासन निर्णयानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ३३ टक्के, मजूर सहकारी संस्थांना ३३ टक्के व नोंदणीकृत शासनमान्य गुत्तेदारांना ३४ टक्के या पद्धतीने कामांचे वाटप झाले पाहिजे. नियमानुसार कामवाटप संनियंत्रण समितीच्या अधिकाऱ्यांना सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी असलेल्या कामांच्या आरक्षणात कोणताही हस्तक्षेप किंवा फेरबदल करण्याचा अधिकार नाही. विशेष म्हणजे, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना निविदा न मागवता तसेच विनास्पर्धा कामे वाटप करण्याविषयी शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत; परंतु अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेतील कामवाटप संनियंत्रण समितीने शासन निर्णयालाच केराची टोपली दाखविली आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये गुत्तेदारीसंबंधी नोंदणी करावी लागते. या कार्यालयाने त्यांना ‘वर्ग-५ अ’चे नोंदणी प्रमाणपत्र दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ‘वर्ग-५ अ’नुसार नोंदणी करावी लागते. या बेरोजगार अभियंत्यांना प्रथम नोंदणी वर्ग-५ प्रमाणे ५० लाख रुपयांची कामे देण्याचा निर्णय तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. या अभियंत्यांची रजिस्ट्रेशनची मुदत दहा वर्षांची आहे.बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना सोडत पद्धतीने विनास्पर्धा कामे दिली जातात. पूर्वी ही मर्यादा ६० लाख रुपयांची होती. ती आता ७५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा शासन निर्णय आहे. दरम्यान, ‘आयटीआय स्थापत्य अभियांत्रिकी सहायक’ ही पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना ‘वर्ग- ७’नुसार कामे देण्याचा निर्णय आहे; पण त्यांना २ लाख रुपयांचीच मर्यादा आहे. असे असताना जिल्हा परिषद कामवाटप संनियंत्रण समितीने जि.प.मधील काही पदाधिकारी व सदस्यांच्या सल्ल्यानुसार ‘आयटीआय’धारक गुत्तेदारांना सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित असलेल्या ‘वर्ग-५ अ’च्या कोट्यातील कामांचे नियमबाह्य वाटप करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कामे वाटपाची ही फेरफार जिल्हा परिषदेत राजरोसपणे सुरू आहे. अनेक ‘आयटीआय’धारक गुत्तेदार हे केवळ काम मिळविण्यापुरतेच कागदावर आहेत. मिळालेली कामे मात्र जि.प. पदाधिकारी किंवा सदस्य हेच करतात आणि लाखो रुपयांची बिले उचलतात. नियमबाह्य कामांचे वाटप करणे आणि त्या कामांची बिले उचलण्याच्या प्रक्रियेत जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मोठे रॅकेटच कार्यरत आहे, हे विशेष!