शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:37 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्रास गैरप्रकार सुरू आहेत. या गैरप्रकारांमुळे समाजाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. यामागे काही शक्ती कार्यरत आहेत. यामुळे तरुणांना नैतिकता आणि नीतिमत्ताच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापरांचे प्रकार टाळले पाहिजेत, असे वक्तव्य विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले.

ठळक मुद्देउज्ज्वल निकम : औरंगाबाद येथील देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्रास गैरप्रकार सुरू आहेत. या गैरप्रकारांमुळे समाजाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. यामागे काही शक्ती कार्यरत आहेत. यामुळे तरुणांना नैतिकता आणि नीतिमत्ताच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापरांचे प्रकार टाळले पाहिजेत, असे वक्तव्य विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले.देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात ‘क्वसार्स-२०१८’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत स्वयंचलित रोबोटच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर उद्योजक ऋषी बागला, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष डॉ.अविनाश येळीकर, सदस्य विवेक भोसले, त्र्यंबक पाथ्रीकर, महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर, महोत्सवाचे समन्वयक डॉ. गजेंद्र गंधे आणि विद्यार्थी संसद समन्वयक डॉ. सत्यवान धोंडगे उपस्थित होते. यावेळी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, प्रत्येक युवकाने मन:स्थिती बदलली तरच परिस्थिती बदलेल. राष्ट्रासाठी आपण काय करू शकतो हा विचार प्रत्येकाच्या मनात बसला पाहिजे. आपण मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी कसा होऊ शकतो, याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे, असेही निकम यांनी सांगितले. उद्योजक ऋषी बागला म्हणाले, प्रत्येकाने मनाची स्वच्छता राखली पाहिजे. ही स्वच्छता राखल्यानंतरच पुढील मार्ग निघतात. अगदी संकटात सापडलेले असतानाही मार्ग निघतो, असा विश्वास बागला यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी केले. स्नेहसंमेलनाचे समन्वयक डॉ. गजेंद्र गंधे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा.अनिल वाकणकर, प्रा. प्रकाश तौर, प्रा. संजय कल्याणकर, डॉ. राजेश औटी, प्रा. रुपेश रेब्बा आदी प्रयत्नरत आहेत.गुणवंतांचा सत्कारमहाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात विविध पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. यात भक्ती काळे या विद्यार्थिनीला महाविद्यालयात प्रथम आल्याबद्दल १५ हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले. काश्मीर ते कन्याकुमारी अशी बेटी बचाव सायकल रॅली काढणाºया विद्यार्थ्यांचाही सत्कार केला.स्वयंचलित रोबोटचे आकर्षणमहोत्सवाचे उद्घाटन स्वयंचलित रोबोटची पाहुण्यांनी कळ दाबताच झाले. रोबोट मंचाच्या मध्यभागी आल्यानंतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तेव्हा विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हा रोबोटच ठरला. हा रोबोट संदेश सिंग, योगेश तावडे, शिवाजी थट्टीकोटा आणि अनिरुद्ध कुमार या विद्यार्थ्यांनी बनवला होता.