शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अभ्यासक्रमाविषयीचे गैरसमज अन ५ वर्षांत पडली अनेक डी.एड. महाविद्यालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 20:01 IST

महाविद्यालयात ३५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

ठळक मुद्देआजघडीला यापैकी ४१ महाविद्यालये चालू आहेत.२०१५ ला औरंगाबाद जिल्ह्यात ८२ डीएड महाविद्यालये होती.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : बी. एड. अभ्यासक्रमाच्या जागा पूर्ण भरलेल्या तर डी. एड. अभ्यासक्रमाच्या जागा अर्ध्याहून अधिक रिक्त अशी विरोधी परिस्थिती सध्या डी. एड. आणि बी. एड. महाविद्यालयांमध्ये आहे. डी. एड. अभ्यासक्रमाविषयीचे गैरसमज हे त्याचे एक प्रमुख कारण असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले.

२०१५ साली औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ८२ डीएड महाविद्यालये होती. आता यापैकी निम्मी महाविद्यालये विविध कारणांमुळे बंद करण्यात आली. डाएट केंद्राकडून डी. एड. महाविद्यालयाचा कारभार पाहण्यात येतो. वेगवेगळ्या कारणांमुळे डाएटच्या नियमावलीत न बसणारी अनेक महाविद्यालयेही बंद आहेत, हेदेखील महाविद्यालये बंद होण्याचे कारण आहे. शिक्षण क्षेत्रात झालेला आणखी एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे बी. एड. झालेल्या शिक्षकांना आता प्राथमिक वर्गांना शिकविण्याचीही मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे बी. एड. केले तर माध्यमिक आणि प्राथमिक, अशी दोन्ही दालने खुली होत असल्याने साहजिकच विद्यार्थ्यांचा ओढा बी. एड. कडे वाढला आहे. तसेच डी. एड. आता चार वर्षांचे होणार, डी. एड. अभ्यासक्रम बंद होणार, डी. एड. केले तर नोकरी मिळत नाही, अशा चुकीच्या चर्चेतून डी. एड. करणे म्हणजे निरर्थकच आहे, असा समज बहुसंख्य विद्यार्थ्यांचा झालेला आहे.

केवळ अनुदानासाठीच महाविद्यालये कामोठमोठ्या इमारती आणि विद्यार्थ्यांअभावी रिकामे पडलेले वर्ग अशी सध्याच्या अनेक डी. एड. महाविद्यालयांची अवस्था आहे. या महाविद्यालयांच्या निम्म्याहून जास्त जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे केवळ अनुदानासाठीच डी. एड. महाविद्यालये सुरू आहेत का, असा प्रश्नही अनेकांना पडला.

गैरसमजामुळे प्रवेश घटलेडी. एड. केल्यानंतर नोकरी मिळत नाही, डी. एड. केले तर काही भविष्य नाही किंवा डी. एड. आता बंद होणार आहे, असे डी. एड. विषयी अनेक गैरसमज आहेत. यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याने डी. एड. ला प्रवेश घेण्याचे प्रमाण घटले. इंग्रजी शाळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या शाळांनाही प्रशिक्षित शिक्षकांचीच गरज आहे. त्यामुळे गुणवत्ता असेल तर संधी निश्चित मिळणारच.- डॉ. सतीश सुराणा

शिक्षकी पेशा सोडलाडी. एड. केल्यानंतर अनेक वर्षे विनाअनुदानित शाळेत अत्यंत कमी पगारावर नोकरी करावी लागली. मिळणाऱ्या पगारातून कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण जात होते. त्यामुळे आता शिक्षकी पेशा सोडला असून एका खाजगी कार्यालयात काम करत आहे.- प्रविण सोनवणे

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबादfraudधोकेबाजी