शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

कोरोनाने दिला जगण्याचा धडा, माता- बाल मृत्यू रोखण्यासाठी आता तरी लसीकरण करा

By विजय सरवदे | Updated: August 11, 2023 16:21 IST

आता लसीकरणासाठी जिल्ह्यात ७ ऑगस्टपासून विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम ही तीन टप्प्यांत राबविली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण जगासमोर उभे ठाकलेले कोरोनाचे संकट हे लसीकरणामुळेच आटोक्यात आले, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे संभाव्य आजार असो, की माता- बाल मृत्यू रोखण्यासाठी पालकांना लसीकरणाकडे डोळेझाक करून चालणार नाही. आता लसीकरणासाठी जिल्ह्यात ७ ऑगस्टपासून विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम ही तीन टप्प्यांत राबविली जाणार आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या मोहिमेंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेले, तसेच अर्धवट लसीकरण झालेल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर मातांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. या मोहिमेची पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर, तर तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबरदरम्यान राबवण्यात येणार आहे. मोहिमेत १०,८७१ बालके, १,६९५ गरोदर मातांचे लसीकरण केले जाणार आहे.

मिशन इंद्रधनुष्य मोहीममातेच्या गरोदरपणात व शून्य ते पाच वर्षे वयोगटाच्या बालकांना योग्य लसीकरण करणे आवश्यक असते. काही कारणांनी लसीकरणापासून वंचित राहिलेले, तसेच अर्धवट लसीकरण झालेली बालके, गरोदर मातांना पूर्णतः लसीकरण करण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत आहे.

७ ते १२ ऑगस्ट पहिला टप्पालसीकरणाची ही मोहीम तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, पहिला टप्पा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

गर्भवती, मुलांना कधी द्यावी लस?मूल जन्माला आल्यापासून ते वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत लसीकरणाचे विविध टप्पे पूर्ण करावे लागतात, तर गरोदर मातांना धनुर्वात, डांग्या खोकला, तसेच इन्फ्लुएंझा (फ्लू) लस घ्यावी लागते.

लस दिल्यास या आजारांपासून होईल बचावबाळांना वेळापत्रकानुसार लस दिल्यास गोवर, घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, कावीळ आदी जीवघेण्या आजारांपासून बचाव होईल.

७२३ लसीकरण सत्रजिल्ह्यात मिशन इंद्रधनुष्य मोहीम यशस्वी करण्यासाठी ७२३ लसीकरण सत्रे स्थापन करण्यात येणार आहेत.

मोहिमेची माहिती कुठे मिळेल?या मोहिमेची अधिक माहिती जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, तसेच शहरी भागात मनपा, नगरपालिकांच्या आरोग्य विभागाकडे मिळेल.

लसीकरणाचे तीन टप्पे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत ० ते ५ वयोगटातील बालके, तसेच गरोदर माता ज्या लसीकरणापासून वंचित राहिल्या आहेत; अथवा त्यांचे काही कारणांमुळे अर्धवट लसीकरण राहिलेले आहे, त्यांचे ७ ते १२ ऑगस्टदरम्यान लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणाचे तीन टप्पे राबविले जाणार आहेत.-डॉ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य