शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कोरोनाने दिला जगण्याचा धडा, माता- बाल मृत्यू रोखण्यासाठी आता तरी लसीकरण करा

By विजय सरवदे | Updated: August 11, 2023 16:21 IST

आता लसीकरणासाठी जिल्ह्यात ७ ऑगस्टपासून विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम ही तीन टप्प्यांत राबविली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण जगासमोर उभे ठाकलेले कोरोनाचे संकट हे लसीकरणामुळेच आटोक्यात आले, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे संभाव्य आजार असो, की माता- बाल मृत्यू रोखण्यासाठी पालकांना लसीकरणाकडे डोळेझाक करून चालणार नाही. आता लसीकरणासाठी जिल्ह्यात ७ ऑगस्टपासून विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम ही तीन टप्प्यांत राबविली जाणार आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या मोहिमेंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेले, तसेच अर्धवट लसीकरण झालेल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर मातांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. या मोहिमेची पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर, तर तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबरदरम्यान राबवण्यात येणार आहे. मोहिमेत १०,८७१ बालके, १,६९५ गरोदर मातांचे लसीकरण केले जाणार आहे.

मिशन इंद्रधनुष्य मोहीममातेच्या गरोदरपणात व शून्य ते पाच वर्षे वयोगटाच्या बालकांना योग्य लसीकरण करणे आवश्यक असते. काही कारणांनी लसीकरणापासून वंचित राहिलेले, तसेच अर्धवट लसीकरण झालेली बालके, गरोदर मातांना पूर्णतः लसीकरण करण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत आहे.

७ ते १२ ऑगस्ट पहिला टप्पालसीकरणाची ही मोहीम तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, पहिला टप्पा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

गर्भवती, मुलांना कधी द्यावी लस?मूल जन्माला आल्यापासून ते वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत लसीकरणाचे विविध टप्पे पूर्ण करावे लागतात, तर गरोदर मातांना धनुर्वात, डांग्या खोकला, तसेच इन्फ्लुएंझा (फ्लू) लस घ्यावी लागते.

लस दिल्यास या आजारांपासून होईल बचावबाळांना वेळापत्रकानुसार लस दिल्यास गोवर, घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, कावीळ आदी जीवघेण्या आजारांपासून बचाव होईल.

७२३ लसीकरण सत्रजिल्ह्यात मिशन इंद्रधनुष्य मोहीम यशस्वी करण्यासाठी ७२३ लसीकरण सत्रे स्थापन करण्यात येणार आहेत.

मोहिमेची माहिती कुठे मिळेल?या मोहिमेची अधिक माहिती जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, तसेच शहरी भागात मनपा, नगरपालिकांच्या आरोग्य विभागाकडे मिळेल.

लसीकरणाचे तीन टप्पे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत ० ते ५ वयोगटातील बालके, तसेच गरोदर माता ज्या लसीकरणापासून वंचित राहिल्या आहेत; अथवा त्यांचे काही कारणांमुळे अर्धवट लसीकरण राहिलेले आहे, त्यांचे ७ ते १२ ऑगस्टदरम्यान लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणाचे तीन टप्पे राबविले जाणार आहेत.-डॉ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य