शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

उच्च न्यायालयाची महसूल राज्यमंत्र्यांना ताकीद; अब्दुल सत्तारांनी बिनशर्त माफी मागितली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 14:52 IST

तहसीलदारांच्या आदेशाला राज्यमंत्री यांनी स्थगिती देणे गरजेचे नव्हते. त्यांचे हे आदेश अयोग्य, अनावश्यक, कार्यक्षेत्र व अधिकार विरहित असल्याचे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.

ठळक मुद्देकायद्यातील तरतुदीनुसार एका निर्णयाविरोधात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल न करता थेट महसूल राज्यमंत्री सत्तार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.राज्यमंत्री सत्तार यांनी तक्रार अर्जावर स्वाक्षरी करून फेरफाराला स्थगिती दिली होती. संबंधितांवर कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

औरंगाबाद : ‘अर्धन्यायिक’ आदेशामध्ये प्रशासकीय यंत्रणांनी अथवा मंत्र्यांनी हस्तक्षेप करू नये , अशी सक्त ताकीद वजा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांनी दिला आहे. तहसीलदारांनी पारीत केलेल्या ‘अर्धन्यायिक’ स्वरूपाच्या आदेशाविरुद्ध अपील करण्यांची तरतूद असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांनी त्यांच्या अधिकाराच्या कार्यकक्षेबाहेर जाऊन तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्याआनुषंगाने खंडपीठाने तीव्र नापसंती व्यक्त करीत वरीलप्रमाणे आदेश दिले आहेत. राज्यमंत्री सत्तार यांनी याबाबत बिनशर्त माफी मागितली आहे. मात्र, खंडपीठाने त्याबद्दल असमाधान व्यक्त केले आहे. (Aurangabad High Court warns Minister of State Abdul Sattar)

तहसीलदारांच्या आदेशाला राज्यमंत्री यांनी स्थगिती देणे गरजेचे नव्हते. त्यांचे हे आदेश अयोग्य, अनावश्यक, कार्यक्षेत्र व अधिकार विरहित असल्याचे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. सत्तार यांनी यापुढे कायद्यांच्या तत्त्वांचे पालन करावे आणि प्रशासकीय अधिकाराचा वापर करून अर्धन्यायिक आदेशामध्ये हस्तक्षेप करू नये, असा ताकीद वजा आदेश दिला आहे. तहसीलदारांच्या निकालाविरुद्ध आक्षेपकर्ता युसूफ बेग यांनी दाखल केलेले अपील फेटाळत उपविभागीय दंडाधिकारी यांनी तहसीलदार यांचे आदेश कायम केले होते. सत्तार यांनी पारीत केलेल्या आदेशाच्या आनुषंगाने सातबारा वरील इतर अधिकारातील नोंदी तत्काळ रद्द करण्याचे आदेशदेखील उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिले होते. रोजी उपविभागीय दंडाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेदेखील उच्च न्यायालयाने २७ जुलैच्या आदेशात नमूद केले आहे. याचिकाकर्ताच्या वतीने ॲड. प्रसाद जरारे यांनी काम पाहिले.

काय होती याचिका?औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी येथील गट नंवर ३१ ची १३ हेक्टर १४ आर जमीन जयेश इन्फ्रा व इतर भागीदारांनी नोंदणीकृत खरेदी खताआधारे विकत घेतली होती. याबाबत सातबारावर फेरफार नोंद घेण्याबाबत कागदपत्रे दाखल केल्यावर या जमिनीचा संबंध नसलेले युसूफ बेग सांडू बेग यांनी मालकीच्या नोंदीला औरंगाबादचे तहसीलदार ( ग्रामीण) याच्याकडे आक्षेप घेतला होता. त्यात तहसीलदारांनी रितसर, कायदेशीररीत्या सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून मे. जयेश इन्फ्रा व इतर भागीदारांच्या बाजूने निर्णय दिला होता. कायद्यातील तरतुदीनुसार या निर्णयाविरोधात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल न करता थेट महसूल राज्यमंत्री सत्तार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.

राज्यमंत्र्यांनी फेरफारला दिली होती स्थगितीराज्यमंत्री सत्तार यांनी तक्रार अर्जावर स्वाक्षरी करून फेरफाराला स्थगिती दिली होती. संबंधितांवर कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध जयेश इन्फ्रा व इतर यांनी ॲड. प्रसाद जरारे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने सत्तार यांना व्यक्तीशः हजर राहण्यासाठी नोटीस बजावून, त्यांच्या आदेशाला स्थगिती देऊन स्पष्टीकरणही मागविले होते. सत्तार यांनी पारीत केलेल्या आदेशाचा संदर्भ कोणत्याही महसूल अधिकाऱ्यांनी घेऊ नये, असा आदेश दिला होता.

सत्तार यांची बिनशर्त माफी; खंडपीठाचे असमाधानखंडपीठाच्या आदेशाच्या आनुषंगाने सत्तार यांनी बिनशर्त माफी मागणारे शपथपत्र दाखल केले होते. खंडपीठाने अंतिम आदेशामध्ये सत्तार यांचा माफीनामा स्वीकारला. परंतु त्यांनी पारीत केलेल्या आदेशासंदर्भात शपथपत्रामध्ये दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत असमाधान व्यक्त करुण राज्यमंत्री यांना प्रदान केलेल्या अधिकाराच्या कार्यकक्षेत कार्यवाही करणे अभिप्रेत असल्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ