शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

भुमरेंनी शब्द पाळला; 'त्या' दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 16:17 IST

स्थानिक राजकरणामुळे होणाऱ्या विरोधामुळे या योजनेला वेळोवेळी अडचणी निर्माण झाल्या.

औरंगाबाद : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना जवळपास पूर्ण झाली आहे. तर कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थित सोमवारी पाण्याची चाचणी होणार असून, अधिवेशन संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या योजनेच्या पाण्याच उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे.

सततच्या वेगवेगळ्या कारणांनी ही योजना गेल्या 10 वर्षांपासून रखडली होती. स्थानिक राजकरणामुळे होणाऱ्या विरोधामुळे या योजनेला वेळोवेळी अडचणी निर्माण झाल्या. त्यातच मोबदल्याच्या मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. मात्र पोलीस बंदोबस्तात हे काम सुरु ठेवण्यात आले आणि अखेर या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर पुढील आठवड्यात उद्घाटन सुद्धा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना तांत्रिकदृष्ट्या 100 टक्के पूर्ण झाली असून, अंतिम चाचणीनंतर गावकऱ्यांना थेट पाणी मिळणार आहे. जायकवाडी धरण परिसरात पंपहाऊस उभारण्यात आले असून तेथून हे पाणी उपसा केला जाणार आहे. त्यामुळे खेर्डा प्रकल्पात थेट पाणी जाणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर होणार आहे. तर ही योजना पूर्ण झाल्यावर 55 गावंचा प्रश्न मिटणार असून, 14 हजार 582 हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे.

भूमरेंनी शब्द पाळला

निवडणुका येताच सर्वच पक्षाकडून ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनावरून राजकरण केले जात असल्याचे पाहायला मिळायचे. विधानसभा निवडणुकीत सुद्धा या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. तर 2020 पूर्वीच ही योजना पूर्ण करणार असल्याचं आश्वासन भुमरे यांनी गावकऱ्यांना दिले होते. त्यामुळे योजनेचे काम पाहता भूमरेंनी आपला शब्द पाळला असल्याचं शेतकरी बोलत आहे.

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा तांत्रिकदृष्ट्या 100 टक्के पूर्ण झाला असून, पाण्याच्या चाचण्या घेण्यात येत आहे. योजनेच्या उद्घाटन झाल्यावर गावकऱ्यांना या पाण्याचा मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे. मात्र असे असताना सुद्धा काही लोकं अफवा पसरवण्याचे काम करत आहे. अनिल निंभोरे (कार्यकारी अभियंता )