शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

भुमरेंनी शब्द पाळला; 'त्या' दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 16:17 IST

स्थानिक राजकरणामुळे होणाऱ्या विरोधामुळे या योजनेला वेळोवेळी अडचणी निर्माण झाल्या.

औरंगाबाद : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना जवळपास पूर्ण झाली आहे. तर कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थित सोमवारी पाण्याची चाचणी होणार असून, अधिवेशन संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या योजनेच्या पाण्याच उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे.

सततच्या वेगवेगळ्या कारणांनी ही योजना गेल्या 10 वर्षांपासून रखडली होती. स्थानिक राजकरणामुळे होणाऱ्या विरोधामुळे या योजनेला वेळोवेळी अडचणी निर्माण झाल्या. त्यातच मोबदल्याच्या मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. मात्र पोलीस बंदोबस्तात हे काम सुरु ठेवण्यात आले आणि अखेर या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर पुढील आठवड्यात उद्घाटन सुद्धा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना तांत्रिकदृष्ट्या 100 टक्के पूर्ण झाली असून, अंतिम चाचणीनंतर गावकऱ्यांना थेट पाणी मिळणार आहे. जायकवाडी धरण परिसरात पंपहाऊस उभारण्यात आले असून तेथून हे पाणी उपसा केला जाणार आहे. त्यामुळे खेर्डा प्रकल्पात थेट पाणी जाणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर होणार आहे. तर ही योजना पूर्ण झाल्यावर 55 गावंचा प्रश्न मिटणार असून, 14 हजार 582 हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे.

भूमरेंनी शब्द पाळला

निवडणुका येताच सर्वच पक्षाकडून ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनावरून राजकरण केले जात असल्याचे पाहायला मिळायचे. विधानसभा निवडणुकीत सुद्धा या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. तर 2020 पूर्वीच ही योजना पूर्ण करणार असल्याचं आश्वासन भुमरे यांनी गावकऱ्यांना दिले होते. त्यामुळे योजनेचे काम पाहता भूमरेंनी आपला शब्द पाळला असल्याचं शेतकरी बोलत आहे.

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा तांत्रिकदृष्ट्या 100 टक्के पूर्ण झाला असून, पाण्याच्या चाचण्या घेण्यात येत आहे. योजनेच्या उद्घाटन झाल्यावर गावकऱ्यांना या पाण्याचा मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे. मात्र असे असताना सुद्धा काही लोकं अफवा पसरवण्याचे काम करत आहे. अनिल निंभोरे (कार्यकारी अभियंता )