शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रोजगार हमीवर महाराष्ट्रात अत्यल्प खर्च; बिहार, छत्तीसगडसुद्धा पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 19:49 IST

खर्च व्हायला हवे होते ५ हजार कोटी... झाले १,६०० कोटी

ठळक मुद्देराजस्थान, बिहार, छत्तीसगड व मध्यप्रदेश पुढे ग्रामरोजगारसेवकास महाराष्ट्रात तुटपुंज्या मानधनावर कामएका कुटुंबाला जेमतेम ४५ दिवस रोजगार

- स.सो. खंडाळकर 

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर महाराष्ट्रात केंद्र सरकारची अत्यल्प रक्कम खर्च होत असून, त्यातला ग्रामरोजगारसेवक, तर वाऱ्यावरच सोडून दिला की काय, अशी परिस्थिती आहे. राजस्थान, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये हा ग्रामरोजगारसेवक चांगला पगार घेत असताना महाराष्ट्रात मात्र तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहे. त्या-त्या ग्रामसभांनी ग्रामरोजगारसेवक म्हणून नियुक्त केलेले ठराव सोबत घेऊन तो काम करीत असून, त्याच्याकडे शासनाचे कोणतेही नियुक्तीपत्र नाही.

केंद्र शासनाने नियुक्त करून दिलेल्या १०० दिवसांपेक्षा जास्त रोजगाराची रक्कम राज्य शासनास अदा करावी लागते. मागील वर्षात निर्माण झालेल्या ९ कोटी मनुष्य दिवसांपैकी जवळपास तीन कोटी मनुष्य दिवस हे १०० पेक्षा जास्त दिवस काम केलेल्या मजुरांचे आहेत. म्हणजेच राज्यास केवळ मजुरीसाठी ६०० कोटी व आनुषंगिक साहित्यासाठी जवळपास ४०० कोटी याप्रमाणे १,००० कोटी रुपये राज्य रोहयोतून उपलब्ध करून द्यावे लागलेले आहेत. 

या योजनेतील बेरोजगार भत्त्याची कुठेच अंमलबजावणी झालेली नाही. काम नसल्यास संबंधित मजुरास ५० टक्केम्हणजे २०६ रुपयांच्या अर्धी रक्कम १०३ रुपये बेरोजगार भत्ता म्हणून देणे भाग आहे; परंतु महाराष्ट्रात कुठेच असा भत्ता दिला जात नसल्याचे उघड होत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र पुरस्कृत असून, ती महाराष्ट्रातल्या रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येत आहे. या योजनेवर महाराष्ट्रात खूपच कमी रक्कम खर्च होण्यास विविध कारणे असली तरी ग्रामरोजगारसेवकांचे यातले आकर्षण संपले असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीस खीळ बसण्याची शक्यता आहे. ग्रामरोजगारसेवकांना उचित  किंवा निश्चित मानधन देण्याकडे शासन सतत दुर्लक्ष करीत आहे. 

एका कुटुंबाला जेमतेम ४५ दिवस रोजगारमागील वर्षी नऊ कोटी मनुष्य दिवस निर्मिती झालेली असून, दोन लक्ष मजूर कुटुंबांनी कामाची मागणी केली आहे. म्हणजे ४५ दिवस एका कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून देण्यात राज्य यशस्वी ठरलेले आहे.असे असले तरी केंद्र शासनाची किमान शंभर दिवसांची हमी लक्षात घेता या कामांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यास वाव आहे. ग्रामरोजगारसेवकांच्या अत्यंत न्याय्य मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्रात या योजनेचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे दिसून येते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारfundsनिधी