शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

प्रकाश आंबेडकर यांच्या पराभवाचे एमआयएमला दु:ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:05 IST

बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत अकोला आणि सोलापूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला.

ठळक मुद्देमुस्लिम समाजाने साथ न दिल्याच्या मुद्यावर मौनकाँग्रेस-राष्ट्रवादीपासून कंटाळलेल्या मतदारांना आता राज्यात तिसरा पर्याय मिळाला आहे.

औरंगाबाद : बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत अकोला आणि सोलापूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. एमआयएमला त्यांच्या पराभवाचे दु:ख असल्याचे मत खा. इम्तियाज जलील यांनी आज एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये एमआयएम- बहुजन वंचित आघाडी चमत्कार करणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मुस्लिम-दलित बांधवांनी शंभर टक्के साथ दिल्याने एमआयएमला विजय मिळविता आला. सोलापूर, अकोला लोकसभा मतदारसंघात मुस्लिम बांधवांनी प्रकाश आंबेडकर यांना मतदान केले नाही, या थेट प्रश्नावर इम्तियाज जलील यांनी नमूद केले की, आम्हाला सर्वाधिक दु:ख त्यांच्या पराभवाचे आहे. काही जागांवर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी अजिबात मिळाला नाही. याची नेमकी कारणे काय याचा शोध घेण्यात येत आहे. सोलापूर येथे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईहून काही मुस्लिम धर्मगुरूआणले होते. त्यांचा सोयीस्कर वापर त्यांनी केल्याचा आरोप जलील यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांच्या विजयासाठी मी स्वत: आणि खा. असदोद्दीन ओवेसी यांनीही बरेच प्रयत्न केले. मुस्लिमांनी मतदान का केले नाही, यावर उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

काँग्रेस-राष्ट्रवादीपासून कंटाळलेल्या मतदारांना आता राज्यात तिसरा पर्याय मिळाला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा चमत्कार पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मागील २० वर्षांमध्ये कोणताच विकास झालेला नाही. या मतदारसंघात काम करण्याची बरीच संधी आहे. शहरातील नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. दळणवळण, रस्ते, पाणी या पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे जलील यांनी सांगितले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलील