शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

एमआयएमचा औरंगाबादच्या सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:30 IST

गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीतील युवकांना पुन्हा दुस-या गुन्ह्यात सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लमिनच्या (एमआयएम) कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करीत साडेतीन तास ठिय्या दिला.

ठळक मुद्देदुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्याचा संताप : आयुक्तांच्या आवाहनानंतर जमाव पांगला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीतील युवकांना पुन्हा दुस-या गुन्ह्यात सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लमिनच्या (एमआयएम) कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करीत साडेतीन तास ठिय्या दिला.या घटनेमुळे सिटीचौक, शहागंज, जुनाबाजार परिसरातील काही दुकाने व्यापाºयांनी बंद केली. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जमावाला शांततेचे आवाहन केल्यावर तणाव निवळला.दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या युवकांना अलीकडेच जामीन मिळाला होता. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी त्यांना दंगलीच्या अन्य दुसºया गुन्ह्यात (पोलीस निरीक्षकावर हल्ला) ताब्यात घेतले.सायंकाळी उशिरा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अंजूम शेख यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते संतप्त झाले व मोठ्या संख्येने सिटीचौक ठाण्यासमोर जमा झाले.ताब्यात घेतलेल्या युवकांना सोडून द्यावे, अशी मागणी करीत दुपारी २ वाजेपासून एमआयएम कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यानंतर एमआयएमचे आ. इम्तियाज जलिल यांच्यासह पदाधिकाºयांनी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा केली.दंगलप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांकडून एका समाजावर अन्याय करण्याचा प्रश्नच नाही, तसेच कुणीही गदारोळ करू नये. शांतता राखावी. त्यासाठी शिष्टमंडळानेच नागरिकांना शांततेचे आवाहन करावे, असेही आयुक्तांनी आवाहन केले. त्यानंतर ठाण्यासमोरील जमाव हळूहळू पांगला.दरम्यान संतप्त जमाव ठाण्यावर आल्यामुळे हत्यारबंद पोलीस कुमक, वज्रवाहन, बुलेट प्रूफ जाकिटसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसArrestअटकagitationआंदोलन