शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

एमआयएमचा वंचितकडे ८० जागांचा प्रस्ताव; औरंगाबादमधील तिन्ही जागांवर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 15:47 IST

औरंगाबाद मध्य, पूर्व, पश्चिम मतदारसंघ लढवणार

ठळक मुद्देएमआयएमकडे अगदी मराठा, ब्राह्मणांपासून इतरही समाजघटकांचा ओढा नव्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी तीनऐवजी चार दिवसांची मुदत‘स्थानिक स्वराज्य’चा निर्णय लवकरच

औरंगाबाद : २०१४ साली एमआयएमने विधानसभेच्या २४ जागा लढविल्या होत्या. यावेळी तेवढ्या जागा एमआयएम लढवीलच. त्यात औरंगाबादच्या तीन जागांचाही समावेश आहे. त्यामुळे औरंगाबादच्या पूर्व, मध्य आणि पश्चिमवर एमआयएमचा दावा राहील, असे आज येथे औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

ते म्हणाले, एमआयएमने शंभर जागा हव्या अशी मागणी केली. आता आम्ही ८० जागांचा प्रस्ताव ठेवलाय. कारण गेल्या पाच वर्षांपासून एमआयएमकडे अगदी मराठा, ब्राह्मणांपासून इतरही समाजघटकांचा ओढा वाढलाय. हे जरी असले तरी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी चर्चा सुरू ठेवून इतक्या इतक्या जागांवर तुम्ही लढू शकता, असे म्हणून वाट मोकळी करून दिली तर आम्ही तयारीला लागू. नव्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी तीनऐवजी चार दिवसांची मुदत शंकरराव लिंगे, महेंद्र लिंगे व सुभाष तनकर यांचा समावेश असलेल्या समितीला देण्यात आलेली आहे. 

मुस्लिम मते मौलवीच्या हातात आहेत, या आंबेडकर यांच्या ताज्या विधानाकडे लक्ष वेधले असता जलील म्हणाले, काँग्रेसधार्जिणे मौलवी काँग्रेसच्या बाजूने असू शकतात. परंतु आता मुस्लिम समाजालाही हे लक्षात येत आहे की, तीन तलाक आणि कलम ३७० हटविण्याच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही संसदेत आवाज उठविला नाही. त्यांनी सभात्याग करणे पसंत केले. 

सुमित कोठारी आणि जसवंतसिंह हे दोघेही विमानसेवांच्या संदर्भात चांगला पाठपुरावा करीत आहेत. औरंगाबादहून विमानसेवेसाठी एअर लाईन्सची पूर्ण तयारी होत आली आहे. इंडिगोचीही तयारी आहे, पण पावसामुळे थोडासा परिणाम झाला आहे,  असे सांगून लोकसभेत आवाज उठविण्याने प्रश्न मार्गी लागतात, याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. रेल्वे प्रश्नांवर आवाज  उठविल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी त्यांना पाठविलेले पत्रच यावेळी दाखविले. यावेळी अरुण बोर्डे, गंगाधर ढगे, नासेर सिद्दीकी, शेख अहमद आदींची उपस्थिती होती.

‘स्थानिक स्वराज्य’चा निर्णय लवकरचबुधवारी दिल्लीहून आल्यानंतर एमआयएमच्या सर्व नगरसेवकांसमवेत माझी बैठक झाली. त्यात त्यांनी सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत मतदान कुणाला करायचे हे ठरविण्याचा अधिकार मला दिला. मी पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करीन. तसे तर दोन्ही उमेदवार आमच्या दृष्टीने योग्य नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलीलvidhan sabhaविधानसभाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी