शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमचा वंचितकडे ८० जागांचा प्रस्ताव; औरंगाबादमधील तिन्ही जागांवर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 15:47 IST

औरंगाबाद मध्य, पूर्व, पश्चिम मतदारसंघ लढवणार

ठळक मुद्देएमआयएमकडे अगदी मराठा, ब्राह्मणांपासून इतरही समाजघटकांचा ओढा नव्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी तीनऐवजी चार दिवसांची मुदत‘स्थानिक स्वराज्य’चा निर्णय लवकरच

औरंगाबाद : २०१४ साली एमआयएमने विधानसभेच्या २४ जागा लढविल्या होत्या. यावेळी तेवढ्या जागा एमआयएम लढवीलच. त्यात औरंगाबादच्या तीन जागांचाही समावेश आहे. त्यामुळे औरंगाबादच्या पूर्व, मध्य आणि पश्चिमवर एमआयएमचा दावा राहील, असे आज येथे औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

ते म्हणाले, एमआयएमने शंभर जागा हव्या अशी मागणी केली. आता आम्ही ८० जागांचा प्रस्ताव ठेवलाय. कारण गेल्या पाच वर्षांपासून एमआयएमकडे अगदी मराठा, ब्राह्मणांपासून इतरही समाजघटकांचा ओढा वाढलाय. हे जरी असले तरी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी चर्चा सुरू ठेवून इतक्या इतक्या जागांवर तुम्ही लढू शकता, असे म्हणून वाट मोकळी करून दिली तर आम्ही तयारीला लागू. नव्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी तीनऐवजी चार दिवसांची मुदत शंकरराव लिंगे, महेंद्र लिंगे व सुभाष तनकर यांचा समावेश असलेल्या समितीला देण्यात आलेली आहे. 

मुस्लिम मते मौलवीच्या हातात आहेत, या आंबेडकर यांच्या ताज्या विधानाकडे लक्ष वेधले असता जलील म्हणाले, काँग्रेसधार्जिणे मौलवी काँग्रेसच्या बाजूने असू शकतात. परंतु आता मुस्लिम समाजालाही हे लक्षात येत आहे की, तीन तलाक आणि कलम ३७० हटविण्याच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही संसदेत आवाज उठविला नाही. त्यांनी सभात्याग करणे पसंत केले. 

सुमित कोठारी आणि जसवंतसिंह हे दोघेही विमानसेवांच्या संदर्भात चांगला पाठपुरावा करीत आहेत. औरंगाबादहून विमानसेवेसाठी एअर लाईन्सची पूर्ण तयारी होत आली आहे. इंडिगोचीही तयारी आहे, पण पावसामुळे थोडासा परिणाम झाला आहे,  असे सांगून लोकसभेत आवाज उठविण्याने प्रश्न मार्गी लागतात, याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. रेल्वे प्रश्नांवर आवाज  उठविल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी त्यांना पाठविलेले पत्रच यावेळी दाखविले. यावेळी अरुण बोर्डे, गंगाधर ढगे, नासेर सिद्दीकी, शेख अहमद आदींची उपस्थिती होती.

‘स्थानिक स्वराज्य’चा निर्णय लवकरचबुधवारी दिल्लीहून आल्यानंतर एमआयएमच्या सर्व नगरसेवकांसमवेत माझी बैठक झाली. त्यात त्यांनी सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत मतदान कुणाला करायचे हे ठरविण्याचा अधिकार मला दिला. मी पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करीन. तसे तर दोन्ही उमेदवार आमच्या दृष्टीने योग्य नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलीलvidhan sabhaविधानसभाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी