शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांचे परजिल्ह्यात स्थलांतर

By admin | Updated: August 25, 2014 01:39 IST

विनोद नरसाळे , कोळगाव गेवराई तालुका व परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे़ यामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ पाऊस नसल्या कारणाने पिके उगवलीच नाहीत़

विनोद नरसाळे , कोळगावगेवराई तालुका व परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे़ यामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ पाऊस नसल्या कारणाने पिके उगवलीच नाहीत़ हाताला काम मिळत नसल्याने मजूर इतर जिल्ह्यात स्थलांतर करीत आहेत़२०१२ मध्ये जिल्ह्यात दुष्काळ पडला होता़ त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता़ त्याचा परिणाम शेतामध्ये काम करणाऱ्या मजूरांवर झाला होता़ २०१३ मध्ये पाऊस झाला मात्र गारपिटीमुळे पिके वाया गेली़ यंदा जून महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे़ काही भाग सोडता अनेक ठिकाणी अत्यल्प पाऊस झालेला आहे़ आता पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे़ त्यात पिके कशी जगणार, वाढणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़पिके येणारच नसल्याने मजूरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ पुढील काळात आपला काम मिळणार नाही ही भीती त्यांना असल्या कारणाने अनेक जण मुंबई, पुणे व पश्चिम महाराष्ट्र या भागात मोलमजुरी करण्यास प्राधान्य देत आहेत़ जवळपास ४०० हून अधिक जणांनी स्थलांतर केली असल्याची बाब समोर आली आहे़दरम्यान, शेतामध्ये काम करण्याऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे़ त्यातच निसर्गाने साथ न दिल्यामुळे पिके वाया गेली आहेत़ जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहिली तर चांगला पाऊस झाला तर पुन्हा मजूर मिळण्याची शक्यता कमीच आहे़ कारण एक वर्षापूर्वीच दुष्काळ पडला होता़ त्यानंतर आता पुन्हा दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर आहे़ यामुळे गेल्या काही दिवसापासून मजूरांचे स्थलांतर वाढले आहे़