शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

एमआयडीसीतील ३०० उद्योग पडले बंद !

By admin | Updated: February 4, 2016 00:36 IST

सितम सोनवणे , लातूर लातूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे़ पाण्याच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के उद्योगांवर संक्रात आली आहे़

सितम सोनवणे , लातूरलातूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे़ पाण्याच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के उद्योगांवर संक्रात आली आहे़ आजच्या घडीला जिल्ह्यातील ५० टक्के उद्योग पाण्याअभावी बंद पडले आहेत़ ५० टक्के उद्योगांना घरघर लागली आहे़ तेही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एमआयडीसीतील ६०० छोट्या-मोठ्या उद्योगांपैकी ३०० उद्योग बंद पडले आहेत. तर जिल्ह्यातील १२०० उद्योगांपैकी ६०० उद्योग पाण्याअभावी बंद आहेत. परिणामी, १० हजार मजुरांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, उद्योजकांचे महिन्याला १०० कोटींचे नुकसान होत आहे़लातूर एमआयडीसीत सुमारे ६०० उद्योग व उदगीर, औसा, अहमदपूर, निलंगा या तालुक्यांत सुमारे ६०० उद्योग असे एकूण १२०० उद्योग आहेत़ लातूर शहरात ८० तर जिल्ह्यात २२२ डाळ मिल असून, यातील ५० टक्के डाळ मिल बंद आहेत़ तर ५० टक्के दाळ मिल चालू आहेत़ आहेत त्या मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी एका शिफ्टमध्ये हे उद्योग सुरु आहेत़ सिमेंट निर्मित वस्तू उद्योग शहरात ५० तर जिल्हाभरात १०० आहेत़ यातील ७५ टक्के उद्योग बंद आहेत़ त्यातील २५ टक्के उद्योग सुरु असले तरी जिल्हाभरात बांधकामांना बंदी असल्याने निर्मित उत्पादनाला मागणी नाही़ स्टील उद्योग ३ ते ४ असून, तेही बंदच आहेत़ शहरातील एमआयडीसीत १०० तर जिल्ह्यात १०० असे २०० वेअर हाऊस आहेत़ शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्नच झाले नसल्याने सर्व वेअर हाऊस रिकामेच आहेत़ तसेच शहरात व जिल्ह्यात किरकोळ उद्योग २०० आहेत़ फेब्रीकेशनचे २०० उद्योग जिल्ह्यात आहेत़ एकूणच जिल्ह्यात बांधकाम बंदी आहे़ परिणामी, दारे, खिडक्या आदी साहित्य निर्मिती होत नाही़ जे साहित्य निर्माण केले आहे़ त्यालाही मागणी नाही़ हा उद्योग एकूणच अन्य उद्योगांच्या आर्थिक चक्रातून सुरु असतो़ त्यामुळे अन्य उद्योजकावरचे मंदीचे सावट यावरही पडल्याने फेब्रीकेशन उद्योगालाही या मंदीचा सामना करावा लागत आहे़ जिल्ह्यात या उद्योगांच्या कामासाठी सुमारे २० हजार कामगार काम करत असून, ५० टक्के उद्योग बंद झाल्याने १० हजार मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे़ त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली आहे़ लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईमुळे एमआयडीसीत केवळ आठवड्यातून एकदा पिण्यासाठीच पाणी देत आहेत़ जे उद्योग सुरु आहेत़ त्यांना टँकरच्या माध्यमातून घ्यावे लागत आहे़ ही परिस्थितीही जास्त दिवस चालणार नसून, एमआयडीसी आणि महापालिकेने पुढील काळात उद्योगांना पाणी दिले नाही तर सर्वच उद्योग बंद होतील़ परिणामी, कामगार आणि उद्योजक हे मोठ्या आर्थिक संकटात आल्याशिवाय राहणार नाहीत़