शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील ३०० उद्योग पडले बंद !

By admin | Updated: February 4, 2016 00:36 IST

सितम सोनवणे , लातूर लातूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे़ पाण्याच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के उद्योगांवर संक्रात आली आहे़

सितम सोनवणे , लातूरलातूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे़ पाण्याच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के उद्योगांवर संक्रात आली आहे़ आजच्या घडीला जिल्ह्यातील ५० टक्के उद्योग पाण्याअभावी बंद पडले आहेत़ ५० टक्के उद्योगांना घरघर लागली आहे़ तेही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एमआयडीसीतील ६०० छोट्या-मोठ्या उद्योगांपैकी ३०० उद्योग बंद पडले आहेत. तर जिल्ह्यातील १२०० उद्योगांपैकी ६०० उद्योग पाण्याअभावी बंद आहेत. परिणामी, १० हजार मजुरांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, उद्योजकांचे महिन्याला १०० कोटींचे नुकसान होत आहे़लातूर एमआयडीसीत सुमारे ६०० उद्योग व उदगीर, औसा, अहमदपूर, निलंगा या तालुक्यांत सुमारे ६०० उद्योग असे एकूण १२०० उद्योग आहेत़ लातूर शहरात ८० तर जिल्ह्यात २२२ डाळ मिल असून, यातील ५० टक्के डाळ मिल बंद आहेत़ तर ५० टक्के दाळ मिल चालू आहेत़ आहेत त्या मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी एका शिफ्टमध्ये हे उद्योग सुरु आहेत़ सिमेंट निर्मित वस्तू उद्योग शहरात ५० तर जिल्हाभरात १०० आहेत़ यातील ७५ टक्के उद्योग बंद आहेत़ त्यातील २५ टक्के उद्योग सुरु असले तरी जिल्हाभरात बांधकामांना बंदी असल्याने निर्मित उत्पादनाला मागणी नाही़ स्टील उद्योग ३ ते ४ असून, तेही बंदच आहेत़ शहरातील एमआयडीसीत १०० तर जिल्ह्यात १०० असे २०० वेअर हाऊस आहेत़ शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्नच झाले नसल्याने सर्व वेअर हाऊस रिकामेच आहेत़ तसेच शहरात व जिल्ह्यात किरकोळ उद्योग २०० आहेत़ फेब्रीकेशनचे २०० उद्योग जिल्ह्यात आहेत़ एकूणच जिल्ह्यात बांधकाम बंदी आहे़ परिणामी, दारे, खिडक्या आदी साहित्य निर्मिती होत नाही़ जे साहित्य निर्माण केले आहे़ त्यालाही मागणी नाही़ हा उद्योग एकूणच अन्य उद्योगांच्या आर्थिक चक्रातून सुरु असतो़ त्यामुळे अन्य उद्योजकावरचे मंदीचे सावट यावरही पडल्याने फेब्रीकेशन उद्योगालाही या मंदीचा सामना करावा लागत आहे़ जिल्ह्यात या उद्योगांच्या कामासाठी सुमारे २० हजार कामगार काम करत असून, ५० टक्के उद्योग बंद झाल्याने १० हजार मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे़ त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली आहे़ लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईमुळे एमआयडीसीत केवळ आठवड्यातून एकदा पिण्यासाठीच पाणी देत आहेत़ जे उद्योग सुरु आहेत़ त्यांना टँकरच्या माध्यमातून घ्यावे लागत आहे़ ही परिस्थितीही जास्त दिवस चालणार नसून, एमआयडीसी आणि महापालिकेने पुढील काळात उद्योगांना पाणी दिले नाही तर सर्वच उद्योग बंद होतील़ परिणामी, कामगार आणि उद्योजक हे मोठ्या आर्थिक संकटात आल्याशिवाय राहणार नाहीत़