शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

एमजीपीची केवळ तांत्रिक मान्यता !

By admin | Updated: November 17, 2015 00:31 IST

हणमंत गायकवाड , लातूर बहुचर्चित उजनीहून लातूरला पाणीपुरवठा होणाऱ्या योजनेचे श्रेय लाटण्याची स्पर्धा भाजपाच्या नेतेमंडळीत सुरु असली तरी अद्याप या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही़

हणमंत गायकवाड , लातूरबहुचर्चित उजनीहून लातूरला पाणीपुरवठा होणाऱ्या योजनेचे श्रेय लाटण्याची स्पर्धा भाजपाच्या नेतेमंडळीत सुरु असली तरी अद्याप या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी या योजनेला केवळ तांत्रिक मान्यता दिली असून, पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव मंगळवारी सकाळी ११ वाजता पोहचणार आहे़ त्यासाठी मनपाचा खास दूत सोमवारी रात्री ११ वाजता लातूरहून मुंबईकडे रवाना झाला आहे़उजनीहून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर महानगरपालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे ४३८२़४८ लाख रुपये अशा ढोबळ रकमेचा प्रस्ताव सादर झाला होता़ या प्रस्तावाची शासन निर्णय २००९ नुसार छाननी करुन जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता़ १० नोव्हेंबर २०१५ रोजी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन सदर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला़ दरम्यान, या प्रस्तावाला औरंगाबाद येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता व सहमती पत्र दिले आहे़ त्यानुसार प्रशासकीय मान्यतेसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांकडे हा प्रस्ताव मनपाच्या अधिकाऱ्यांमार्फत पाठविला जाणार आहे़ सोमवारी रात्री मनपाचा अधिकारी हा प्रस्ताव घेऊन रवाना झाला असून, मंगळवारी सकाळी ११ वाजता या प्रस्तावाला प्रधान सचिवांकडून प्रशासकीय मान्यता मिळणार आहे़ मात्र लातूर शहरात भाजपाच्या नेतेमंडळींकडून मान्यता मिळण्यापूर्वीच श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरु झाली आहे़ गेल्या तीन-चार दिवसांपासून ही योजना आणण्यास आम्ही कसा प्रयत्न केला़ यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या जात आहेत़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिलेली ही योजना असून, उजनी धरण ते उस्मानाबाद शहरापर्यंत तीन ठिकाणी पंप बदलणे व वीज वितरण कंपनीची मागणी आदी अनुषंगिक कामे करणे़ त्यासाठी १४ कोटी २६ लाख ८० हजारांचा खर्च दर्शविण्यात आला आहे़ ४उस्मानाबाद जलशुद्धीकरण केंद्राजवळ संपवेल बांधणे व त्यावरील पंप व तेथून शिराढोणपर्यंत पाईपलाईन करणे़ त्यासाठी २५ कोटी ९३ लाख ८२ हजार खर्च होणार आहे़ उजनी धरण ते उस्मानाबाद शहरातील पंप बदलणे, वीज वितरण कंपनीची मागणी व कामे तसेच संपवेल बांधणे आणि शिराढोणपर्यंत पाईपलाईन करणे, या सर्व कामांसाठी ४३ कोटी ८२ लाख ४८ हजार रुपयांच्या खर्चास जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी मान्यता दर्शविली आहे़ या प्रस्तावावर मंगळवारी सकाळी ११ वाजता पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांची स्वाक्षरी होणार आहे़ विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस केलेला प्रस्ताव घेऊन लातूर मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी अशोक पिसाळ मुंबईला सोमवारी रात्रीच रवाना झाले आहेत़ मंगळवारी सकाळी ११ वाजता ते पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांच्या समोर हा प्रस्ताव स्वाक्षरीसाठी ठेवणार आहेत़ मंगळवारी दुपारी बारा-एक वाजेपर्यंत या प्रस्तावावर प्रधान सचिवांची स्वाक्षरी होऊन प्रशासकीय मान्यता मिळेल, अशी खात्री लातूर महानगरपालिकेनेही व्यक्त केली आहे़ नाहरकत प्रमाणपत्राच्या सर्व प्रक्रिया विभागीय आयुक्तांच्या बैठकीतच पूर्ण झाल्या आहेत़ फक्त प्रशासकीय मान्यता राहिली असून, तो मार्गही मंगळवारी सुखकर होणार असल्याचे मनपातील अधिकाऱ्यांनी सांगितले़