शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

राजुरेश्वर विद्यालय देतेय पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By admin | Updated: July 25, 2016 00:33 IST

जालना : अंबड तालुक्यातील कर्जत येथील राजुरेश्वर माध्यमिक विद्यालयाने पर्यावरणाचे संवर्धन व रक्षण व्हावे,

जालना : अंबड तालुक्यातील कर्जत येथील राजुरेश्वर माध्यमिक विद्यालयाने पर्यावरणाचे संवर्धन व रक्षण व्हावे, याकरीता एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांसोबतच ग्रामस्थांना वृक्षसंवर्धन करण्याचा कानमंत्र दिला आहे.विद्यालयाच्या वतीने पर्यावरण वनसंवर्धनाचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. शाळा परिसरात विविध वृक्षांची लागवड करून नक्षत्रवनही तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणाची गोडी लागावी म्हणून शाळेत वसुंधरा निसर्ग मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. २००६ पासून आजपर्यंत शाळेत एक हजार प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने चिंच, लिंब, करंज, सीसम, निलगिरी, बेल, मोह, आरजू, बदाम, पारिजातक, वड, पिंपळ, जांभूळ, चंदन आदी वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षांची लागवड करून त्याची शास्त्रशुद्धपणे जोपासणा केली जात आहे. विशेष म्हणजे विद्यालयाने आॅक्सिजन पार्कची स्थापना केली आहे. यामध्ये तुळस, कोरपड, कडीपत्ता, सदाफुली आदी वनस्पतींची लागवड केली आहे. नक्षत्रवनात २७ विविध झाडांची लागवड केली आहे. पर्यावरण विषयक चांगले कार्य केल्याबद्दल विद्यालयास आतापर्यंत तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्रितारांकित शाळा, पंचतारांकित शाळा, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विलास टकले, ए.एन. वीर, डी.व्ही. जाधव, पी. आर. अहिरे, सचिन टेकाळे, एस. एस. बुनगे, ओ.के. घुगे, एस.व्ही. जिगे, एस.बी. शेरे, डी.एन. पैठणे, व्ही.व्ही. मुळे, ए.बी. उंडे, बी.यू. कोकणी, एम. आर. मिसाळ, ए.बी. उगले, व्ही.पी. सपकाळ, व्ही.बी. घुले परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)