शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जनतेचे कोणतेही काम सांगा पण कोणाच्या बदलीचे काही बोलू नका; योगेश कदम यांचे आवाहन

By बापू सोळुंके | Updated: February 14, 2025 18:21 IST

कोणतीही कामे आमदार, जिल्हाप्रमुखांमार्फत घेऊन या पण बदलीचे काम सांगू नका

छत्रपती संभाजीनगर: माझ्याकडे गृहराज्यमंत्री, ग्रामविकास, महसूल आणि अन्न व नागरी पुरवठा अशी महत्वाची चार महत्वाची खाती आहेत. या खात्याशी संबंधित जनतेची कामे करा आणि पक्षसंघटन मजबूत करा. जनतेची कोणतेही काम सांगा, पण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीचे काम आणू नका, असे आवाहन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

शिंदेसेनेच्या जिल्ह्यातील आमदार आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्री कदम यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित केली होती. यावेळी मंचावर आमदार प्रदीप जैस्वाल,आ.रमेश बोरनारे, आ.संजना जाधव, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी जि.प.अध्यक्षा लता पगारे, शिल्पाराणी वाडकर यांची उपस्थिती होती. यावेळी मंत्री कदम म्हणाले की, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्याला मंत्रीपदाची संधी दिली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिस्तिप्रमाणे आपल्या पक्षात मंत्रीपदापेक्षा पक्षाचा नेता मोठा असतो. आमदारापेक्षा जिल्हाप्रमुख, तर सरपंचापेक्षा शाखाप्रमुख हे मोठे पद मानल्या जाते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकीच्यासाठी संघटन मजबूत करण्यावर सर्वांनी भर द्यावा. आपल्याकडे असलेल्या चार विभागाच्या राज्य मंत्रीपदाचा पदभार आहे. कोकणात ज्याप्रमाणे महसूल कॅम्प आयोजित करुन सामान्य नागरीकांना विविध दाखले दिले होते. तशा प्रकारचा कॅम्प येथेही आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी आमदारांना दिल्या. शिवाय गरीबांना अंत्योदय योजनेतून मोफत धान्य मिळवून द्या, अशी अनेक कामे करुन संघटन मजबूत करा. कोणतीही कामे आमदार, जिल्हाप्रमुखांमार्फत घेऊन या पण बदलीचे काम सांगू नका, असे आवाहनच त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी आ. बोरनारे, आ. जैस्वाल आणि आ. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख जंजाळ यांनी प्रास्तविक केले तर माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सूत्रसंचलन केले.

एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करापक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी कार्यरत असताना केलेले गतीमान काम राज्याने पाहिले आहे. यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे हे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याला जसे वाटते तसे आपल्याही वाटत असल्याचे कदम यांनी सांगितले. असे असले तरी महायुती म्हणून आपण एकत्रित काम करणे गरजचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरYogesh Kadamयोगेश कदमShiv Senaशिवसेना