शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

जनतेचे कोणतेही काम सांगा पण कोणाच्या बदलीचे काही बोलू नका; योगेश कदम यांचे आवाहन

By बापू सोळुंके | Updated: February 14, 2025 18:21 IST

कोणतीही कामे आमदार, जिल्हाप्रमुखांमार्फत घेऊन या पण बदलीचे काम सांगू नका

छत्रपती संभाजीनगर: माझ्याकडे गृहराज्यमंत्री, ग्रामविकास, महसूल आणि अन्न व नागरी पुरवठा अशी महत्वाची चार महत्वाची खाती आहेत. या खात्याशी संबंधित जनतेची कामे करा आणि पक्षसंघटन मजबूत करा. जनतेची कोणतेही काम सांगा, पण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीचे काम आणू नका, असे आवाहन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

शिंदेसेनेच्या जिल्ह्यातील आमदार आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्री कदम यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित केली होती. यावेळी मंचावर आमदार प्रदीप जैस्वाल,आ.रमेश बोरनारे, आ.संजना जाधव, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी जि.प.अध्यक्षा लता पगारे, शिल्पाराणी वाडकर यांची उपस्थिती होती. यावेळी मंत्री कदम म्हणाले की, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्याला मंत्रीपदाची संधी दिली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिस्तिप्रमाणे आपल्या पक्षात मंत्रीपदापेक्षा पक्षाचा नेता मोठा असतो. आमदारापेक्षा जिल्हाप्रमुख, तर सरपंचापेक्षा शाखाप्रमुख हे मोठे पद मानल्या जाते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकीच्यासाठी संघटन मजबूत करण्यावर सर्वांनी भर द्यावा. आपल्याकडे असलेल्या चार विभागाच्या राज्य मंत्रीपदाचा पदभार आहे. कोकणात ज्याप्रमाणे महसूल कॅम्प आयोजित करुन सामान्य नागरीकांना विविध दाखले दिले होते. तशा प्रकारचा कॅम्प येथेही आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी आमदारांना दिल्या. शिवाय गरीबांना अंत्योदय योजनेतून मोफत धान्य मिळवून द्या, अशी अनेक कामे करुन संघटन मजबूत करा. कोणतीही कामे आमदार, जिल्हाप्रमुखांमार्फत घेऊन या पण बदलीचे काम सांगू नका, असे आवाहनच त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी आ. बोरनारे, आ. जैस्वाल आणि आ. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख जंजाळ यांनी प्रास्तविक केले तर माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सूत्रसंचलन केले.

एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करापक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी कार्यरत असताना केलेले गतीमान काम राज्याने पाहिले आहे. यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे हे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याला जसे वाटते तसे आपल्याही वाटत असल्याचे कदम यांनी सांगितले. असे असले तरी महायुती म्हणून आपण एकत्रित काम करणे गरजचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरYogesh Kadamयोगेश कदमShiv Senaशिवसेना