शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मयूर पार्क की ‘चिखलदरा’? जलवाहिनीसाठी खोदून ठेवले रस्ते, तेथे साचली आता दलदल

By साहेबराव हिवराळे | Updated: July 29, 2023 18:25 IST

५० कोटींतून रस्ते पुन्हा चकचकीत बनण्याची आशा

छत्रपती संभाजीनगर : जळगाव रोडलगत उदयास आलेल्या मयूर पार्कचे रस्ते छान गुळगुळीत होते. पण जलवाहिनीच्या कामासाठी ते खोदले गेले... पावसाळा सुरू झाला अन् दलदल बनली... स्मार्ट सिटीतून रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी मंजूर आहे. यामुळे रस्ते त्वरित पुन्हा गुळगुळीत करण्याची मागणी येथील रहिवाशांतून होत आहे.

हर्सूल टी पॉईंटजवळच बिल्डरने हा प्रकल्प उभारला होता. खूप नागरिकांनी मयूर पार्कमध्ये प्लॉट, फ्लॅट घेतले. सोसायट्या स्थापन केल्या. पण अनेक वर्षांपासून रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. अनेकवेळा नागरिकांनी आंदोलन केले, तेव्हा थातूरमातूर रस्ता केला गेला. तो रस्तादेखील एका पावसात होता की नव्हता झाला. मयूर पार्क, कार्तिकनगर हा चिखल पार्क झालेला आहे. एसबीओए ते देवगिरी बँकेपर्यंत हा प्रमुख रस्ता अनेक वर्षांपासून मंजूर झालेला आहे. शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जाणे कठीण होत आहे. महिन्याभरापूर्वी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनीदेखील या परिसराला भेट दिली होती.

शहरातील पहिला स्मार्ट वॉर्ड ठरणारमयूर पार्क हा शहरातील पहिला स्मार्ट वॉर्ड ठरणार असून, १०० किलोमीटर नवीन जलवाहिनी टाकून सर्वांना मुबलक पाणी पुरवठा केला जाणार आहे. जलवाहिनीसाठी रस्ते उखडले. त्याचा पावसामुळे नागरिकांना थोडाफार त्रास झाला; परंतु तो आता कमी होईल. कारण ५० कोटींतून रस्ते पुन्हा गुळगुळीत होणार आहेत.- विजय औताडे, माजी नगरसेवक 

तुम्ही शहरात राहता की खेड्यात...?जेव्हा पाहुणे म्हणतात, तुम्ही खेड्यात राहता की शहरात? तेव्हा निरूत्तर होतो. डांबरी रस्ता पाइपलाइनमुळे उखडला; त्यात पाणी तुंबले. खड्ड्यांचा अंदाज येत नाही.- आशिष जोशी (नागरिक)

समस्या घेऊन जावे तरी कोणाकडे?एसबीओसमोरचा पूर्वेकडील समांतर रस्ता एक वर्षापासून खोदून ठेवला आहे. तेथे डबके साचते. जनतेला कोणी वाली नाही. घरपट्टी, नळपट्टी वसुली मात्र जोरात सुरू आहे. सध्या नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांनी समस्या घेऊन जावे तरी कोणाकडे?- विद्या साळवे, रहिवासी

सांडपाण्याची विल्हेवाट कशी? नाले चोकअप असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- अप्पासाहेब चंद्रटिके, रहिवासी

कर नियमितपणे भरतो...रहिवाशांना चार महिने समस्या भेडसावतात. त्यांचे एकदाचे निराकरण करावे, कारण बहुतांश जण मनपाला कर अदा करतात.- ममराज राठोड, रहिवासी

आणखी प्रयत्नांची गरजसविता सुरे, सीताराम सुरे आणि विजय औताडे हे नगरसेवक राहिले असून त्यांनी काही विकासकामे केलेली आहेत. शासनाचाही निधी येथे लोकप्रतिनिधींनी खर्च केलेला आहे. पण आता चिखलमुक्तीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका