शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मयूर पार्क की ‘चिखलदरा’? जलवाहिनीसाठी खोदून ठेवले रस्ते, तेथे साचली आता दलदल

By साहेबराव हिवराळे | Updated: July 29, 2023 18:25 IST

५० कोटींतून रस्ते पुन्हा चकचकीत बनण्याची आशा

छत्रपती संभाजीनगर : जळगाव रोडलगत उदयास आलेल्या मयूर पार्कचे रस्ते छान गुळगुळीत होते. पण जलवाहिनीच्या कामासाठी ते खोदले गेले... पावसाळा सुरू झाला अन् दलदल बनली... स्मार्ट सिटीतून रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी मंजूर आहे. यामुळे रस्ते त्वरित पुन्हा गुळगुळीत करण्याची मागणी येथील रहिवाशांतून होत आहे.

हर्सूल टी पॉईंटजवळच बिल्डरने हा प्रकल्प उभारला होता. खूप नागरिकांनी मयूर पार्कमध्ये प्लॉट, फ्लॅट घेतले. सोसायट्या स्थापन केल्या. पण अनेक वर्षांपासून रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. अनेकवेळा नागरिकांनी आंदोलन केले, तेव्हा थातूरमातूर रस्ता केला गेला. तो रस्तादेखील एका पावसात होता की नव्हता झाला. मयूर पार्क, कार्तिकनगर हा चिखल पार्क झालेला आहे. एसबीओए ते देवगिरी बँकेपर्यंत हा प्रमुख रस्ता अनेक वर्षांपासून मंजूर झालेला आहे. शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जाणे कठीण होत आहे. महिन्याभरापूर्वी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनीदेखील या परिसराला भेट दिली होती.

शहरातील पहिला स्मार्ट वॉर्ड ठरणारमयूर पार्क हा शहरातील पहिला स्मार्ट वॉर्ड ठरणार असून, १०० किलोमीटर नवीन जलवाहिनी टाकून सर्वांना मुबलक पाणी पुरवठा केला जाणार आहे. जलवाहिनीसाठी रस्ते उखडले. त्याचा पावसामुळे नागरिकांना थोडाफार त्रास झाला; परंतु तो आता कमी होईल. कारण ५० कोटींतून रस्ते पुन्हा गुळगुळीत होणार आहेत.- विजय औताडे, माजी नगरसेवक 

तुम्ही शहरात राहता की खेड्यात...?जेव्हा पाहुणे म्हणतात, तुम्ही खेड्यात राहता की शहरात? तेव्हा निरूत्तर होतो. डांबरी रस्ता पाइपलाइनमुळे उखडला; त्यात पाणी तुंबले. खड्ड्यांचा अंदाज येत नाही.- आशिष जोशी (नागरिक)

समस्या घेऊन जावे तरी कोणाकडे?एसबीओसमोरचा पूर्वेकडील समांतर रस्ता एक वर्षापासून खोदून ठेवला आहे. तेथे डबके साचते. जनतेला कोणी वाली नाही. घरपट्टी, नळपट्टी वसुली मात्र जोरात सुरू आहे. सध्या नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांनी समस्या घेऊन जावे तरी कोणाकडे?- विद्या साळवे, रहिवासी

सांडपाण्याची विल्हेवाट कशी? नाले चोकअप असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- अप्पासाहेब चंद्रटिके, रहिवासी

कर नियमितपणे भरतो...रहिवाशांना चार महिने समस्या भेडसावतात. त्यांचे एकदाचे निराकरण करावे, कारण बहुतांश जण मनपाला कर अदा करतात.- ममराज राठोड, रहिवासी

आणखी प्रयत्नांची गरजसविता सुरे, सीताराम सुरे आणि विजय औताडे हे नगरसेवक राहिले असून त्यांनी काही विकासकामे केलेली आहेत. शासनाचाही निधी येथे लोकप्रतिनिधींनी खर्च केलेला आहे. पण आता चिखलमुक्तीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका