शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

मयूर पार्क की ‘चिखलदरा’? जलवाहिनीसाठी खोदून ठेवले रस्ते, तेथे साचली आता दलदल

By साहेबराव हिवराळे | Updated: July 29, 2023 18:25 IST

५० कोटींतून रस्ते पुन्हा चकचकीत बनण्याची आशा

छत्रपती संभाजीनगर : जळगाव रोडलगत उदयास आलेल्या मयूर पार्कचे रस्ते छान गुळगुळीत होते. पण जलवाहिनीच्या कामासाठी ते खोदले गेले... पावसाळा सुरू झाला अन् दलदल बनली... स्मार्ट सिटीतून रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी मंजूर आहे. यामुळे रस्ते त्वरित पुन्हा गुळगुळीत करण्याची मागणी येथील रहिवाशांतून होत आहे.

हर्सूल टी पॉईंटजवळच बिल्डरने हा प्रकल्प उभारला होता. खूप नागरिकांनी मयूर पार्कमध्ये प्लॉट, फ्लॅट घेतले. सोसायट्या स्थापन केल्या. पण अनेक वर्षांपासून रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. अनेकवेळा नागरिकांनी आंदोलन केले, तेव्हा थातूरमातूर रस्ता केला गेला. तो रस्तादेखील एका पावसात होता की नव्हता झाला. मयूर पार्क, कार्तिकनगर हा चिखल पार्क झालेला आहे. एसबीओए ते देवगिरी बँकेपर्यंत हा प्रमुख रस्ता अनेक वर्षांपासून मंजूर झालेला आहे. शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जाणे कठीण होत आहे. महिन्याभरापूर्वी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनीदेखील या परिसराला भेट दिली होती.

शहरातील पहिला स्मार्ट वॉर्ड ठरणारमयूर पार्क हा शहरातील पहिला स्मार्ट वॉर्ड ठरणार असून, १०० किलोमीटर नवीन जलवाहिनी टाकून सर्वांना मुबलक पाणी पुरवठा केला जाणार आहे. जलवाहिनीसाठी रस्ते उखडले. त्याचा पावसामुळे नागरिकांना थोडाफार त्रास झाला; परंतु तो आता कमी होईल. कारण ५० कोटींतून रस्ते पुन्हा गुळगुळीत होणार आहेत.- विजय औताडे, माजी नगरसेवक 

तुम्ही शहरात राहता की खेड्यात...?जेव्हा पाहुणे म्हणतात, तुम्ही खेड्यात राहता की शहरात? तेव्हा निरूत्तर होतो. डांबरी रस्ता पाइपलाइनमुळे उखडला; त्यात पाणी तुंबले. खड्ड्यांचा अंदाज येत नाही.- आशिष जोशी (नागरिक)

समस्या घेऊन जावे तरी कोणाकडे?एसबीओसमोरचा पूर्वेकडील समांतर रस्ता एक वर्षापासून खोदून ठेवला आहे. तेथे डबके साचते. जनतेला कोणी वाली नाही. घरपट्टी, नळपट्टी वसुली मात्र जोरात सुरू आहे. सध्या नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांनी समस्या घेऊन जावे तरी कोणाकडे?- विद्या साळवे, रहिवासी

सांडपाण्याची विल्हेवाट कशी? नाले चोकअप असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- अप्पासाहेब चंद्रटिके, रहिवासी

कर नियमितपणे भरतो...रहिवाशांना चार महिने समस्या भेडसावतात. त्यांचे एकदाचे निराकरण करावे, कारण बहुतांश जण मनपाला कर अदा करतात.- ममराज राठोड, रहिवासी

आणखी प्रयत्नांची गरजसविता सुरे, सीताराम सुरे आणि विजय औताडे हे नगरसेवक राहिले असून त्यांनी काही विकासकामे केलेली आहेत. शासनाचाही निधी येथे लोकप्रतिनिधींनी खर्च केलेला आहे. पण आता चिखलमुक्तीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका