शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची याचिका फेटाळली; अपात्रतेबाबत राज्यमंत्र्यांकडेच सुनावणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 13:04 IST

कॅबिनेट मंत्र्यांना राज्यमंत्र्याकडे प्रकरण वर्ग करण्याचे अधिकार; औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

औरंगाबाद : कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकाराला आव्हान देणारी बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. जी. दिघे यांनी गुरुवारी (दि.२३) फेटाळली.

महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीच्या तरतुदीनुसार कॅबिनेट मंत्र्यांना प्रकरण राज्यमंत्र्यांकडे वर्ग करण्याचे अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा खंडपीठाने दिला आहे. डॉ. क्षीरसागर यांच्या अपात्रतेबाबत ५ जानेवारी २०२२ रोजी राज्यमंत्र्यांसमोर सुनावणी ठेवण्याचे आदेशित केले आहे. डॉ. क्षीरसागर यांच्या अपात्रतेचे प्रकरण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे हस्तांतरित केले होते. त्या नाराजीने डॉ. क्षीरसागर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती.

काय होती याचिकाबीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पदाचा दुरुपयोग व गैरवापर केल्याने त्यांना अपात्र करावे, अशी तक्रार बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडे केली होती. सदर प्रकरण नगरविकास कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांकडे वर्ग करण्यात आले होते. प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय राजकीय हेतूने असल्याचे नगराध्यक्षांचे म्हणणे होते. भारतीय राज्यघटनेत आणि राज्य शासनाच्या काही नियमावलीमध्ये प्रकरण वर्ग करण्याचे अधिकार फक्त राज्यपालांनाच आहेत. अर्धन्यायिक प्रकरणातील कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत हस्तांतरित केली जाऊ शकत नाही, असेही त्यांचे म्हणणे होते.आ. संदीप क्षीरसागर यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र देशमुख आणि ॲड. सय्यद तौसीफ यासीन यांनी, तर शासनातर्फे ॲड. डी.आर. काळे यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठBeedबीड