शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

‘जन्नत’साठी अल्लाहची इबादत, पैैगंबर यांची शिकवण आचरणात आणा- मौलाना शमीम साहब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:06 IST

‘जन्नत’ मिळविण्यासाठी जगात अल्लाहची इबादत व त्यांचे लाडके नबी प्रेषित मोहंमद पैैगंबर यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्याचा सल्ला मौलाना शमीम साहब यांनी दिला.

ठळक मुद्देराज्यस्तरीय इज्तेमामध्ये रविवारी सकाळी फजरच्या नमाजनंतर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर दुपारी शमीम साहब यांनी नमूद केले की, अल्लाह संपूर्ण मानवजातीचा दाता व शक्तिमान असून, अल्लाहचा संदेश प्रत्येकाकडे पोहोचविण्याचे काम प्रेषितांनी केले. प्रेषित पैगंबर हे अल्लाहचे शेवटचे दूत होते. यानंतर दूत पाठविण्याचा सिलसिला बंद झाल्यामुळे अल्लाहची इबादत, नबीचे विचार, कुरआनची तिलावत करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मौलाना शमीम यांनी सांगितले. 

- शेख महेमूद 

वाळूज महानगर ( औरंगाबाद ): ‘जन्नत’ मिळविण्यासाठी जगात अल्लाहची इबादत व त्यांचे लाडके नबी प्रेषित मोहंमद पैैगंबर यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्याचा सल्ला मौलाना शमीम साहब यांनी दिला. राज्यस्तरीय इज्तेमामध्ये रविवारी ‘जोहर’च्या नमाजनंतर त्यांनी लाखो साथींना मार्गदर्शन केले. पवित्र धर्मग्रंथ ‘कुरआन’ आणि ‘हदीस’चे विविध दाखले देत प्रत्येकाने भक्तीच्या मार्गाचा अवलंब करावा, असे त्यांनी नमूद केले.

राज्यस्तरीय इज्तेमामध्ये रविवारी सकाळी फजरच्या नमाजनंतर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर दुपारी शमीम साहब यांनी नमूद केले की, अल्लाह संपूर्ण मानवजातीचा दाता व शक्तिमान असून, अल्लाहचा संदेश प्रत्येकाकडे पोहोचविण्याचे काम प्रेषितांनी केले. संपूर्ण सृष्टीचा पालनहार एकमेव अल्लाह असून, अल्लाहच्या नजरेत मनुष्य अनमोल आहे. तमाम मानवजातीचे कल्याण व्हावे, यासाठी अल्लाहने जवळपास १ लाख २४ हजार प्रेषित (दूत) पृथ्वीतलावर पाठविले. प्रेषित पैगंबर हे अल्लाहचे शेवटचे दूत होते. यानंतर दूत पाठविण्याचा सिलसिला बंद झाल्यामुळे अल्लाहची इबादत, नबीचे विचार, कुरआनची तिलावत करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मौलाना शमीम यांनी सांगितले. 

मौलाना शमीम पुढे म्हणाले की, ‘कलमा’ ज्याने मनात ठेवून चांगले आचरण केले तोच जीवनात यशस्वी होऊ शकतो. अल्लाहच्या सर्वच दुतांनी जीवन कसे जगावे, याविषयी  मार्गदर्शन करून ‘इमान व दीन’चे महत्त्व पटवून दिले आहे. प्रत्येकाने अल्लाह हा एकच असून, तोच सर्वांचा ‘खालिक व मालिक’ असल्यामुळे प्रत्येकाने अल्लाहची शिकवण व प्रेषितांनी दाखविलेल्या मार्गावरून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाने पाच वेळा नमाज न चुकता अदा करावी, ‘कुरआन’चे वाचन करावे.

प्रमुख उलेमांनी केली जनजागृतीइज्तेमात रविवारी पहाटे फजरची नमाज झाल्यानंतर मौलाना भाई मुश्ताक व दिल्ली निजामुद्दीन मरकजचे प्रमुख हजरत साद साहब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर दुसर्‍या सत्रात मौलाना शौकत साहब यांनी मार्गदर्शन करून जनजागृती केली. 

टॅग्स :Ijtema Aurangabad 2018इज्तेमा औरंगाबाद २०१८Aurangabadऔरंगाबाद