शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवानाच्या पत्नीचा जमिनीसाठी तब्बल ५५ वर्षांपासून संघर्ष, खंडपीठाची शासनास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 13:01 IST

शहीद जवान श्रीरंग बिरादार यांच्या वीर पत्नी सुमित्राबाई यांनी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज केला असता शासनाने तो फेटाळला

औरंगाबाद : १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील ‘ऑपरेशन रिडल’ मध्ये शहीद झालेल्या जवानाच्या (वीर पत्नी) पत्नीचा शासकीय जमिनीसाठी तब्बल ५५ वर्षापासून अविरत संघर्ष चालूच आहे. यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. आर. एन. लड्डा यांनी राज्य शासनासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेवर २४ जानेवारी २०२२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

काय आहे याचिकाशहीद जवान श्रीरंग बिरादार यांच्या वीर पत्नी सुमित्राबाई यांनी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे केलेला अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी ॲड. सचिन देशमुख यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी म्हटल्यानुसार श्रीरंग बिरादार हे धनेगावचे (ता. देवणी, जि. लातूर) रहिवासी असून ते भारतीय सेनेत असताना १९६५ च्या भारत-पाकिस्तानच्या युद्धात ‘ऑपरेशन रिडल’मध्ये १७ सप्टेंबर १९६५ रोजी शहीद झाले होते. शासनाच्या धोरणानुसार शहिदांच्या कुटुंबीयास सरकारी जमीन देण्यात येते. त्यासाठी सुमित्राबाई यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. २०१९ मध्येच देवणीच्या तहसीलदारांनी सुमित्राबाई बिरादार यांना शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोजणीकरीता लागणारी रक्कमही भरून घेतली होती.

त्यानंतर १२ जुलै २०११ च्या शासन निर्णयानुसार चुकीच्या पद्धतीने आणि ‘महाराष्ट्र जमीन महसूल कायदा (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियमाच्या विरोधात जावून शासनाने सुमित्राबाई यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने ॲड. सचिन देशमुख यांना ॲड. मजिद शेख, ॲड. सुयश जांगडा व ॲड. योगेश बिराजदार सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठlaturलातूरMartyrशहीद