शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

शहीद जवानाच्या पत्नीचा जमिनीसाठी तब्बल ५५ वर्षांपासून संघर्ष, खंडपीठाची शासनास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 13:01 IST

शहीद जवान श्रीरंग बिरादार यांच्या वीर पत्नी सुमित्राबाई यांनी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज केला असता शासनाने तो फेटाळला

औरंगाबाद : १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील ‘ऑपरेशन रिडल’ मध्ये शहीद झालेल्या जवानाच्या (वीर पत्नी) पत्नीचा शासकीय जमिनीसाठी तब्बल ५५ वर्षापासून अविरत संघर्ष चालूच आहे. यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. आर. एन. लड्डा यांनी राज्य शासनासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेवर २४ जानेवारी २०२२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

काय आहे याचिकाशहीद जवान श्रीरंग बिरादार यांच्या वीर पत्नी सुमित्राबाई यांनी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे केलेला अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी ॲड. सचिन देशमुख यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी म्हटल्यानुसार श्रीरंग बिरादार हे धनेगावचे (ता. देवणी, जि. लातूर) रहिवासी असून ते भारतीय सेनेत असताना १९६५ च्या भारत-पाकिस्तानच्या युद्धात ‘ऑपरेशन रिडल’मध्ये १७ सप्टेंबर १९६५ रोजी शहीद झाले होते. शासनाच्या धोरणानुसार शहिदांच्या कुटुंबीयास सरकारी जमीन देण्यात येते. त्यासाठी सुमित्राबाई यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. २०१९ मध्येच देवणीच्या तहसीलदारांनी सुमित्राबाई बिरादार यांना शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोजणीकरीता लागणारी रक्कमही भरून घेतली होती.

त्यानंतर १२ जुलै २०११ च्या शासन निर्णयानुसार चुकीच्या पद्धतीने आणि ‘महाराष्ट्र जमीन महसूल कायदा (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियमाच्या विरोधात जावून शासनाने सुमित्राबाई यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने ॲड. सचिन देशमुख यांना ॲड. मजिद शेख, ॲड. सुयश जांगडा व ॲड. योगेश बिराजदार सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठlaturलातूरMartyrशहीद