शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

बारावीच्या ७0 टक्के गुणपत्रिका बोर्डातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:10 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव व प्रभारी अध्यक्षा सुगता पुन्ने तीन दिवसांपासून रजेवर असल्यामुळे बारावीच्या गुणपत्रिकांचे वाटप रखडले आहे. प्राप्त माहितीनुसार सुमारे ७० टक्के गुणपत्रिका मंडळाच्या कार्यालयातच पडून आहेत.

ठळक मुद्देविभागीय सचिव सतत रजेवर : गुणपत्रिकांचे वाटपही रखडले

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव व प्रभारी अध्यक्षा सुगता पुन्ने तीन दिवसांपासून रजेवर असल्यामुळे बारावीच्या गुणपत्रिकांचे वाटप रखडले आहे. प्राप्त माहितीनुसार सुमारे ७० टक्के गुणपत्रिका मंडळाच्या कार्यालयातच पडून आहेत.बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना १२ जूनला गुणपत्रिका मिळणार असल्याचे घोषित केले होते; परंतु विभागीय मंडळाच्या दिरंगाईमुळे १२ जूनला महाविद्यालयांनाच गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. दुसऱ्या दिवशीही मंडळांतर्गतच्या पाचही जिल्ह्यांतील बहुतांश महाविद्यालयांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.दहावी, बारावीच्या निकालावर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले आहेत. काहींचे निकाल राखीव ठेवलेले आहेत. यावर निर्णय घेण्यासाठी अधिकारीच नसल्यामुळे विद्यार्थी व महाविद्यालयांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.याविषयी अधिक माहिती घेतली असता, विभागीय सचिव तथा प्रभारी अध्यक्षा सुगता पुन्ने याच मागील तीन दिवसांपासून रजेवर आहेत. त्या कधी येणार, याविषयी कार्यालयातील कर्मचारी माहिती देण्यास तयार नव्हते. याच कार्यालयात हिंगोली, परभणी, बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी, पालक आले होते. अनेकांचे निकाल राखीव ठेवलेले होते. काहींचे पुनर्तपासणीचे प्रस्ताव होते. या पालकांना कर्मचारी संबंधित फाईल सचिवांच्या दालनात असल्याचे उत्तर देत होते. यावर हतबल होऊन अनेक जण निघून जात होते. याच कार्यालयातील इतरही काही उच्चपदांवरील अधिकारी रजेवर गेलेले आहेत. ऐन निकालाच्या आणि गुणपत्रिकांच्या वाटपावेळी अधिकारी रजेवर गेल्यामुळे विद्यार्थी, पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याविषयी सचिव सुगता पुन्ने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.अध्यक्ष पदभार घेईनात, सचिवांना बदलीचे वेधविभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी शिक्षण विभागाचे उपसंचालक वैजनाथ खांडके यांची पदोन्नती झाली आहे; मात्र त्यांनी पदोन्नती घेण्यास नकार दिल्यामुळे सचिव पुन्ने यांच्याकडेच प्रभारी अध्यक्ष म्हणून पदभार कायम आहे. यातच पुन्ने यांनाही बदलीचे वेध लागले आहेत. यामुळे त्याही सतत रजेवर जात आहेत.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८Aurangabadऔरंगाबाद