शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

सिटीचौक, अत्तरगल्ली, रंगारगल्लीत मार्किंग! महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाची कारवाई

By मुजीब देवणीकर | Updated: April 27, 2024 20:08 IST

सिटी चौक ते रंगार गल्लीपर्यंत अतिक्रमणांची पाहणी, रस्ता रुंदीकरणासाठी मार्किंगही करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : सिटी चौक, अत्तर गल्ली, रंगार गल्लीत अतिक्रमणांची संख्या बरीच वाढली आहे. मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे नागरिक, व्यापाऱ्यांनी बऱ्याच तक्रारीसुद्धा केल्या. या तक्रारींची दखल घेऊन शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पाहणी केली. नगररचना विभागाच्या नकाशानुसार मार्किंग केली. अतिक्रमण असलेल्या व्यापाऱ्यांनी सोमवारपर्यंत स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घेण्याची सूचना केली.

शहराची मुख्य बाजारपेठ म्हणजे सिटी चौक ते पैठण गेट होय. या भागात चारचाकी वाहनधारकाला सहजपणे दिवसा ये-जा करता येत नाही. दुचाकी वाहनधारकांनाही अतिक्रमणांचा बराच त्रास सहन करावा लागतो. सकाळी १० ते रात्री ११ पर्यंत या भागात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. शहराच्या वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या महिला या ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. १४ एप्रिलपूर्वी मनपाने गुलमंडी भागात अतिक्रमणांवर कारवाई केली होती. त्यानंतरही फेरीवाले, रस्त्यावर बसून विविध साहित्य, फळ, भाजीपाला विकणाऱ्यांचा त्रास कमी झालेला नाही. सिटी चौक ते रंगार गल्लीपर्यंत अतिक्रमणे होत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त हाेऊ लागल्या. 

शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त वाहुळे यांनी अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकासोबत या भागात पाहणी केली. जुन्या शहर विकास आराखड्यानुसार रस्त्यांची रुंदी जेवढी दर्शविण्यात आली, त्यानुसार मार्किंग करण्यात आली. ‘लोकमत’शी बोलताना वाहुळे यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले पाहिजे. सोमवारी मनपा साहित्य जप्त करेल. हे साहित्य परत मिळणार नाही. आजच्या पाहणीत तीन व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. ज्या मालमत्ताधारकांनी न्यायालयात प्रकरण असल्याचे नमूद केले, त्यांना कागदपत्रांसह मनपात बोलावल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण