शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही बाजार ठप्प..!

By admin | Updated: June 3, 2017 00:41 IST

जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी संपास संमिश्र प्रतिसाद मिळाला.

जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी संपास संमिश्र प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी संपात सहभागी होणारे दुसऱ्या दिवशी दिसून आले नाहीत. त्यातच जालना बाजार समितीतील भाजीपाला मार्केट बंद असल्याने त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. मात्र, याचा गंभीर परिणाम शनिवारपासून सर्वत्र दिसून येईल, अशी चिन्हे आहेत.कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संप पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यात संपाला अनेक स्वयंसेवी संस्थांसह विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवत सहभागही नोंदवला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी संमिश्र परिणाम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिसून आला. तर शुक्रवारी रांजणी, राणी उंचेगाव आणि माहोरा येथील आठवडी बाजारावर पडसाद उमटले. अंबड, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यांत शेतकऱ्यांच्या संपास अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. तर जिल्ह्यात दूध संकलन इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कमी असल्याने अपवाद वगळता याचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही. घरोघरी दूध देणारे वा हॉटेल्सचालकांना दूध विक्री कमी झाली. शनिवारपासून दूधटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही आठवडी बाजार भरलेच नाहीत. तर काही सकाळी भरुन दुपारी बंद करण्यात आले. एरवी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या राजकीय नेत्यांनी गेल्या दोन दिवसांत संपाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. काँग्रेसने शुक्रवारी संपास पाठिंबा दर्शवला, तर इतरांनी जिल्ह्यात अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे संभ्रमाची स्थिती आहे. शनिवारपासून संपाची धार अधिक टोकदार होणार असल्याने विरोधकांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. जालन्यासह इतर तालुक्यांतील बाजार समित्यांतील भाजीपाला वगळता इतर व्यवहार सुरळीत होते. तर अंबड, घनसावंगी, बदनापूर यासह काही तालुक्यांत शेतकरी संपाला शेतकरीपुत्र म्हणवून घेणाऱ्यांचा पाठिंबा मिळाला नाही. घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे भरत असलेल्या शुक्रवारच्या आठवडी बाजारावर शेतकरी संपाचा परिणाम दिसून आला. बाजारात भाजीपाला विक्रेता दुकानाची संख्या नेहमी पेक्षा कमी दिसून आली. राणीउंचेगाव येथील बाजारामध्ये बहुतांशी भाजीपाला विक्रेते जालना येथील मुख्य बाजारपेठेमधून भाजीपाला खरेदी करून राणीउंचेगाव येथील आठवडी बाजारात विक्रीसाठी आणतात. अखिल भारतीय मराठा महासंघानेही शेतकरी संपास पाठींबा दिला आहे.मंठ्यात विडोळी फाट्यावर शिवमुद्रा प्रतिष्ठानने शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. या संपात शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयसिंह प्रल्हाद बोराडे, एकनाथ काकडे, संतोष मोरे, वायाळ, दिगंबर बोराडे, भगवत गोंडगे,कृष्णा खरात, दीपक बोराडे, सुभाष बोराडे, शेळके , ऋषिकेश बोराडे, शाम काकडे, पवन खरात, योगेश बोराडे, दत्ता खरात, भगवान कुलकर्णी, राहुल खरात, जीवन रणशूर, अक्षय खरात, प्रताप खरात, किरण सोनार, पप्पू अवचार, विशाल शहाणे, आनंद जाधव, राम गोंडगे, अमोल अघाव, अदिनाथ गुंड, अजय बागल, तुकाराम तांगडे, पवन वाघमारे, यशवंत इंगळे, गोपाल बागल, प्रशांत मेहता, सतीश गणगे, सोमनाथ शेळके, रवि देशमुख आदी सहभागी झाले होते.