शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

दुसऱ्या दिवशीही बाजार ठप्प..!

By admin | Updated: June 3, 2017 00:41 IST

जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी संपास संमिश्र प्रतिसाद मिळाला.

जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी संपास संमिश्र प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी संपात सहभागी होणारे दुसऱ्या दिवशी दिसून आले नाहीत. त्यातच जालना बाजार समितीतील भाजीपाला मार्केट बंद असल्याने त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. मात्र, याचा गंभीर परिणाम शनिवारपासून सर्वत्र दिसून येईल, अशी चिन्हे आहेत.कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संप पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यात संपाला अनेक स्वयंसेवी संस्थांसह विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवत सहभागही नोंदवला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी संमिश्र परिणाम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिसून आला. तर शुक्रवारी रांजणी, राणी उंचेगाव आणि माहोरा येथील आठवडी बाजारावर पडसाद उमटले. अंबड, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यांत शेतकऱ्यांच्या संपास अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. तर जिल्ह्यात दूध संकलन इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कमी असल्याने अपवाद वगळता याचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही. घरोघरी दूध देणारे वा हॉटेल्सचालकांना दूध विक्री कमी झाली. शनिवारपासून दूधटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही आठवडी बाजार भरलेच नाहीत. तर काही सकाळी भरुन दुपारी बंद करण्यात आले. एरवी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या राजकीय नेत्यांनी गेल्या दोन दिवसांत संपाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. काँग्रेसने शुक्रवारी संपास पाठिंबा दर्शवला, तर इतरांनी जिल्ह्यात अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे संभ्रमाची स्थिती आहे. शनिवारपासून संपाची धार अधिक टोकदार होणार असल्याने विरोधकांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. जालन्यासह इतर तालुक्यांतील बाजार समित्यांतील भाजीपाला वगळता इतर व्यवहार सुरळीत होते. तर अंबड, घनसावंगी, बदनापूर यासह काही तालुक्यांत शेतकरी संपाला शेतकरीपुत्र म्हणवून घेणाऱ्यांचा पाठिंबा मिळाला नाही. घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे भरत असलेल्या शुक्रवारच्या आठवडी बाजारावर शेतकरी संपाचा परिणाम दिसून आला. बाजारात भाजीपाला विक्रेता दुकानाची संख्या नेहमी पेक्षा कमी दिसून आली. राणीउंचेगाव येथील बाजारामध्ये बहुतांशी भाजीपाला विक्रेते जालना येथील मुख्य बाजारपेठेमधून भाजीपाला खरेदी करून राणीउंचेगाव येथील आठवडी बाजारात विक्रीसाठी आणतात. अखिल भारतीय मराठा महासंघानेही शेतकरी संपास पाठींबा दिला आहे.मंठ्यात विडोळी फाट्यावर शिवमुद्रा प्रतिष्ठानने शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. या संपात शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयसिंह प्रल्हाद बोराडे, एकनाथ काकडे, संतोष मोरे, वायाळ, दिगंबर बोराडे, भगवत गोंडगे,कृष्णा खरात, दीपक बोराडे, सुभाष बोराडे, शेळके , ऋषिकेश बोराडे, शाम काकडे, पवन खरात, योगेश बोराडे, दत्ता खरात, भगवान कुलकर्णी, राहुल खरात, जीवन रणशूर, अक्षय खरात, प्रताप खरात, किरण सोनार, पप्पू अवचार, विशाल शहाणे, आनंद जाधव, राम गोंडगे, अमोल अघाव, अदिनाथ गुंड, अजय बागल, तुकाराम तांगडे, पवन वाघमारे, यशवंत इंगळे, गोपाल बागल, प्रशांत मेहता, सतीश गणगे, सोमनाथ शेळके, रवि देशमुख आदी सहभागी झाले होते.