शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मराठवाड्याच्या डॉप्लर रडारला मिळेना हवामान खात्याचे सिग्नल

By विकास राऊत | Updated: December 8, 2023 18:59 IST

कुणीच बोलेना : तारीख पे तारीखच्या खेळात सगळे काही रखडले

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी मंजूर झालेले एक्स किंवा सी- बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी देऊन दीड वर्ष उलटले आहे. मात्र दिल्ली आणि मुंबईतील हवामान खात्यातील काही महाभागांच्या अंतर्गत राजकारणामुळे रडार बसविण्यास ग्रीन सिग्नल मिळत नसल्याची माहिती आहे.

चार वर्षांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी होत असून, सुमारे १ लाख हेक्टरवरील खरीप हंगामाची माती झाली. यंदा तर पावसाने दडीच मारल्याने खरीप हंगाम गेला, तर रब्बी हंगामात अवकाळी पावसाने पिकांची माती केली.मराठवाड्यातील हवामानाचे स्वतंत्ररीत्या संशोधन आणि विश्लेषण होण्यासाठी एक्स किंवा सी-बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्याची मागणी पुढे आली. शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे आहे. मात्र, तो मिळत नसल्याने लहरी हवामानाचा परिणाम शेती व औद्योगिक विकासावर झाला.

दहा महिन्यांपासून ठप्पआयएमडी विभागाच्या पथकाने १४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील म्हैसमाळ, शुलीभंजन, भांगसीमाता गड, गोगाबाबा टेकडी व कच्ची घाटी, सातारा परिसरातील जागांची पाहणी केली. दिल्लीतील अधिकाऱ्यांनी पाहणी अहवाल दिला. जुलै महिन्यात म्हैसमाळ येथील उंच जागा आयएमडीने निश्चित केली. जागेच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला. मात्र, पुढे काहीच नाही.

काही सांगता येणार नाहीमराठवाड्यातील रडार कधी बसेल, कोणते बसेल, यावर मला काही सांगता येणार नाही. याबाबत विज्ञान मंत्रालयच सांगू शकेल. -डॉ.अनुपम कश्यप, आयएमडी इन्चार्ज, पुणे.

लोकमत करीत आहे पाठपुरावाजून, २०२१ पासून लोकमत वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा करीत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत, केंद्रीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर, ५० कोटींच्या खर्चातून चार्तून सी-डॉप्लर बॅण्ड रडार बसविण्यासाठी मार्च, २०२२ मध्ये मंजुरी मिळाली.

एक्स बॅण्ड रडार बसविणे गरजेचेअवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले. बोटांएवढ्या आकारमानाच्या ढगात किती बर्फ कण, पाण्याची वाफ, थेंब आहेत. याचा एक्स-रे रडार काढते. कोणत्या अक्षांश, रेखांशावर किती वाजता, किती मिलीमीटर पाऊस पडेल, ढगफुटी होणार की दुष्काळ पडणार, हे त्यातून कळते. सी-बॅण्ड डॉप्लर रडार मराठवाड्यात बसविण्याच्या हालचाली सुरू असून, त्याऐवजी एक्स बॅण्ड रडार बसविणे गरजेचे आहे.-प्रा.किरणकुमार जोहरे, हवामान शास्त्रज्ञ.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण