शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

मराठवाड्याच्या डॉप्लर रडारला मिळेना हवामान खात्याचे सिग्नल

By विकास राऊत | Updated: December 8, 2023 18:59 IST

कुणीच बोलेना : तारीख पे तारीखच्या खेळात सगळे काही रखडले

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी मंजूर झालेले एक्स किंवा सी- बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी देऊन दीड वर्ष उलटले आहे. मात्र दिल्ली आणि मुंबईतील हवामान खात्यातील काही महाभागांच्या अंतर्गत राजकारणामुळे रडार बसविण्यास ग्रीन सिग्नल मिळत नसल्याची माहिती आहे.

चार वर्षांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी होत असून, सुमारे १ लाख हेक्टरवरील खरीप हंगामाची माती झाली. यंदा तर पावसाने दडीच मारल्याने खरीप हंगाम गेला, तर रब्बी हंगामात अवकाळी पावसाने पिकांची माती केली.मराठवाड्यातील हवामानाचे स्वतंत्ररीत्या संशोधन आणि विश्लेषण होण्यासाठी एक्स किंवा सी-बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्याची मागणी पुढे आली. शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे आहे. मात्र, तो मिळत नसल्याने लहरी हवामानाचा परिणाम शेती व औद्योगिक विकासावर झाला.

दहा महिन्यांपासून ठप्पआयएमडी विभागाच्या पथकाने १४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील म्हैसमाळ, शुलीभंजन, भांगसीमाता गड, गोगाबाबा टेकडी व कच्ची घाटी, सातारा परिसरातील जागांची पाहणी केली. दिल्लीतील अधिकाऱ्यांनी पाहणी अहवाल दिला. जुलै महिन्यात म्हैसमाळ येथील उंच जागा आयएमडीने निश्चित केली. जागेच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला. मात्र, पुढे काहीच नाही.

काही सांगता येणार नाहीमराठवाड्यातील रडार कधी बसेल, कोणते बसेल, यावर मला काही सांगता येणार नाही. याबाबत विज्ञान मंत्रालयच सांगू शकेल. -डॉ.अनुपम कश्यप, आयएमडी इन्चार्ज, पुणे.

लोकमत करीत आहे पाठपुरावाजून, २०२१ पासून लोकमत वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा करीत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत, केंद्रीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर, ५० कोटींच्या खर्चातून चार्तून सी-डॉप्लर बॅण्ड रडार बसविण्यासाठी मार्च, २०२२ मध्ये मंजुरी मिळाली.

एक्स बॅण्ड रडार बसविणे गरजेचेअवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले. बोटांएवढ्या आकारमानाच्या ढगात किती बर्फ कण, पाण्याची वाफ, थेंब आहेत. याचा एक्स-रे रडार काढते. कोणत्या अक्षांश, रेखांशावर किती वाजता, किती मिलीमीटर पाऊस पडेल, ढगफुटी होणार की दुष्काळ पडणार, हे त्यातून कळते. सी-बॅण्ड डॉप्लर रडार मराठवाड्यात बसविण्याच्या हालचाली सुरू असून, त्याऐवजी एक्स बॅण्ड रडार बसविणे गरजेचे आहे.-प्रा.किरणकुमार जोहरे, हवामान शास्त्रज्ञ.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण