शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या डॉप्लर रडारला मिळेना हवामान खात्याचे सिग्नल

By विकास राऊत | Updated: December 8, 2023 18:59 IST

कुणीच बोलेना : तारीख पे तारीखच्या खेळात सगळे काही रखडले

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी मंजूर झालेले एक्स किंवा सी- बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी देऊन दीड वर्ष उलटले आहे. मात्र दिल्ली आणि मुंबईतील हवामान खात्यातील काही महाभागांच्या अंतर्गत राजकारणामुळे रडार बसविण्यास ग्रीन सिग्नल मिळत नसल्याची माहिती आहे.

चार वर्षांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी होत असून, सुमारे १ लाख हेक्टरवरील खरीप हंगामाची माती झाली. यंदा तर पावसाने दडीच मारल्याने खरीप हंगाम गेला, तर रब्बी हंगामात अवकाळी पावसाने पिकांची माती केली.मराठवाड्यातील हवामानाचे स्वतंत्ररीत्या संशोधन आणि विश्लेषण होण्यासाठी एक्स किंवा सी-बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्याची मागणी पुढे आली. शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे आहे. मात्र, तो मिळत नसल्याने लहरी हवामानाचा परिणाम शेती व औद्योगिक विकासावर झाला.

दहा महिन्यांपासून ठप्पआयएमडी विभागाच्या पथकाने १४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील म्हैसमाळ, शुलीभंजन, भांगसीमाता गड, गोगाबाबा टेकडी व कच्ची घाटी, सातारा परिसरातील जागांची पाहणी केली. दिल्लीतील अधिकाऱ्यांनी पाहणी अहवाल दिला. जुलै महिन्यात म्हैसमाळ येथील उंच जागा आयएमडीने निश्चित केली. जागेच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला. मात्र, पुढे काहीच नाही.

काही सांगता येणार नाहीमराठवाड्यातील रडार कधी बसेल, कोणते बसेल, यावर मला काही सांगता येणार नाही. याबाबत विज्ञान मंत्रालयच सांगू शकेल. -डॉ.अनुपम कश्यप, आयएमडी इन्चार्ज, पुणे.

लोकमत करीत आहे पाठपुरावाजून, २०२१ पासून लोकमत वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा करीत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत, केंद्रीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर, ५० कोटींच्या खर्चातून चार्तून सी-डॉप्लर बॅण्ड रडार बसविण्यासाठी मार्च, २०२२ मध्ये मंजुरी मिळाली.

एक्स बॅण्ड रडार बसविणे गरजेचेअवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले. बोटांएवढ्या आकारमानाच्या ढगात किती बर्फ कण, पाण्याची वाफ, थेंब आहेत. याचा एक्स-रे रडार काढते. कोणत्या अक्षांश, रेखांशावर किती वाजता, किती मिलीमीटर पाऊस पडेल, ढगफुटी होणार की दुष्काळ पडणार, हे त्यातून कळते. सी-बॅण्ड डॉप्लर रडार मराठवाड्यात बसविण्याच्या हालचाली सुरू असून, त्याऐवजी एक्स बॅण्ड रडार बसविणे गरजेचे आहे.-प्रा.किरणकुमार जोहरे, हवामान शास्त्रज्ञ.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण