शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा २५ दिवसांपासून विभागीय आयुक्तांविनाच; कोर्टाच्या सूचनेलाही शासन जुमानेना

By विकास राऊत | Updated: June 25, 2024 12:51 IST

नाशिक विभागाला तातडीने आयुक्त दिले, मग मराठवाड्याबाबत एवढा विलंब कशासाठी यावरून सरकारवर टीका सुरू झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासनाने २० जूनपर्यंत विभागीय आयुक्त नियुक्त होतील, अशी अपेक्षा शासनाकडून ठेवली होती. परंतु न्यायालयाच्या सृूचनेला, अपेक्षेला शासनाने जुमानले नाही. २५ दिवसांपासून विभागीय कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर असून त्याचे परिणाम कामकाजावर होत आहेत. १ जूनपासून आयुक्तपद प्रभारी आहे. आजवर शासनाने ६ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. परंतु मराठवाडा विभागीय आयुक्त पदासाठी शासनाने कुणाचीही बदली केली नाही.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई आहे. पावसाळा लागला असला तरी टँकरची संख्या कमी झालेली नाही. दोन हजारांच्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत चाराटंचाईची शक्यता असून २५ दिवसांपासून विभागीय आयुक्त हे पद रिक्त आहे. नाशिक विभागाला तातडीने आयुक्त दिले, मग मराठवाड्याबाबत एवढा विलंब कशासाठी यावरून सरकारवर टीका सुरू झाली आहे. दुग्ध व समाजकल्याण विभागातील काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नावे सुरुवातीला चर्चेला आली. तसेच अमरावती विभागीय आयुक्तांचेही नाव चर्चेत होते; परंतु त्यांच्या नावाला राजकीय वर्तुळातून विरोध असल्यामुळे ते नाव मागे पडले. काही जण सेवानिवृत्त होणार असल्याने नवीन नावांचा शोध सध्या सुरू आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, नापिकी या सगळ्या बाबींचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे विभागीय आयुक्त पदावर सक्षम अधिकारी नेमावा, अशी मागणी सत्ताधारी वर्तुळाने शासनाकडे लावून धरली आहे, तर विरोधकांनी सरकार मराठवाड्याला सावत्र वागणूक देत असल्याचा आरोप केला आहे.

कोणत्या कामांवर परिणाम....टंचाईसाठी उपाययोजनांचे आढावे ठप्प.महसूल सुनावण्यांवर निर्णय होण्यात अडचणी.प्रशासकीय सुनावण्या खोळंबल्या.जि.प., न.प. पुरवठा शाखेचे विषय ठप्प.राेहयो, सामान्य प्रशासनाची प्रकरणे ठप्प.पीक कर्ज, विमा, शेतकरी प्रकरणे जैसे थे.पाणीटंचाईच्या बाबतीत निर्णय घेणे ठप्प.शहर पाणीपुरवठा योजनेचे काम मंदगतीने.

२७ जूनपर्यंत निर्णय होईल....विभागीय आयुक्त पदावर कोण येणार, याचा निर्णय या आठवड्यात होईल. २७ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्यावर चर्चा केली जाईल.-अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री

कामाच्या मर्यादा असतातप्रभारी अधिकाऱ्यांच्या कामाच्या मर्यादा असतात. अनेक प्रशासकीय शाखांच्या सुनावण्यांसाठी विषयाची पृूर्ण माहिती नसते. त्यामुळे निर्णय घेणे शक्य होत नाही.-जगदीश मिणियार, प्रभारी विभागीय आयुक्त

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा