शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

दीड वर्षात मराठवाड्याचे चित्र बदलेल; मुख्य अभियंता सुरकुटवार यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:36 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मराठवाडा प्रादेशिक विभागातील रस्त्यांचे चित्र येत्या दीड-दोन वर्षांत पूर्णत: बदललेले असेल, असा दावा मुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार यांनी केला.

ठळक मुद्देमुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत मराठवाड्यात केलेल्या कामकाजाबाबत समाधानी असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्यामराठवाडा प्रादेशिक विभागातील रस्त्यांचे चित्र येत्या दीड-दोन वर्षांत पूर्णत: बदललेले असेल, असा दावा मुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार यांनी केला. ३० एप्रिल रोजी ते सेवानिवृत्त होत असून, सुट्यांमुळे त्यांच्या प्रशासकीय सेवेचा २७ एप्रिल हाच शेवटचा दिवस ठरला. अलीकडच्या काही वर्षांत सी.डी.फकीर यांच्यानंतर मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त होणारे सुरकुटवार हे दुसरे अभियंते आहेत. 

दोन वर्षांत त्यांनी विभागाची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यात केलेल्या कामकाजाबाबत समाधानी असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, येथे रुजू झालो तेव्हा परिस्थिती वेगळी होती. १ हजार कोटींहून अधिक रुपयांची कामे या दोन वर्षांत सुरू केली. गोदावरी व पूर्णा नदीवरील ८ ते १० पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. अंबाजोगाई येथील हॉस्टेल, बाह्यरुग्णालय, हिंगोली, बीड येथील कोर्ट, कळमनुरी हॉस्पिटल इमारतीचे काम पूर्ण झाले. २०० कोटींच्या इमारत बांधणीची निविदा प्रक्रिया पूर्ण होत असून, महिनाभरात ती कामे सुरू होतील. १ हजार कि़मी.चे नवीन रस्ते या दोन वर्षांत विभागात झाले आहेत. आगामी काळात अ‍ॅन्युटीमधून मोठ्या प्रमाणात रस्ते होतील.खड्डेमुक्त मराठवाडा यासाठी खूप परिश्रम घेतल्याचा दावा त्यांनी केला. रस्ते आणि इमारतींसह २ हजार कोटींच्या आसपासचा निधी शासनाने विभागामध्ये दिला आहे. शिल्लक कामांची देणी ५० टक्क्यांवर आणल्यामुळे मोठा भार हलका झाला आहे. याच शिस्तीत पुढे काम चालले, तर विभागाचा फायदा होईल. 

चांगले अधिकारी आल्यास गती पैठण रोडची डागडुजी, लिंकरोडपर्यंत काँक्रिटीकरण, परळीतील रस्ते, उदगीर, परतूर येथील रेल्वे उड्डाणपूल, फुलंब्रीतील पुलांचे बांधकाम, नांदेड जिल्ह्यातील माहूर बायपास, भोकरमधील सिमेंट रस्ते, जालना ते भोकरदन रस्ता, ही कामे गतीने केली. शासनाने विभागात मोठ्या  प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे पुढील दीड-दोन वर्षांत विभागातील इमारती व रस्त्यांचे चित्र बदललेले असेल. चांगले अधिकारी, अभियंते या विभागात आल्यास कामांना मोठी गती मिळेल. येत्या काळात शासन रिक्त पदांची भरती करील, फे्रश कर्मचारी विभागाला मिळतील. त्यामुळे आणखी गुणवत्तापूर्ण कामे होतील, अशी अपेक्षा मावळते मुख्य अभियंता सुरकुटवार यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Marathwadaमराठवाडाroad safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग