शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय स्पर्धेत मराठवाड्याच्या खेळाडूंचा डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:10 IST

मराठवाडा ही प्रतिभावान क्रिकेटपटूंची खाण ठरत आहे. इकबाल सिद्दीकी, संजय बांगर, अंकित बावणे, विजय झोल, श्रीकांत मुंडे असे अनेक दर्जेदार क्रिकेटपटू मराठवाड्याने महाराष्ट्राला दिले. दिवसेंदिवस त्यात आणखी प्रतिभावान खेळाडूंची भर पडत आहे. त्यात विशेषत: बीडचा सचिन धस, सौरभ शिंदे आणि परभणीचा शिवराज शेळके या खेळाडूंनी तर अफलातून कामगिरी केली आहे. या त्रिकुटाने महाराष्ट्राला बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिले आहे.

ठळक मुद्देअंकितच्या पावलावर पाऊल ठेवतोय सचिन धस । सौरभ, शिवराज यांचाही ठसा

जयंत कुलकर्णी।औरंगाबाद : मराठवाडा ही प्रतिभावान क्रिकेटपटूंची खाण ठरत आहे. इकबाल सिद्दीकी, संजय बांगर, अंकित बावणे, विजय झोल, श्रीकांत मुंडे असे अनेक दर्जेदार क्रिकेटपटू मराठवाड्याने महाराष्ट्राला दिले. दिवसेंदिवस त्यात आणखी प्रतिभावान खेळाडूंची भर पडत आहे. त्यात विशेषत: बीडचा सचिन धस, सौरभ शिंदे आणि परभणीचा शिवराज शेळके या खेळाडूंनी तर अफलातून कामगिरी केली आहे. या त्रिकुटाने महाराष्ट्राला बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिले आहे.या तीन खेळाडूंच्या बहुमूल्य योगदानामुळे महाराष्ट्राचा संघ तब्बल ९ वर्षांनंतर १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य मुंबई संघाला नमवतानाच चॅम्पियनचा बहुमान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे ९ वर्षांआधीदेखील महाराष्ट्राने मुंबईलाच धूळ चारून विजेतेपदाला गवसणी घातली होती. महत्त्वाचे म्हणजे या सामन्यातही उस्मानाबादच्या मोहसीन सय्यदने गोलंदाजीत ३८ धावांत ५ बळी आणि फलंदाजीत ५५ धावा करीत योगदान दिले होते, तर लातूरच्या विकास निरफळने ६0 व जालना येथील आशिष देशमुखने ४२ धावांचे योगदान दिले होते.योगायोग म्हणजे दोन्ही वेळेस संघाचे व्यवस्थापकपद हे एमसीएचे १४ वर्षांखालील निवड समितीचे राजू काणे हेच होते. यावेळेसही महाराष्ट्राला १४ वर्षांखालील विजेतेपद पटकावून देण्यात बीडच्या सचिन धसने फलंदाजीत निर्णायक योगदान दिले, तसेच बीडचा सौरभ शिंदे व परभणीचा शिवराज शेळके यांनी अफलातून गोलंदाजी करताना महाराष्ट्राच्या यशात सिंहाचा वाटा उचलला.मुंबईविरुद्धच्या लढतीत सौरभ शिंदेने पहिल्या डावात ३0 धावांत ६, तर दुसऱ्या डावात शिवराज शेळकेने ४२ धावांत ५ गडी बाद करताना आपला विशेष ठसा उमटवला. सौरभ शिंदेने बडोद्याचाही अर्धा संघ ३१ धावांत तंबूत पाठवला होता.या तिघांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राने मुंबईचा १४ धावांनी, बडोदा संघाचा एक डाव २४ धावांनी आणि गुजरातचा एक डाव आणि तब्बल १0५ धावांनी पराभव करण्यात यश मिळवले होते. सचिन धसने महाराष्ट्राच्या १६ वर्षांखालील संघांचेही प्रतिनिधित्व करताना ४४९ धावा केल्या. त्यात त्याने मुंबईविरुद्ध १0८ व मेघालयाविरुद्ध १५४ धावांची खेळी केली होती, तसेच गुजरातविरुद्ध ५५, सौराष्ट्रविरुद्ध ६0 व हरियाणाविरुद्ध ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली होती.उल्लेखनीय बाब म्हणजे राज्याचा रणजी संघाचा कर्णधार व शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित अंकित बावणे याच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्राने क्रिकेट इतिहासात २00७ मध्ये सर्वात प्रथम बीसीसीआयची १५ वर्षांखालील पॉली उम्रीगर चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. त्यावेळेसही वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने अंतिम फेरीत मुंबईला नमवले होते.त्याचप्रमाणे २0१४ मध्येदेखील महाराष्ट्राला रणजी ट्रॉफीत उपविजेतेपद पटकावून देण्यात मराठवाड्याच्या अंकित बावणे, विजय झोल आणि श्रीकांत मुंढे यांचे योगदानही निर्णायक ठरले होते. शमशुझमा काझी, राजवर्धन हंगरगेकर, मोहसीन सय्यद, रामेश्वर दौड, सत्यजित नाईक हेही बीसीसीआयच्या स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवत आहेत.१२७ च्या सरासरीने काढल्या ५११ धावावयाच्या सहाव्या वर्षापासूनच बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाºया सचिन धसने तर महाराष्ट्राकडून अफलातून फलंदाजी करताना ५ डावांत तब्बल १२७ च्या सरासरीने व ७५.४८ च्या स्ट्राईकरेटने ५११ धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत पूर्ण पश्चिम विभागातून सर्वाधिक धावादेखील सचिन धस याच्याच नावावर आहेत. त्यापाठोपाठ सौराष्ट्रच्या अंश गोसावीने ९३.५0 च्या सरासरीने ५ डावांत ३७४ धावा केल्या आहेत.आज झालेल्या पश्चिम विभागीय स्पर्धेत सचिन धसने बलाढ्य मुंबईविरुद्ध पहिल्या डावात ८४ व दुसºया डावात ५२ धावा केल्या, तसेच बडोदा संघाविरुद्ध २२८ धावांची मॅरेथॉन खेळी करताना गुजरातविरुद्ध १२७ धावांची शतकी खेळी केली. गोलंदाजीत बीडच्या सौरभ शिंदेने ७ डावांत १८ आणि शिवराज शेळकेने १२ गडी बाद करताना महाराष्ट्राच्या विजेतेपदात योगदान दिले.